शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव झाले चकाचक

By admin | Updated: January 25, 2016 00:56 IST

हातात झाडू घेत स्वच्छतेचा संदेश देत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जवळपास १ हजार कार्यकर्त्यांनी कोरेगाव भीमा येथे आज स्वच्छता मोहीम राबवली

कोरेगाव भीमा : हातात झाडू घेत स्वच्छतेचा संदेश देत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जवळपास १ हजार कार्यकर्त्यांनी कोरेगाव भीमा येथे आज स्वच्छता मोहीम राबवली. गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ असलेला कोरेगाव भीमाचा परिसर अवघ्या काही तासांत स्वच्छ झाला. प्रत्येक नागरिकाने समजाचे व देशाचे ऋ ण फेडणे हीच खरी ईश्वरसेवा मानून स्वच्छ भारत अभियानांतर्गत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यात एकाच दिवशी ग्रामस्वच्छतेचा कार्यक्र म हाती घेतला होता. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार सकाळी प्रतिष्ठानच्या १ हजारांपेक्षा जास्त साधक स्वच्छतेसाठी लागणारी साधने, जेसीबी मशिन, डंपर, ट्रॅक्टर यासारखी उपकरणे घेऊन गावामध्ये सकाळी ६ वाजता एकत्र आले. आठ दिवस आधीपासूनच गावाचा सर्वे करून ज्या ठिकाणी घाणीचे, कचऱ्याचे साम्राज्य आहे अशा सर्व ठिकाणी सकाळपासूनच स्वच्छतेचा कार्यक्रम ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. सहा-सात तासांत गावाचा चेहरामोहरा बदलून टाकत गावातून २५० टन कचरा फक्त साफ केला नाही तर तो एका ठिकाणी जमा केला. पूर्वी गावात पुलावर आल्यापासूनच दुर्गंधीस होणारी सुरुवात, आज मात्र त्या ठिकाणी कसलाच कचरा पाहण्यास मिळाला नाही.ग्रामस्वच्छतेनंतर गावातील मारुती मंदिरासमोर झालेल्या समारोपप्रसंगी काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष नारायणराव फडतरे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गव्हाणे, रमेश शिंदे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, सुरेंद्र भांडवलकर, वृषाली गव्हाणे, कल्पना गव्हाणे, आशा काशिद, संगीता कांबळे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, ग्रामसेवक मिलिंद महाले, ग्रामस्वच्छता समिती अध्यक्ष कृष्णाबाई गव्हाणे आदी उपस्थित होते. राजाराम ढेरंगे म्हणाले, धर्माधिकारी प्रतिष्ठानने कोरेगाव भीमामध्ये ग्रामस्वच्छता करून आम्हा ग्रामस्थांसमोर आदर्श निर्माण केला असून, यानंतर ग्रामस्थांच्या माध्यमातून गावामध्ये महिन्यातील एक दिवस ग्रामस्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे. उपसरपंच नितीन गव्हाणे यांनी प्रतिष्ठानचे आभार मानून गाव कचरामुक्त करण्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. आभार सुरेंद्र भांडवलकर यांनी मानले.