शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

कोरेगाव झाले चकाचक

By admin | Updated: January 25, 2016 00:56 IST

हातात झाडू घेत स्वच्छतेचा संदेश देत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जवळपास १ हजार कार्यकर्त्यांनी कोरेगाव भीमा येथे आज स्वच्छता मोहीम राबवली

कोरेगाव भीमा : हातात झाडू घेत स्वच्छतेचा संदेश देत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या जवळपास १ हजार कार्यकर्त्यांनी कोरेगाव भीमा येथे आज स्वच्छता मोहीम राबवली. गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छ असलेला कोरेगाव भीमाचा परिसर अवघ्या काही तासांत स्वच्छ झाला. प्रत्येक नागरिकाने समजाचे व देशाचे ऋ ण फेडणे हीच खरी ईश्वरसेवा मानून स्वच्छ भारत अभियानांतर्गत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यात एकाच दिवशी ग्रामस्वच्छतेचा कार्यक्र म हाती घेतला होता. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या सूचनेनुसार सकाळी प्रतिष्ठानच्या १ हजारांपेक्षा जास्त साधक स्वच्छतेसाठी लागणारी साधने, जेसीबी मशिन, डंपर, ट्रॅक्टर यासारखी उपकरणे घेऊन गावामध्ये सकाळी ६ वाजता एकत्र आले. आठ दिवस आधीपासूनच गावाचा सर्वे करून ज्या ठिकाणी घाणीचे, कचऱ्याचे साम्राज्य आहे अशा सर्व ठिकाणी सकाळपासूनच स्वच्छतेचा कार्यक्रम ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू करण्यात आला. सहा-सात तासांत गावाचा चेहरामोहरा बदलून टाकत गावातून २५० टन कचरा फक्त साफ केला नाही तर तो एका ठिकाणी जमा केला. पूर्वी गावात पुलावर आल्यापासूनच दुर्गंधीस होणारी सुरुवात, आज मात्र त्या ठिकाणी कसलाच कचरा पाहण्यास मिळाला नाही.ग्रामस्वच्छतेनंतर गावातील मारुती मंदिरासमोर झालेल्या समारोपप्रसंगी काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष नारायणराव फडतरे, माजी उपसरपंच राजाराम ढेरंगे, माजी ग्रामपंचायत सदस्य महेश ढेरंगे, सरपंच अनिता भालेराव, उपसरपंच नितीन गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गव्हाणे, रमेश शिंदे, योगेश गव्हाणे, प्रकाश ढेरंगे, सुरेंद्र भांडवलकर, वृषाली गव्हाणे, कल्पना गव्हाणे, आशा काशिद, संगीता कांबळे, पोलीस पाटील मालन गव्हाणे, ग्रामसेवक मिलिंद महाले, ग्रामस्वच्छता समिती अध्यक्ष कृष्णाबाई गव्हाणे आदी उपस्थित होते. राजाराम ढेरंगे म्हणाले, धर्माधिकारी प्रतिष्ठानने कोरेगाव भीमामध्ये ग्रामस्वच्छता करून आम्हा ग्रामस्थांसमोर आदर्श निर्माण केला असून, यानंतर ग्रामस्थांच्या माध्यमातून गावामध्ये महिन्यातील एक दिवस ग्रामस्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे. उपसरपंच नितीन गव्हाणे यांनी प्रतिष्ठानचे आभार मानून गाव कचरामुक्त करण्यावर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे सांगितले. आभार सुरेंद्र भांडवलकर यांनी मानले.