शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या ३० व ३१ जुलैला हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाचा पुन्हा धोका वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येत्या २४ तासांत ते आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवरील वार्‍याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ३० व ३१ जुलैला तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

कोकणात बहुतांश ठिकाणी तुरळक ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर ९०, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ७०, राधानगरी ६०, इगतपुरी, वेल्हे ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडला. बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेगवान वारे वाहणार

२९ जुलै रोजी कोकणातील किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ३० व ३१ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.