शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

कोकण, पश्चिम महाराष्ट्राला पुन्हा पावसाचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्राला जोरदार तडाखा दिल्यानंतर आता पावसाचा जोर कमी झाला असला तरी येत्या ३० व ३१ जुलैला हवामान विभागाने कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाचा पुन्हा धोका वाढला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. येत्या २४ तासांत ते आणखी तीव्र होणार आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, झारखंड येथे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पश्चिम किनारपट्टीवरील वार्‍याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात ३० व ३१ जुलैला तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, विदर्भ व मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

कोकणात बहुतांश ठिकाणी तुरळक ते मध्यम पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर ९०, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर ७०, राधानगरी ६०, इगतपुरी, वेल्हे ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तसेच अनेक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडला. बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

वेगवान वारे वाहणार

२९ जुलै रोजी कोकणातील किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. ३० व ३१ जुलै रोजी कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.