शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

संमेलनाध्यक्षपदाबाबतचे किर्लोस्करांचे ’ते’ भाकित खरे ठरले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:13 IST

पुणे : ‘‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लेास्कर’ मासिकात माझी एक कथा छापून आली होती. तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही ...

पुणे : ‘‘खूप वर्षांपूर्वी ‘किर्लेास्कर’ मासिकात माझी एक कथा छापून आली होती. तेव्हा मुकुंदराव किर्लोस्कर म्हणाले होते की, तुम्ही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व्हाल, पण त्यांना मी म्हणालो की, ‘मी स्वत:ला साहित्यिक समजत नाही. कारण माझा साहित्यातील अनुभव फार कमी आहेे.’ पण आज किर्लोस्करांचे ते भाकित खरे ठरले. साहित्य संंमेलन हा खूप मोठा मेळा आहे. संमेलनाध्यक्षपद हे एकप्रकारचे आव्हान असून, ही जबाबदारी खूप मोठी असल्याची भावना नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केली.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञानवादी लेखक डॉ. नारळीकर यांची रविवारी साहित्य महामंडळाच्या बैठकीत बहुमताने निवड झाली. साहित्य संंमेलनाच्या 93 वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे साहित्य, विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि साहित्याची सांगड, विज्ञानवादी दृष्टीकोन, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी होणारे प्रयत्न अशा विविध विषयांवर त्यांनी पत्रकारांशी ‘झूम’ मिटिंगद्वारे संवाद साधला.

एक विज्ञानवादी लेखक साहित्य संमेलनाध्यक्षपदी विराजमान झाल्यामुळे यापुढील काळात विज्ञान साहित्याला अधिक प्रतिष्ठा मिळेल. यंदाच्या साहित्य संमेलनात विज्ञानाचा प्रसार करण्याबरोबरच समाजातील अंंधश्रद्धा दूर करण्यास देखील निश्चितच उपयोग होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सहित्यात विज्ञान हे दोन त-हेने येऊ शकते. विज्ञानामध्ये जी नवीन संशोधन होतात त्याची माहिती साहित्यातून लोकांपर्यंत पोहोचविली जाऊ शकते आणि विज्ञान कथा देखील साहित्यामधून पोहोचविता येऊ शकतात असेही त्यांनी नमूद केले.

गेल्या 93 वर्षात साहित्य संमेलनामध्ये फारसा सहभागी झालो नाही. काही वर्षांपूर्वी डोंबिवली येथील साहित्य संंमेलनात माझी मुलाखत घेण्यात आली होती. तितकाच काय तो माझा संंमेलनाशी जवळून संबंध आला. आजवर विज्ञानविषयक संंमेलनामध्येच अधिक सहभागी झाल्याची प्रांजळ कबुली त्यांनी दिली.

समाजामधील विज्ञानवादी दृष्टीकोनाबददल सांगताना ते म्हणाले, एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानाने जरी प्रगती केली असली तरी विज्ञानवाद अजूनही दिसत नाही. लोक मोबाईलसारख्या तंत्रज्ञानाचा वापर कुठले दिवस शुभ किंवा अशुभ आहेत हे पाहाण्यासाठी करतात. तंत्रज्ञानाचा उपयोग अंधश्रद्धधेसाठीच केला जात आहे. लोकांची धारणा अजूनही बदललेली नाही. त्यामुळे एकप्रकारची निराशा जाणवते.

-----------------------------------------------

मुलांना मातृभाषेतूनच शिक्षण द्यायला हवं

विज्ञान किंवा गणिताचे मुलांना मराठी भाषेतूनच शिक्षण द्यायला हवे. आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातले तरच मुलांची प्रगती होणार आहे, असा एक समज पालकांमध्ये आहे. पण पालकांना हे कोण समजावणार की, यामुळे आपण मराठीतले वाचक कमी करत आहोत, याकडे डॉ. नारळीकर यांनी लक्ष वेधले.

---------------------------------------

मराठी ‘ज्ञानभाषा’नव्हे ‘विज्ञानभाषा’ व्हायला हवी

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तरी ती ज्ञानभाषा होईल का? याविषयी विचारले असता मराठीला ज्ञानभाषा मिळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. पण ती केवळ ज्ञानभाषा न होता विज्ञानभाषा व्हायला हवी अशी अपेक्षा डॉ. नारळीकर यांनी व्यक्त केली.

----------------------------------------------