शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

किर्लोस्कर कौटुंबिक वाद ‘कोर्टाच्या पायरी’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST

संजय किर्लोस्कर यांनी नुकसान भरपाईसाठी आपल्या भावांकडे साडेसातशे कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांचे भाऊ अतुल, राहुल ...

संजय किर्लोस्कर यांनी नुकसान भरपाईसाठी आपल्या भावांकडे साडेसातशे कोटी रुपयांची मागणी केली होती. या प्रकरणी त्यांचे भाऊ अतुल, राहुल आणि विक्रम यांनी याचिका दाखल केली होती. ‘स्थानिक न्यायालयाला या विषयात कोणताही अधिकार नाही आणि कौटुंबिक सेटलमेंटमध्ये निर्णय घेतल्यानुसार हा विषय लवादासाठी पाठवलाा पाहिजे,’ असे त्या तिघांचे म्हणणे होते. मात्र न्यायालयाने कौटुंबिक सेटलमेंटचे म्हणणे अमान्य केल्याने या दिवाणी खटल्याची सुनावणी आता पुणे न्यायालयात सुरु होणार आहे.

केबीएलमधील समभाग धारकांशी गैरवर्तन केल्याबद्दल आणि मंडळाच्या शिफारशींच्या विरोधात मतदान केल्याबद्दल किर्लोस्कर इंडस्ट्रीजला याच खटल्यात आणण्याच्या अर्जावरही न्यायालय विचार करत आहे. कौटुंबिक सेटलमेंटने निश्चित केले होते की, प्रत्येक किर्लोस्कर कुटुंबासाठी व्यवसायाच्या स्वतंत्र रुपरेषा असतील आणि कुटुंबातील कोणीही थेट किंवा त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून इतर कोणत्याही सदस्याशी स्पर्धा करु शकणार नाही. किर्लोस्कर ब्रदर्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांच्या म्हणण्यानुसार किर्लोस्कर ब्रदर्सची प्रतिस्पर्धी असलेली पंप उत्पादक कंपनी खरेदी करताना अतुल आणि राहुल (किर्लोस्कर इंजिन) यांनी या नियमाचे उल्लंघन केले. मात्र हे प्रकरण न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचा त्यांचा दावा सिद्ध होऊ शकला नाही.