शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

वारजेत सोळा वर्षीय युवकाचे अपहरण करून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:08 IST

कारण अस्पष्ट : दोन आरोपी जेरबंद, रस्त्याच्या कडेला पुरला होता मृतदेह

वारजे : एका सोळा वर्षीय युवकाचा अपहरण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप दोन आरोपींना अटक केली आहे. विठ्ठलनगर येथे राहणाऱ्या निखिल अनंत आग्रोळकर असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. खून केल्यानंतर आरोपींनी मृतदेह रस्त्याच्या कडेला पुरून ठेवला होता.

या प्रकरणी विनयसिंह वीरेंद्रसिंह राजपूत (वय २३, रा. हिंगणे बिल्डिंग, विठ्ठलनगर, वारजे) व हृषीकेश मारुती पोळ (वय १९ रा. वारजे माळवाडी) असे अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनयसिंह हा वारजे परिसरातील एका जीममध्ये कामाला असून जवळच राहत असल्याने त्याचे अंग्रोळकर कुटुंबियाकडे येणे जाणे होते. रविवारी (दि. १३) मयत निखिल हा घरी परत न आल्याने त्याच्या वडिलांनी वारजे पोलिसांत तो हरवल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात निखिल हा शेवटी विनयसिंहबरोबर दुचाकीवर कुठेतरी गेला असल्याची माहिती मिळाली होती. दोन दिवस विचारणा केल्यावर बुधवारी रात्री उशिरा राजपूतने गुन्ह्याची कबुली दिली.

त्याच्या सांगण्यानुसार रविवारी संध्याकाळी आरोपीने निखिलला दुचाकीवर बसून बोलायचे आहे, म्हणून चांदणी चौकाजवळील एनडीए रस्त्यावर दोडके फार्मच्या जवळ नेले. तेथे त्यांच्यात वाद होऊन विनयसिंहने रागाच्या भरात मोठा दगड निखिलच्या डोक्यात घातला व गळा आवळून त्याचा खून केला. याचा कोणाला सुगावा लागू नये म्हणून त्याने रस्त्याच्या कडेला एका छोट्या खड्ड्यात मृतदेह पुरून ठेवला. व त्याच्यावर दगड-माती टाकून ते कोणाला समजणार नाही, अशा पद्धतीने त्याच्यावर कडेचा राडारोडा टाकला. या कामी दुसरा आरोपी हृषीकेश यानेदेखील मदत केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

घरी परत येऊन आरोपी विनयसिंह याने काही झालेच नाही, या अविर्भावात त्याच्या कुटुंबीयांकडे येणे-जाणे चालूच ठेवले. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली. बुधवारी सकाळी त्याने पोलिसांना मृतदेह पुरल्याची जागा दाखवली.

नातेवाइकांचा पोलीस ठाण्याला घेरावमयताचे कुटुंबीय मूळचे बेळगाव येथील महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमाभागातील आहेत. बुधवारी सकाळी गुन्हा उघडकीला आल्यावर मयत कुटुंबीयांचे नातेवाईक व गावकडील संघटनेचे नागरिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यासमोर जमले. त्यांनी आरोपीस ताब्यात देण्याची मागणी लावून धरली. जमाव वाढत असल्याचे पाहून सहायक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते व येथील निरीक्षकांनी या भागात बंदोबस्त वाढवला. आरोपीस कोणतीही दयामाया न दाखवता प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यची विनंती त्यांनी पोलिसांना केली. संध्याकाळी उशिरापर्यंत मृतदेह उत्तरीय तपासणी होऊन न आल्याने पोलीस ठाण्यासमोरील गर्दी रस्त्याने जाणाºया नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.

 

टॅग्स :Murderखून