शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

आचाऱ्याचे अपहरण करून मालकाला मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

पुणे : हॉटेलमध्ये जेवण बनवून झाल्यावर दुचाकीवरून घरी निघालेल्या आचाऱ्याचे अपहरण करून त्याच्या हॉटेल मालकाकडे १० ...

पुणे : हॉटेलमध्ये जेवण बनवून झाल्यावर दुचाकीवरून घरी निघालेल्या आचाऱ्याचे अपहरण करून त्याच्या हॉटेल मालकाकडे १० हजार रुपयांची खंडणी मागण्यात आली. ही घटना खराडी बायपास परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हेगारांचा शोध घेऊन तिघांना अटक केली.

मुकेश मनोज जाधव (२१ ,रा. नागपाल रोड), मनोहर काशिराम जाधव (२३ ,रा. शिरूर), विनोद चव्हाण (चंदननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्वजीत पाल असे अपहरण झालेल्या आचारीचे नाव आहे. याप्रकरणी गगन अशोक तलवार (२१, रा. खराडी) यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तलवार यांच्याकडे आचारी विश्वजीत पाल काम करतो. तो जेवण बनवून झाल्यावर घरी दुचाकीवर चालला होता. या वेळी आरोपींनी त्याला खराडी बायपासजवळ मारहाण करून टमटम रिक्षामध्ये टाकले. पाल याला वाटले धक्का लागल्यामुळे मारहाण केली असेल. मात्र रिक्षाचे पडदे लावून त्याला चंदननगर येथील जंगल परिसरात नेले. तेथे पुन्हा मारहाण करून पैशाची मागणी करण्यात आली. त्याने पैसे नसल्याचे सांगितल्यावर मालकाकडून पैशाची मागणी करण्यास सांगितले. त्याने मालकाकडे फोन करून पैसे मागितले, मात्र पैसे पाठविण्यासाठी ते स्वत:चा गुगल पे नंबर देत नव्हते.

त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा मालकाला फोन करून आम्ही तुझ्या जिवाचे बरे-वाईट करणार आहोत असे सांगायला लावले. मालकाला सुरुवातीला हा प्रकार खोटा वाटल्यामुळे त्यांनी रस्त्याने जाऊन पाहिले. त्यावेळी पाल याची दुचाकी पडल्याचे दिसले. तेथील नागरिकांपाशी चौकशी केली असता, त्यांनी तिघांनी एका व्यक्तीला रिक्षात घालून नेल्याचे सांगितले. त्यानंतर मालकाने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे मालकाने फोनवर आरोपींसोबत संवाद सुरू ठेवला. यानंतर पोलिसांनी जंगल परिसराकडे धाव घेतली असता, तेथे आरोपींनी आचाऱ्याला मारहाण करून डांबून ठेवल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तिघांपैकी दोघे मूळचे कर्नाटक येथील आहेत. तर अन्य एक बिडी कामगार वसाहत येथील रहिवासी आहे. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, कर्मचारी महेश नानेकर, अमित कांबळे यांच्या पथकाने केली.