शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

महापालिकेचाच ‘खोडा’

By admin | Updated: March 4, 2015 00:42 IST

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासनस्तरावर एकीकडे प्रयत्न होत असताना महापालिकेचे मात्र मराठीसाठी एक पाऊल पुढे पडण्याऐवजीच मागेच पडत आहे.

नम्रता फडणीस -पुणेमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी शासनस्तरावर एकीकडे प्रयत्न होत असताना महापालिकेचे मात्र मराठीसाठी एक पाऊल पुढे पडण्याऐवजीच मागेच पडत आहे. पुणे महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात भाषासंवर्धनासाठी करण्यात आलेल्या तरतुदीलाच यंदाच्या वर्षी (२०१५-१६) ‘कात्री’ लावण्यात आली आहे. मराठी भाषादिनीच हे अंदाजपत्रक मांडण्यात आले, हे त्यातील विशेष. पालिकेच्या या उदासीनतेमुळे मराठी भाषासंवर्धनाच्या हेतूवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, तरतुदीच्या कपातीसाठी कार्यालयातील अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण पुढे करीत महापालिका प्रशासनानेच चक्क आपले हात झटकले आहेत. मराठी भाषेचे संवर्धन करण्याचा विडा उचलून महापालिकेच्या स्थायी समितीने २०१३-१४ मध्ये अंदाजपत्रकात कामगार विभागाच्या अंतर्गत भाषासंवर्धनासाठी तरतूद केली. ही जबाबदारी कामगार विभागाला देण्यात आली. याच वर्षी भाषासंवर्धन समितीचाही श्रीगणेशा करण्यात आला. या समितीमध्ये महापौर, अध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह प्रा. अनिल गोरे, प्रदीप निफाडकर, डॉ. न. म. जोशी, श्याम भुर्के, डॉ. माधवी वैद्य यांचा समावेश करण्यात आला. या समितीला विश्रामबाग येथील झाशीची राणी शाळेत कार्यालय मिळाले खरे; पण त्यासाठी कामगार विभागाकडे पुरेसा कर्मचारीवर्गच नसल्याने आठवड्यातून एकदा या कार्यालयाचे कुलूप उघडण्यात येते, अशी सध्याची परिस्थिती आहे. २०१४-१५मध्ये पालिकेच्या अंदाजपत्रकात भाषासंवर्धनासाठी तब्बल ६२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, यंदाच्या वर्षी (२०१५-१६) त्या तरतुदीमध्ये कमालीची कपात करून भाषेच्या संवर्धनासाठी ३ लाख ८ हजार ३६५ रुपयांचीच केवळ तरतूद करण्यात आली आहे. यातून महापालिकेचे भाषेबाबतचे बेगडी प्रेम एक प्रकारे दिसून येते. या संदर्भात कामगार विभागाचे शिवाजी दौंडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘आतापर्यंत समितीने जे उपक्रम सुचविले त्यांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये अगदी ग्रंथप्रदर्शन भरविणे, हस्ताक्षर स्पर्धा घेणे, २५ हजार मुलांचे कविसंमेलन आदी अनेक उपक्रम राबविले आहेत. या महिनाआखेर आकाशवाणीवर मराठी भाषेवर १० मिनिटांची मालिका सादर केली जाणार आहे. तसेच मराठी साहित्यविश्वात भरीव कामगिरी केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देणेही विचाराधीन आहे. समितीसाठी कार्यालय सुरू झाले असले, तरी अजूनही वारंवार मागणी करूनदेखील कर्मचारी उपलव्ध झालेले नाही. अपुऱ्या कर्मचाऱ्यांअभावी कार्यालय इतर दिवशी बंद ठेवावे लागते. महापालिकेत अनेक पदे रिक्त आहेत; मात्र अजूनही पदे भरण्यास शासनाची मंजुरी मिळालेली नाही, या कारणाबरोबरच समितीनेही अधिक चांगले उपक्रम देण्याची गरज आहे. समितीने जे उपक्रम सुचवले, त्याबाबत महापालिकेकडून कोणतीच पावले उचलली गेली नाहीत; त्यामुळे गतवर्षीचा निधी शिल्लक राहिला असल्याने यंदाच्या वर्षी निधीमध्ये कपात केली असावी, असे मला वाटते. भाषेविषयी गोडी लागावी म्हणून शिक्षकांचे संमेलन घेण्यात यावे, मराठीचे महत्त्व कळण्यासाठी छोट्याशा पुस्तिका काढून त्याचे शाळांमध्ये वाटप व्हावे आणि मुलांसाठी स्पर्धा घेण्यात याव्यात. तसेच, घर किंवा बंगल्यांना मराठीत नावे देणाऱ्या पुणेकरांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावे, अशा अनेक सूचना केल्या होत्या; मात्र त्याचे पुढे काहीच झाले नाही. - डॉ. न. म. जोशी, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि समिती सदस्य