शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

खेड-शिवापूर टोलनाक्यावर खोळंबा झाला, तर जा फुकट

By admin | Updated: December 2, 2015 04:13 IST

खेड-शिवापूर टोलनाक्यावरील कोंंडी सोडविण्यासाठी टोल प्रशासनाला दिलेली मुदत बुधवारी संपत असून, जर तीन मिनिटांच्या आत वाहनांकडून टोल घेतला नाही, तर टोल

पुणे : खेड-शिवापूर टोलनाक्यावरील कोंंडी सोडविण्यासाठी टोल प्रशासनाला दिलेली मुदत बुधवारी संपत असून, जर तीन मिनिटांच्या आत वाहनांकडून टोल घेतला नाही, तर टोल खुला करा, असे आदेश टोल प्रशासनाला देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यात सर्वाधिक वाहतूककोंडी होत असलेल्या मुंबई- बंगळुरू महामार्गावर खेड-शिवापूर हा टोलनाका आहे. येथे वाहनचालकांना नेहमीच अडकून बसावे लागते. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार रिलायन्स कंपनी यांच्यातील करारनाम्यात तीन मिनिटांत टोल वसूल करून वाहने सोडली जातील. अधिक वेळ लागला, तर रस्ता खुला केला जाईल, अशी तरतूद आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी या तरतुदीची अंमलबजावणी करा, अशा सूचना टोल प्रशासनाला दिल्या आहेत. सोमवारी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैैठक झाली.यात हा विषय चर्चिला गेला. या वेळी टोल प्रशासनाने जोपर्यंत सहापदरी रस्ता होत नाही, तोपर्यंत तीन मिनिटांत टोलवसुली होणे शक्य नाही. त्यामुळे तोपर्यंत मुदत द्या, अशी मागणी केली. यावर जिल्हा प्रशासनाने, टोलवसुली केली जाते, मग करारातील अटींप्रमाणे सेवा दिली पाहिजे, असे मत मांडले. यानंतर मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना, त्वरित उपाययोजना करा, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार ४८ तासांची मुदत दिली होती. ती मुदत उद्या २ डिसेंबरला संपत आहे. ३ मिनिटांत टोलनाक्यावरून वाहन पास होण्यासाठी काय उपाययोजना करीत आहोत, हे कळविण्यास सांगितले आहे. ते याची अंमलबजावणी कशी करणार आहेत ते बुधवारपर्यंत सांगणार आहेत. जर याबाबत काही कार्यवाही केली नाही, तर टोलवसुलीच्या प्रक्रियेत सुधारणांची पाहणी केली जाईल; अन्यथा सार्वजनिक उपद्रव कायदा कलम १३३ प्रमाणे टोलनाका खुला करण्याचे आदेश काढणार आहोत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.वाहतूककोंडी सोडविण्यासाठी हा एकमेव उपाय आहे. कार्यक्षमता वाढवा हीच आमची मागणी आहे. मोफत जाऊ देऊ नका; पण ३ मिनिटांच्या आत पैैसै घेतले पाहिजेत. या वेळेत पैसे घेतले नाहीत, तर वाहनचालकांनी पैसे न देता पुढे निघून जावे. लोकांना त्रास कमी होण्यासाठीच आम्ही कार्यवाही करणार आहोत.- सौरभ राव,जिल्हाधिकारी