शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

खाचर भातपिकाला फटका

By admin | Updated: October 31, 2015 01:11 IST

खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात हे मुख्य पीक असून यंदाही पावसाच्या अवेळी व लहरीपणामुळे त्याला फटका बसला. शेतभात जोमदार आले असले तरी खाचर भातावर मोठा परिणाम दिसत आहे.

आसखेड : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भात हे मुख्य पीक असून यंदाही पावसाच्या अवेळी व लहरीपणामुळे त्याला फटका बसला. शेतभात जोमदार आले असले तरी खाचर भातावर मोठा परिणाम दिसत आहे.करंजविहिरे, शिवे, वाहगाव, देशमुखवाडी गडद, वांद्रा, शेलू, आसखेड व परिसरातील गावांत भाताचे मुख्य पीक असते. पाऊस व हवामानाच्या लहरीपणामुळे येथील भात उत्पादक नेहमीच अडचणीतच असतो. पश्चिम पट्ट्यात भातपिकात विशेषत: कोलम, अंबेमोहर, इंद्रायणी, बासमती या प्रकारची भातलागवड करण्यात येते; परंतु यंदा पाऊस उशिरा आल्याने भात लागवडी उशिरा कराव्या लागल्या. खाचरात पाण्याअभावी लागवड वेळेत करता आली नाही. भातलागवडीवर, भाताच्या विविध जाती यावर योग्य मार्गदर्शक कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. तसेच भातपिकांवर विविध योजना व सवलती देणे व कार्यशाळांचे नियोजन करायला पाहिजे, असे मत शिवे येथील भातशेतकरी शांताराम शिवेकर यांनी व्यक्त केले. पावसाचा लहरीपणा, सततचे धुके, किड, विजेचा लपंडाव अशा अनेक संकटांस तोंड देऊन हजारो रुपये खर्चून शेतकरी भात पिकवतात. ााउलट पेरभात करणारे शेतकरी मात्र थोडेफार पाणी देऊन बऱ्याचदा चांगले उत्पादन घेत असतात. ज्या ज्या वेळी शासनाने दुष्काळ जाहीर केला त्या वेळी भात शेतकरी दुर्लक्षितच राहिला आहे, तर मग शासन कोणता सूड भातपिक शेतकऱ्यांवर उगवत आहे? असा सवाल निर्माण होत आहे. (वार्ताहर)