शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

खरीप वाया जाऊनही नाही दुष्काळ !

By admin | Updated: December 29, 2014 00:36 IST

संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे.

राजगुरुनगर : संपूर्ण खरीप हंगाम वाया जाऊनसुद्धा खेड तालुक्यात दुष्काळ नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाला असून, पीकपाहणीनंतर एकाही गावाची आणेवारी ५० पैशाच्या खाली नसल्याचे शासनाला आढळले आहे.यावर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. मुळात पाऊस सुरूव्हायला जुलै महिन्याचा मध्य उजाडला होता. पावसाची मृग आणि आर्द्रा ही दोन्ही नक्षत्रे कोरडी गेली होती. त्यामुळे बाजरी, भुईमूग या पिकांच्या पेरण्या खूप कमी प्रमाणात शेतकऱ्यांनी केल्या.कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार तालुक्यात खरिपाचे ४८५५७ हेक्टर खरिपाचे क्षेत्र आहे. त्यापैकी अवघ्या २७१५८ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. बाजरीचे सरासरी क्षेत्र ४२१० हेक्टर एवढे मुळातच घटले आहे. त्यापैकी केवळ ८१७ हेक्टरवर म्हणजे १९ टक्केच पेरणी यावर्षी झाली. भुईमूग पिकाचे क्षेत्र ११०८१ हेक्टर आहे. त्यापैकी केवळ ४७०५ हेक्टरवर म्हणजे ४२ टक्के पेरणी झाली. तूर, मूग, उडीद, मटकी, चवळी, घेवडा, वाल, पावटा, हुलगा या खरीप कडधान्यांच्याही पेरण्या फक्त ५३ टक्के झाल्या. बटाटा अवघा ५५ टक्के लावला गेला. बाजरी, भुईमूग, बटाटा, कडधान्ये ही खरिपाची प्रमुख पिकांची पेरच मुळात निम्मी झाली. त्यानंतर पावसाची अनियमितता, उशिरा पेर आणि हंगाम चक्र बिघडल्याने उत्पादन घटूनही शासनाला आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी दिसली नाही, हे नवलच झाले.