शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पावसाच्या प्रतीक्षेत खोळंबल्या खरीपाच्या पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या पावसाने उघडीप दिल्याने थांबल्या आहेत. एकूण खरीप क्षेत्राच्या फक्त १६ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या पावसाने उघडीप दिल्याने थांबल्या आहेत. एकूण खरीप क्षेत्राच्या फक्त १६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आता पावसाची प्रतीक्षा आहे.

जमिनीत पुरेशी ओल तयार झाल्याशिवाय पेरणी केली जात नाही. सुरुवात चांगली केल्यावर पावसाने अचानक दांडी मारली. राज्याचे खरीपाचे एकूण क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. त्यापैकी २२ लाख ७५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. हे प्रमाण १६.२ टक्के आहे. मागील वर्षी याच काळात एकूण खरीप क्षेत्रापैकी ५९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. हे प्रमाण ४२ टक्के होते.

खरीपात प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग, ऊडीद ही पिके घेतली जातात. शेतजमिनीची पेरणीपूर्व मशागत करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज आहेत. मात्र कमी पावसात व जमिनीत ओलावा नसताना पेरणी झाली तर बियाणे ओलीअभावी सुकून जाते. दुबार पेरणीचे संकट येते. हा धोका नको म्हणून पावसाची प्रतीक्षा होत आहे.

कोकण विभागात आतापर्यंत बऱ्यापैकी जोरदार पाऊस झाला. पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर या विभागात हलका, मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. नाशिक लातूर विभागातही पावसाचे प्रमाण अजून कमीच आहे. राज्यात आतापर्यंत सरासरी पाऊस १४५.३ मि.मी. आहे. मागील वर्षी हेच प्रमाण १७५.७० मि.मी. होते.

कृषी विभागाचे आवाहन

सुरुवातीच्या पावसात शेतकऱ्यांकडून धूळ पेरणी होते. कृषी विभागाकडून थोड्याशा पावसानंतर लगेच नेहमीच्या पेरणीची घाई करू नका, असे आवाहन करण्यात येत होते. पावसाचे आता मृग नक्षत्र येईल. सहसा मृगाच्या पावसानंतर पेरण्यांना जोराची सुरुवात होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मृगाच्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.