शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीक पॅटर्न बदलतोय

By admin | Updated: August 31, 2016 01:23 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे.

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे. भाजीपाला, कडधान्ये व फळलागवडीकडे शेतकरी वळत आहेत. जिल्ह्यात खरिपात ६ हजार ६६३.४७ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली असून, सोयाबीन ३९५, मूग २१६ तर मका यांची १६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे असलेले भातपिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असून, या वर्षी ७२ टक्केच लागवड झाली आहे. गेली काही वर्षे पडत असलेल्या अनियमित पावसामुळेही हा बदल होत आहे. या वर्षी जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस असल्याने या परिसरात घेत असलेल्या खरीप हंगामाची स्थिती चांगली आहे. ऊस वगळता १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली आहे. आजअखेर एकूण १०,५८२.२ मि.मी. एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ८१४.० मि.मी. आहे. हा पाऊस पश्चिम भागात चांगला झाला असून, खरीप पिके याच क्षेत्रात घेतली जातात. यात भातपीक हे सर्वांत मोठ्या प्रमाणात म्हणजे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. मात्र, काही दिवसांपासून भाताचे क्षेत्र कमी होत आहे. या वर्षी ७ हजार २९०.५३ हेक्टरवर भातपीक घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, आतापर्यंत फक्त ७२ टक्के म्हणजे ५ हजार २१०.८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यापुढे लागवड होणार नसल्याने हे क्षेत्र याही वर्षी घटले आहे. मुळशी, मावळ, हवेली, भोर व वेल्हे या तालुक्यांत जमीनविक्री वाढली आहे. त्यामुळे जमिनीला कंपाऊंड पडले असून, तेथे पीक घेणे बंद झाले आहे. त्यामुळे भातपीक कमी होत असल्याचे जिल्ह्याचे कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे झपाट्याने वाढत आहेत. पीएमआरडीए क्षेत्रातही नागरी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्गाची भाजीपाला, फळे, कडधान्यांची जास्त मागणी आहे. हे लक्षात घेता, पारंपरिक पीक न घेता मागणीप्रमाणे पीक घेण्याकडे शेतकरी वळत आहे.बाजरीचे मोठे क्षेत्र होते. त्याची जागा आता बटाटापीक घेत आहे. तसेच, येथे सोयाबीन पीक घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षी तर ३९५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे.१० ते १५ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी ज्वारीपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. तेथील शेतकरी आता मकापिकाकडे वळत आहेत.