शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
3
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
4
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
5
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
6
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
7
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
8
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
9
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
10
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
11
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
12
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
13
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
14
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
15
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
16
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
17
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
18
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
19
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
20
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा

खरीप पीक पॅटर्न बदलतोय

By admin | Updated: August 31, 2016 01:23 IST

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे.

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांत झपाट्याने होत असलेल्या नागरीकरणाचा परिणाम जिल्ह्यातील कृषिक्षेत्रावर होत असून, खरिपाचा पीक पॅटर्न बदलत आहे. भाजीपाला, कडधान्ये व फळलागवडीकडे शेतकरी वळत आहेत. जिल्ह्यात खरिपात ६ हजार ६६३.४७ हेक्टरवर भाजीपाल्याची लागवड झाली असून, सोयाबीन ३९५, मूग २१६ तर मका यांची १६४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे असलेले भातपिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत असून, या वर्षी ७२ टक्केच लागवड झाली आहे. गेली काही वर्षे पडत असलेल्या अनियमित पावसामुळेही हा बदल होत आहे. या वर्षी जिल्ह्याच्या पश्चिम भागात चांगला पाऊस असल्याने या परिसरात घेत असलेल्या खरीप हंगामाची स्थिती चांगली आहे. ऊस वगळता १३२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जून महिना कोरडा गेल्याने खरीप हंगाम वाया जातो की काय, अशी भीती निर्माण झालेल्या बळीराजाला पावसाने चांगली साथ दिली आहे. आजअखेर एकूण १०,५८२.२ मि.मी. एवढा पाऊस झाला असून, तो सरासरी ८१४.० मि.मी. आहे. हा पाऊस पश्चिम भागात चांगला झाला असून, खरीप पिके याच क्षेत्रात घेतली जातात. यात भातपीक हे सर्वांत मोठ्या प्रमाणात म्हणजे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. मात्र, काही दिवसांपासून भाताचे क्षेत्र कमी होत आहे. या वर्षी ७ हजार २९०.५३ हेक्टरवर भातपीक घेण्याचे कृषी विभागाचे नियोजन होते. मात्र, आतापर्यंत फक्त ७२ टक्के म्हणजे ५ हजार २१०.८९ हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. यापुढे लागवड होणार नसल्याने हे क्षेत्र याही वर्षी घटले आहे. मुळशी, मावळ, हवेली, भोर व वेल्हे या तालुक्यांत जमीनविक्री वाढली आहे. त्यामुळे जमिनीला कंपाऊंड पडले असून, तेथे पीक घेणे बंद झाले आहे. त्यामुळे भातपीक कमी होत असल्याचे जिल्ह्याचे कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पुणे, पिंपरी-चिंचवड ही शहरे झपाट्याने वाढत आहेत. पीएमआरडीए क्षेत्रातही नागरी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या वर्गाची भाजीपाला, फळे, कडधान्यांची जास्त मागणी आहे. हे लक्षात घेता, पारंपरिक पीक न घेता मागणीप्रमाणे पीक घेण्याकडे शेतकरी वळत आहे.बाजरीचे मोठे क्षेत्र होते. त्याची जागा आता बटाटापीक घेत आहे. तसेच, येथे सोयाबीन पीक घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. या वर्षी तर ३९५ टक्के क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झाली आहे.१० ते १५ वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी ज्वारीपीक मोठ्या प्रमाणात घेतले जात होते. तेथील शेतकरी आता मकापिकाकडे वळत आहेत.