शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

खानवटेकरांचा वाळूउपशाला विरोध

By admin | Updated: August 18, 2015 03:43 IST

येथील नदीपात्रात यापुढे काही झाले, तरी वाळूउपसा होऊ द्यायचा नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठरावही यापुढे दिला जाणार नाही, अशी

राजेगाव : खानवटे (ता. दौंड) येथील नदीपात्रात यापुढे काही झाले, तरी वाळूउपसा होऊ द्यायचा नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीचा ठरावही यापुढे दिला जाणार नाही, अशी भीमप्रतिज्ञा नागरिकांनी ग्रामसभेत केली. सरपंच बबनराव धायतोंडे यांच्या अध्यक्षतेखाली १५ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत उपस्थित सर्वच नागरिकांनी बहुमताने वाळूउपसा करण्यासाठी लिलावाला विरोध करण्याचा ठराव मंजूर केला.या आर्थिक वर्षामध्ये शासनाच्या आदेशानुसार वाळू लिलाव करण्याचे पत्र तहसीलदारांना दि. २३/६/२०१५ रोजी आले होते. या पत्रानुसार ग्रामसभेत वाळू लिलाव करण्याचा ठराव मंजूर करण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी ग्रामसभेस उपस्थित नागरिकांना सविस्तर माहिती दिली. तेव्हा ग्रामसभेतील उपस्थित नागरिकांनी ओव्हरलोड वाळू वाहतुकीने खराब होणाऱ्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपाय म्हणून वाळू वाहतुकीने नादुरुस्त झालेला रस्ता हा शासनाकडून प्रथम मंजूर करून घ्यावा व तो दुरुस्त करून घ्यावा, असे सर्वानुमते ठरले. ग्रामसभेत शाहूराजे राजेभोसले यांनी उभे राहून लिलाव होऊ देऊ नये व इतर ठिकाणचा बदली भूखंड म्हणूनदेखील खानवटे गावच्या नदीपात्रातील वाळूउपसा होऊ नये, अशी सूचना मांडली. या सूचनेला ग्रामसभेत उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांनी वाळू लिलावला विरोध केला. तसेच, २०१५-२०१६ या वर्षात कोणत्याही परिस्थितीत वाळू लिलाव होऊ देऊ नये, असे सर्वानुमते ठरले. गतवर्षी झालेल्या वाळू लिलावातील ३0 टक्के रक्कम लवकरात लवकर ग्रामपंचायत खाती वर्ग करण्यात यावेत, हा विषय मांडला. अ‍ॅड. किशोर माहूरकर यांनी याला अनुमोदन दिले. या वेळी सरपंच बबनराव धायतोंडे, उपसरपंच शंकर पवार, ग्रामसेवक डी. बी. शिंदे, दौंड तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष हनुमंत कन्हेरकर,शाहूराजे राजेभोसले, अ‍ॅड. किशोर माहूरकर, राजेंद्र झोंड, शरद ढवळे, अंकुश माहुरकर, बापू थोरात, संतोष लोंढे, रवी भोसले आदी उपस्थित होते. याबाबत सरपंच बबनराव धायतोंडे म्हणाले, की गावातील जनतेने सर्वसंमतीने घेतलेला निर्णय ग्रामपंचायतीला मान्य राहील. ३० टक्के रक्कम मिळण्यासाठी ग्रामपंचायत पाठपुरावा करत आहे. ती रक्कम मिळाल्यानंतर त्या रकमेचा उपयोग गावाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे पूर्णपणे वापरला जाईल.