शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

‘खाकी’मुळे जुळले जीवनगाणे

By admin | Updated: July 12, 2016 01:36 IST

‘सैराट झालं जी...’ म्हणून तरुणाई मुक्त झाली असली तरी ‘खानदान की इज्जत’साठी प्रेमीजनांची ताटातूट करण्याचे प्रकार होतच आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी सकारात्मकपणे

पुणे : ‘सैराट झालं जी...’ म्हणून तरुणाई मुक्त झाली असली तरी ‘खानदान की इज्जत’साठी प्रेमीजनांची ताटातूट करण्याचे प्रकार होतच आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी सकारात्मकपणे प्रयत्न करून एका दांपत्याच्या रेशीमगाठी पुन्हा जुळविल्या. खऱ्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी बड्या राजकीय पदाधिकाऱ्यांचा दबावही मानला नाही. मराठवाड्यातील एका राजकीय कुटुंबातील तरुणीची पुण्यात शिक्षणासाठी आली असता एकाशी मैत्री झाली. यातूनच प्रेम बहले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आळंदीला जाऊन त्यांनी लग्नही केले. तरुणाच्या कुटुंबियांची या लग्नाला संमती होती. मुलीने मात्र माहेरच्यांकडून ही बाब लपवली होती. परंतु, तिच्या सासऱ्यांनी माहेरच्यांना लग्नाबाबत सांगावे असा आग्रह धरला. मुंबईमध्ये असलेल्या नातेवाईक डॉक्टर दाम्पत्याला लग्नाबाबत सांगताच ते पुण्यात आले. त्यांनी तरुणीचे लग्न झाल्याची खात्री करुन तिच्या चुलत्यांना याची माहिती कळवली. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांना हे मान्य नव्हते. वडील लहानपणीच गेल्याने राजकीय पदाधिकारी असलेल्या चुलत्याने तिचे संगोपन केले होते. इमोशनल ब्लॅकमेल करीत आईने चुलत्याला हृदयविकाराचा अ‍ॅटॅक आल्याची बतावणी करून मुलीला घरी नेते म्हणून सांगितले. पतीला संशय असल्याने त्याने परत सोडण्याबाबत लेखी घेतले होते. त्याप्रमाणे आई मुलीला घेऊन गेली. मात्र, त्यानंतर एमबीए झालेल्या या उच्चशिक्षित तरुणीला तब्बल अडीच महिने डांबून ठेवले. ही तरुणी आजी आणि मोलकरणीच्या मोबाईलवरून पतीला मेसेज पाठवीत होती. वकील असलेल्या पतीने याबाबत परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे यांच्याकडे अर्ज दाखल केला. त्यानुसार, मुलीसह तिचे चुलते आणि आईला पुण्यात बोलावून घेण्यात आले. प्रवासात असतानाच चुलते आणि आईने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने या मुलीने माहेरी रहायचे असल्याचा जबाब दिला. त्यामुळे तिला त्यांच्यासोबत परत पाठवावे लागले. (प्रतिनिधी)