शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
4
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
5
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
6
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
7
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
8
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
9
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
10
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
11
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
12
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
13
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
14
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
15
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
16
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
17
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
18
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
20
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली

रावणगावजवळ खडकवासला कॅनॉल फुटला, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:10 IST

रावणगाव येथे खडकवासला कॅनॉलला घळ पडून भिंत पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने कुठलीही ...

रावणगाव येथे खडकवासला कॅनॉलला घळ पडून भिंत पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आसपासच्या परिसरातील आर्थिक नुकसान झाले. ओढ्याच्या नजीक असलेल्या विहिरी पाण्याच्या प्रवाहामुळे मातीने बुजून गेल्या. शेती पंप जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्याखाली गेले, तर काही शेतकऱ्यांचे पाईप वाहून गेले. शेततळ्यांचे बांध फुटले तसेच ताली फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

ही घटना खडकवासला साखळी क्रमांक १३५/२०० येथे आज बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी घडली. कालवा फुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने रावणगाव परिसरात एकच घबराट पसरली. शेतीपंप पाण्याखाली जाऊ नयेत म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. तर दुसरीकडे मात्र फुटलेला कॅनॉल आणि पाण्याचा वेग पाहण्यासाठी बघ्यांची मात्र एकच गर्दी उसळली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून रावणगाव येथील पाटबंधारे शाखेचे अभियंता विनय पागे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाहणी करून वरिष्ठांना कळविले. आणि या कॅनॉलचे पाणी भिगवण ब्रँचकडे आणि तलावात वळविले. आणि त्यानंतर पाटबंधारे खात्याच्या यांत्रिक विभागाच्या मशिनरी आणि टिपर बोलवून दुपारी एक वाजता कॅनॉल दुरुस्तीचे काम चालू केले.

पाटबंधारे खात्याच्या चुकीमुळे घडली घटना.

हा कालव्याला कित्येक वर्षांपासून त्या ठिकाणी गळती होती. परंतु पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे आरोप येथील शेतकरी वर्गाकडून केला जातो आहे. कालव्याला पाणी आल्यावर गळतीचे पाणी येथील वाड्या-वस्त्यांमध्ये पाझरून रोज लाखो लिटर पाणी वाया जाते. जर रात्री अपरात्री कॅनॉल फुटला तर मोठी मोठी दुर्घटना घडू शकते.

शेततळ्याचा भरावा वाहून गेल्याने नुकसान – सखाराम गाढवे, शेतकरी रावणगाव

कॅनॉल फुटल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते आहे.

कालव्याला थोडासा घळ पडून तो वाढला. ओढ्याच्या जवळच ही घटना झालेली आहे. यापूर्वी येथे गळती वगैरे काही नव्हती त्यामुळे दुर्लक्ष केलेले नाही. पाण्याचा प्रवाह शिर्सुफळ तळ्यात आणि भिगवण बीबीसीकडे वळवून कालवा दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करुन पुढील कार्यवाही करू.. विनय पागे

शाखा अभियंता

खडकवासला पाटबंधारे विभाग रावणगाव शाखा