शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
3
२० क्विंटल स्फोटकांची खरेदी अन् पैशांवरुन वाद; ४ शहरांमध्ये IED हल्ला करण्याचा होता दहशतवाद्यांचा प्लॅन
4
दिल्ली कार हल्ल्याचा मास्टरमाईंड डॉ. उमर कुणाकडून घेत होता आदेश? धक्कादायक माहिती आली समोर
5
कर्मचाऱ्यांना दररोज ऑफिसला येण्याचा आदेश, ६०० जणांनी राजीनामा दिला; कंपनीला बसला ₹१,५३५ कोटींचा फटका
6
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
7
Groww IPO Listing: Google सारखीच आहे Groww ची कहाणी! एक चूक आणि बनलं ओळखीचं नाव, शेअर बाजारातही केलं अवाक्
8
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
9
'३ इडियट्स'मधील मिलीमीटर पत्नीसोबत दिसला दिल्लीच्या रस्त्यावर, १६ वर्षांनंतर त्याला ओळखणं झालं कठीण
10
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
11
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
12
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
13
वोटचोरीसह सरकार नोकरी चोर निघाले, वर्षाला २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासनाचे काय?: काँग्रेस
14
FREE मध्ये अपडेट होतंय Aadhaar Card, वर्षभरासाठी माफ झाली फी; पाहा कोणाला मिळणार फायदा?
15
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
16
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
17
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
18
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
19
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
20
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र

रावणगावजवळ खडकवासला कॅनॉल फुटला, शेतकऱ्यांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:10 IST

रावणगाव येथे खडकवासला कॅनॉलला घळ पडून भिंत पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने कुठलीही ...

रावणगाव येथे खडकवासला कॅनॉलला घळ पडून भिंत पडल्याने ऐन उन्हाळ्यात लाखो लिटर पाणी वाया गेले. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी आसपासच्या परिसरातील आर्थिक नुकसान झाले. ओढ्याच्या नजीक असलेल्या विहिरी पाण्याच्या प्रवाहामुळे मातीने बुजून गेल्या. शेती पंप जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे पाण्याखाली गेले, तर काही शेतकऱ्यांचे पाईप वाहून गेले. शेततळ्यांचे बांध फुटले तसेच ताली फुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.

ही घटना खडकवासला साखळी क्रमांक १३५/२०० येथे आज बुधवारी (दि. २६) सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी घडली. कालवा फुटल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरल्याने रावणगाव परिसरात एकच घबराट पसरली. शेतीपंप पाण्याखाली जाऊ नयेत म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली. तर दुसरीकडे मात्र फुटलेला कॅनॉल आणि पाण्याचा वेग पाहण्यासाठी बघ्यांची मात्र एकच गर्दी उसळली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून रावणगाव येथील पाटबंधारे शाखेचे अभियंता विनय पागे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पाहणी करून वरिष्ठांना कळविले. आणि या कॅनॉलचे पाणी भिगवण ब्रँचकडे आणि तलावात वळविले. आणि त्यानंतर पाटबंधारे खात्याच्या यांत्रिक विभागाच्या मशिनरी आणि टिपर बोलवून दुपारी एक वाजता कॅनॉल दुरुस्तीचे काम चालू केले.

पाटबंधारे खात्याच्या चुकीमुळे घडली घटना.

हा कालव्याला कित्येक वर्षांपासून त्या ठिकाणी गळती होती. परंतु पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे आरोप येथील शेतकरी वर्गाकडून केला जातो आहे. कालव्याला पाणी आल्यावर गळतीचे पाणी येथील वाड्या-वस्त्यांमध्ये पाझरून रोज लाखो लिटर पाणी वाया जाते. जर रात्री अपरात्री कॅनॉल फुटला तर मोठी मोठी दुर्घटना घडू शकते.

शेततळ्याचा भरावा वाहून गेल्याने नुकसान – सखाराम गाढवे, शेतकरी रावणगाव

कॅनॉल फुटल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जाते आहे.

कालव्याला थोडासा घळ पडून तो वाढला. ओढ्याच्या जवळच ही घटना झालेली आहे. यापूर्वी येथे गळती वगैरे काही नव्हती त्यामुळे दुर्लक्ष केलेले नाही. पाण्याचा प्रवाह शिर्सुफळ तळ्यात आणि भिगवण बीबीसीकडे वळवून कालवा दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी करुन पुढील कार्यवाही करू.. विनय पागे

शाखा अभियंता

खडकवासला पाटबंधारे विभाग रावणगाव शाखा