शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिक ठार; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
2
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
3
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
7
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
8
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
9
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
10
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
11
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
12
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
13
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
14
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
15
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
16
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
17
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
18
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
19
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
20
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण

मतभेद बाजूला ठेवून प्रश्न सोडवणार

By admin | Updated: May 23, 2016 01:51 IST

शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा

भोर : शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा, शहरातील अतिक्रमणे, अशा विविध महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा होऊन आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, शहर व तालुक्यातील विविध प्रश्न, राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘लोकमत’च्या माध्यमातून एकत्रितरीत्या सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील पंचायत समितीच्या सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी सभापती रणजित शिवतरे, कॉ. ज्ञानोबा घोणे, नगरसेवक यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जयश्री शिंदे, दिलीप बाठे, भगवान कंक, प्रमोद कुलकर्णी, सीमा तनपुरे, रेखा टापरे, नितीन धारणे, कुणाल धुमाळ, प्रशांत जाधव, राहुल दिघे, सुदाम ओंबळे, पंडित गोळे, भीमराव शिंदे, मनीषा राजिवडे, सुनंदा गायकवाड, गीतांजली शेटे, दिलावर पटेल, विठ्ठल टिळेकर, पल्लवी फडणीस, तुकाराम रोमण, सूर्यकांत माने, सिद्धार्थ टापरे, शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.प्रलंबित औद्योगिक वसाहत, तालुका पर्यटन म्हणून घोषित करावा, भीषण पाणीटंचाई, महाड-पंढरपूर रोड साईटपट्ट्या, वाहतूककोंडी, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही. अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.प्लॅस्टिकचा वापर थांबवावाशहरात प्लॅस्टिकचा वापर बंद केला आहे. तरी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर केला जातो. नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. नाला सफाई होत नाही, ती करण्याची मागणी पल्लवी फडणीस यांनी केली. यावर माजी नगराध्यक्षा जयश्री शिंदे म्हणाल्या, की प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. तसा ठरावही करण्यात आला आहे. त्यामुळे कचरा व प्लॅस्टिक रस्त्यावर टाकू नका, सफाईचे काम सुरू असून, लवकरच पूर्ण केले जाईल. पार्किंगची सोय करावीभोर शहरात एसटी स्टॅँडवर वाहतूककोंडीमुळे अपघात घडतात आणी संपूर्ण शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याकडे भोर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी पार्किंगची सोय करण्याची मागणी सीमा तनपुरे यांनी केली.४भोर तालुक्यातील डेरे येथील दोन शिक्षकांची मॅच्युअल बदली करण्यात आली. मात्र, दुसरे शिक्षक येण्याअधीच शिक्षकांना सोडल्याने शाळेवर अद्याप शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.४भोर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई सुरू असून, दोन टॅँकर सुरू आहेत. टंचाई कक्ष स्थापन केला नसून, ९० टक्के अधिकारी पुण्यात राहात आहेत. टॅँकर सुरू करण्यासाठी जायचे कुणाकडे, त्यामुळे सर्वच अधिकारी मुख्यालयात राहिले पाहिजे; अन्यथा कारवाईची मागणी भगवान कंक यांनी केली आहे.