शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद बाजूला ठेवून प्रश्न सोडवणार

By admin | Updated: May 23, 2016 01:51 IST

शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा

भोर : शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा, शहरातील अतिक्रमणे, अशा विविध महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा होऊन आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, शहर व तालुक्यातील विविध प्रश्न, राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘लोकमत’च्या माध्यमातून एकत्रितरीत्या सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील पंचायत समितीच्या सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी सभापती रणजित शिवतरे, कॉ. ज्ञानोबा घोणे, नगरसेवक यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जयश्री शिंदे, दिलीप बाठे, भगवान कंक, प्रमोद कुलकर्णी, सीमा तनपुरे, रेखा टापरे, नितीन धारणे, कुणाल धुमाळ, प्रशांत जाधव, राहुल दिघे, सुदाम ओंबळे, पंडित गोळे, भीमराव शिंदे, मनीषा राजिवडे, सुनंदा गायकवाड, गीतांजली शेटे, दिलावर पटेल, विठ्ठल टिळेकर, पल्लवी फडणीस, तुकाराम रोमण, सूर्यकांत माने, सिद्धार्थ टापरे, शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.प्रलंबित औद्योगिक वसाहत, तालुका पर्यटन म्हणून घोषित करावा, भीषण पाणीटंचाई, महाड-पंढरपूर रोड साईटपट्ट्या, वाहतूककोंडी, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही. अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.प्लॅस्टिकचा वापर थांबवावाशहरात प्लॅस्टिकचा वापर बंद केला आहे. तरी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर केला जातो. नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. नाला सफाई होत नाही, ती करण्याची मागणी पल्लवी फडणीस यांनी केली. यावर माजी नगराध्यक्षा जयश्री शिंदे म्हणाल्या, की प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. तसा ठरावही करण्यात आला आहे. त्यामुळे कचरा व प्लॅस्टिक रस्त्यावर टाकू नका, सफाईचे काम सुरू असून, लवकरच पूर्ण केले जाईल. पार्किंगची सोय करावीभोर शहरात एसटी स्टॅँडवर वाहतूककोंडीमुळे अपघात घडतात आणी संपूर्ण शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याकडे भोर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी पार्किंगची सोय करण्याची मागणी सीमा तनपुरे यांनी केली.४भोर तालुक्यातील डेरे येथील दोन शिक्षकांची मॅच्युअल बदली करण्यात आली. मात्र, दुसरे शिक्षक येण्याअधीच शिक्षकांना सोडल्याने शाळेवर अद्याप शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.४भोर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई सुरू असून, दोन टॅँकर सुरू आहेत. टंचाई कक्ष स्थापन केला नसून, ९० टक्के अधिकारी पुण्यात राहात आहेत. टॅँकर सुरू करण्यासाठी जायचे कुणाकडे, त्यामुळे सर्वच अधिकारी मुख्यालयात राहिले पाहिजे; अन्यथा कारवाईची मागणी भगवान कंक यांनी केली आहे.