शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद बाजूला ठेवून प्रश्न सोडवणार

By admin | Updated: May 23, 2016 01:51 IST

शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा

भोर : शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा, शहरातील अतिक्रमणे, अशा विविध महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा होऊन आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, शहर व तालुक्यातील विविध प्रश्न, राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘लोकमत’च्या माध्यमातून एकत्रितरीत्या सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील पंचायत समितीच्या सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी सभापती रणजित शिवतरे, कॉ. ज्ञानोबा घोणे, नगरसेवक यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जयश्री शिंदे, दिलीप बाठे, भगवान कंक, प्रमोद कुलकर्णी, सीमा तनपुरे, रेखा टापरे, नितीन धारणे, कुणाल धुमाळ, प्रशांत जाधव, राहुल दिघे, सुदाम ओंबळे, पंडित गोळे, भीमराव शिंदे, मनीषा राजिवडे, सुनंदा गायकवाड, गीतांजली शेटे, दिलावर पटेल, विठ्ठल टिळेकर, पल्लवी फडणीस, तुकाराम रोमण, सूर्यकांत माने, सिद्धार्थ टापरे, शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.प्रलंबित औद्योगिक वसाहत, तालुका पर्यटन म्हणून घोषित करावा, भीषण पाणीटंचाई, महाड-पंढरपूर रोड साईटपट्ट्या, वाहतूककोंडी, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही. अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.प्लॅस्टिकचा वापर थांबवावाशहरात प्लॅस्टिकचा वापर बंद केला आहे. तरी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर केला जातो. नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. नाला सफाई होत नाही, ती करण्याची मागणी पल्लवी फडणीस यांनी केली. यावर माजी नगराध्यक्षा जयश्री शिंदे म्हणाल्या, की प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. तसा ठरावही करण्यात आला आहे. त्यामुळे कचरा व प्लॅस्टिक रस्त्यावर टाकू नका, सफाईचे काम सुरू असून, लवकरच पूर्ण केले जाईल. पार्किंगची सोय करावीभोर शहरात एसटी स्टॅँडवर वाहतूककोंडीमुळे अपघात घडतात आणी संपूर्ण शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याकडे भोर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी पार्किंगची सोय करण्याची मागणी सीमा तनपुरे यांनी केली.४भोर तालुक्यातील डेरे येथील दोन शिक्षकांची मॅच्युअल बदली करण्यात आली. मात्र, दुसरे शिक्षक येण्याअधीच शिक्षकांना सोडल्याने शाळेवर अद्याप शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.४भोर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई सुरू असून, दोन टॅँकर सुरू आहेत. टंचाई कक्ष स्थापन केला नसून, ९० टक्के अधिकारी पुण्यात राहात आहेत. टॅँकर सुरू करण्यासाठी जायचे कुणाकडे, त्यामुळे सर्वच अधिकारी मुख्यालयात राहिले पाहिजे; अन्यथा कारवाईची मागणी भगवान कंक यांनी केली आहे.