शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

मतभेद बाजूला ठेवून प्रश्न सोडवणार

By admin | Updated: May 23, 2016 01:51 IST

शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा

भोर : शहरातील एकेरी वाहतूक, घनकचरा व्यवस्थापन, प्रलंबित असलेला औद्योगिक वसाहतीचा प्रश्न, पाणीटंचाई, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही आणि भोर तालुका पर्यटन म्हणून जाहीर करावा, शहरातील अतिक्रमणे, अशा विविध महत्त्वाच्या विषयावर जोरदार चर्चा होऊन आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, शहर व तालुक्यातील विविध प्रश्न, राजकीय मतभेद बाजूला ठेवून ‘लोकमत’च्या माध्यमातून एकत्रितरीत्या सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला.येथील पंचायत समितीच्या सभागृहात ‘लोकमत आपल्या दारी ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष विठ्ठल शिंदे, माजी सभापती रणजित शिवतरे, कॉ. ज्ञानोबा घोणे, नगरसेवक यशवंत डाळ, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. जयश्री शिंदे, दिलीप बाठे, भगवान कंक, प्रमोद कुलकर्णी, सीमा तनपुरे, रेखा टापरे, नितीन धारणे, कुणाल धुमाळ, प्रशांत जाधव, राहुल दिघे, सुदाम ओंबळे, पंडित गोळे, भीमराव शिंदे, मनीषा राजिवडे, सुनंदा गायकवाड, गीतांजली शेटे, दिलावर पटेल, विठ्ठल टिळेकर, पल्लवी फडणीस, तुकाराम रोमण, सूर्यकांत माने, सिद्धार्थ टापरे, शिवभक्त व नागरिक उपस्थित होते.प्रलंबित औद्योगिक वसाहत, तालुका पर्यटन म्हणून घोषित करावा, भीषण पाणीटंचाई, महाड-पंढरपूर रोड साईटपट्ट्या, वाहतूककोंडी, विविध योजनांची अंमलबजावणी होत नाही. अशा अनेक प्रश्नांवर चर्चा झाली.प्लॅस्टिकचा वापर थांबवावाशहरात प्लॅस्टिकचा वापर बंद केला आहे. तरी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा वापर केला जातो. नळांना तोट्या नसल्याने पाणी वाया जाते. नाला सफाई होत नाही, ती करण्याची मागणी पल्लवी फडणीस यांनी केली. यावर माजी नगराध्यक्षा जयश्री शिंदे म्हणाल्या, की प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. तसा ठरावही करण्यात आला आहे. त्यामुळे कचरा व प्लॅस्टिक रस्त्यावर टाकू नका, सफाईचे काम सुरू असून, लवकरच पूर्ण केले जाईल. पार्किंगची सोय करावीभोर शहरात एसटी स्टॅँडवर वाहतूककोंडीमुळे अपघात घडतात आणी संपूर्ण शहरात वारंवार वाहतुकीची कोंडी होते. याकडे भोर पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी पार्किंगची सोय करण्याची मागणी सीमा तनपुरे यांनी केली.४भोर तालुक्यातील डेरे येथील दोन शिक्षकांची मॅच्युअल बदली करण्यात आली. मात्र, दुसरे शिक्षक येण्याअधीच शिक्षकांना सोडल्याने शाळेवर अद्याप शिक्षकच नाही. त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.४भोर तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई सुरू असून, दोन टॅँकर सुरू आहेत. टंचाई कक्ष स्थापन केला नसून, ९० टक्के अधिकारी पुण्यात राहात आहेत. टॅँकर सुरू करण्यासाठी जायचे कुणाकडे, त्यामुळे सर्वच अधिकारी मुख्यालयात राहिले पाहिजे; अन्यथा कारवाईची मागणी भगवान कंक यांनी केली आहे.