शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मतभेद दूर ठेवत बहुळ गावची यात्रा भरली ३५ वर्षांनंतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 01:41 IST

ज्येष्ठ नागरिक, तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांची संकल्पना यशस्वी

शेलपिंपळगाव : बहुळ (ता. खेड) येथे गावातील राजकारण व मतभेद बाजूला ठेवून तब्बल ३५ वर्षांनंतर गावातील ग्रामदैवत श्रीभैरवनाथ महाराजांची यात्रा एकत्रित साजरी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेली ही संकल्पना इतरांपुढे आदर्श निर्माण करणारी आहे.श्री भैरवनाथ महाराजांना हारतुरे, महानैवेद्य, महापूजा करून सवाद्य वाजतगाजत छबिना मिरवणूक; तसेच धार्मिक भजनाने उत्सवात अधिक रंग भरला. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ग्रामदेवाची विधिवत पूजा करून सकाळी नऊ ते दोन यावेळात सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सायंकाळी चारला जंगी निकाली कुस्त्यांच्या आखाड्यास प्रारंभ झाला. कुस्त्यांच्या आखाड्याचे उद्घाटन व बक्षीस वितरण पुणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुहास कुलकर्णी, आमदार सुरेश गोरे, माजी आमदार दिलीप मोहिते - पाटील, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, छत्रपती पुरस्कार विजेते गोविंद पवार व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, सरपंच गणेश वाडेकर, उपसरपंच समाधान पानसरे, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब खलाटे, पोलीस पाटील केशव साबळे, तंटामक्ती समितीचे अध्यक्ष गुलाब वाडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धैर्यशील पानसरे, राजाभाऊ तांबे, बाळासाहेब वाडेकर, पठाणराव वाडेकर, संदीप साबळे, राजाभाऊ साबळे, नाथाभाऊ वाडेकर, दादाराव वाडेकर, धनंजय पठारे आदींसह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्ह्यातील नामांकित मल्लांनी कुस्त्यांच्या आखाड्यात सहभाग घेऊन आपल्या खेळाची चमक दाखविली. या वेळी रोख पाचशे रुपयांपासून ५१ हजार रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलातील महाराष्ट्र चॅम्पियन अरुण खेंगले विरुद्ध आर्मीच्या तान्हाजी वरखडे यांच्या अखेरच्या लढतीत अरुण खेंगलेने बाजी मारली. विजेत्या मल्लांना गावच्या वतीने रोख बक्षिसे, तसेच बबन म्हस्के यांच्या माध्यमातून गोल्ड मेडल व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. आखाड्यात पै. अनिल साबळे, सखाराम वाडेकर यांनी पंच म्हणून, तर पठाणराव वाडेकर, राजूभाऊ तांबे यांनी समालोचन केले.

टॅग्स :Khedखेड