शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

प्रसादामध्ये स्वच्छतेचे निकष पाळा,गिरीश बापट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 03:28 IST

प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया प्रत्येक घटकाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. त्याचप्रमाणे तेथे स्वच्छतेचे निकष पाळले गेलेच पाहिजेत. सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी लोकांनीही सजग राहिले पाहिजे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केले.

पुणे : प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणाºया प्रत्येक घटकाची गुणवत्ता उत्तम असली पाहिजे. त्याचप्रमाणे तेथे स्वच्छतेचे निकष पाळले गेलेच पाहिजेत. सुरक्षित अन्न मिळवण्यासाठी लोकांनीही सजग राहिले पाहिजे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी केले.धार्मिक स्थळी भाविकांना दिला जाणारा प्रसाद हा अधिक सुरक्षित असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागामार्फत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटप्रसंगी बापट बोलत होते. या वेळी उद्योजक आनंद चोरडिया उपस्थित होते.बापट म्हणाले, ‘‘लोकांना अधिक सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यभर कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत.या कार्यशाळेत विविध धार्मिक प्रसादालयातील विश्वस्त, आचारी, कर्मचारी तसेच परिसरातील हॉटेल खाद्यपदार्थ विक्रेते यांना सुरक्षित अन्न पदाथार्ची निर्मिती, साठवणूक व वाटप वितरण या बाबत प्रशिक्षित केले जात आहे.कार्यशाळेस जैन श्वेतांबर, दादावाडी, मंदिर ट्रस्ट सारसबाग, श्री शंकरमहाराज समर्थ मठ धनकवडी, इस्कॉन मंदिर कात्रज, गुरुद्वारा श्री गुरुसिंग साहेब गणेश पेठ पुणे, गुरुनानक दरबार, कॅम्प, पुणे, श्री अक्कलकोट स्वामीमहाराज मठ, बुधवार पेठ, स्वामी नारायण मंदिर आंबेगाव या धार्मिक स्थळांचे विश्वस्त प्रसादालयाचे आचारी तसेच एसएनडीटी महाविद्यालयातील मुली, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग महाविद्यालयाच्या मुलांनी सहभाग घेतला होता.अन्न व औषध प्रशासन पुणे विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी प्रास्तविकात पुणे विभागाच्या वतीने आजपर्यंत १५ धार्मिक स्थळांच्या प्रसादालयातील आचारी तसेच विश्वस्त यांच्या सह २०० हून अधिक लोकांना प्रशिक्षित केल्याचे सांगितले. एम.एम चितळे यांनी प्रशिक्षण दिले.