शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

‘मुळशी’चे पाणी राखीव ठेवा

By admin | Updated: September 5, 2015 03:27 IST

टाटाच्या मालकीच्या असलेल्या मुळशी धरणातील पाणीच दुष्काळी परिस्थितीत आधार देईल,’ हा विषय ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडल्यानंतर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : टाटाच्या मालकीच्या असलेल्या मुळशी धरणातील पाणीच दुष्काळी परिस्थितीत आधार देईल,’ हा विषय ‘लोकमत’ने सर्वप्रथम मांडल्यानंतर, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही तशी मागणी केली आहे. आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही टाटाचे पाणी राखीव ठेवा, असा महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आला.पुणे विभागात सर्वाधिक पाणीसाठा सध्या टाटा कंपनीची खासगी मालकी असलेल्या मुळशी धरणात शिल्लक आहे. या पाण्यावर वीजनिर्मिती करून मुंबईला पुरविली जाते. २देशपातळीवर सध्या वीज अतिरिक्त असल्याने ‘नॅशनल ग्रीड’मधून आणणे शक्य आहे. सोलापूर, उस्मानाबाद, लातूर आणि मराठवाड्यापर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील पाणी राखीव ठेवण्याची वेळ येणार आहे. त्यामुळेच टाटा कंपनीकडे असलेल्या मुळशी, वळवण या धरणांचे पाणी पिण्यासाठी राखून ठेवावे, असा विषय ‘लोकमत’ने प्रसिद्ध केला होता.आज जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर सकारात्म चर्चा झाली. सभेच्या सुरुवातीला पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात काय स्थिती आहे, याची मांडणी करण्यात आली. त्यानंतर त्या त्या तालुक्यातील सदस्यांनी तेथील चित्र मांडले. यात टाटाच्या मुळशी धरणातील १५ टीएमसी पाणी राखीव ठेवले, तर जिल्ह्याची भविष्यातील पाणीटंचाई दूर होईल, असा विषय सदस्यांनी मांडला. याला सर्वांनी अनुमती देऊन तसा ठराव करून, तो पाठविणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी जाहीर केले. त्यानंतर कार्यकारी अभियंता वि. भा. जाधव यांनी मुळशी धरणातून १.२ टीएमसी पाणी आपण वापरू शकतो. ही चर्चा मी वरिष्ठांच्या कानावर घालतो, असे सांगितले. या सभेत उजनी धरणातही -0.९ टीएमसी पाणी शिल्लक आहे. हे पाणीही राखीव ठेवा, अशी मागणी सदस्यांनी केली. सर्व चर्चा झाल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी लवकरच जिल्हा परिषद दुष्काळी दौरे करणार असून, यात निदर्शनास आलेल्या परिस्थितीनुसार उपाययोजना करेल, असे जाहीर केले. (प्रतिनिधी)