शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘पुण्यदशम’ने प्रवास करताना ओळखपत्र जवळ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीने केवळ दहा रुपयांत शहरांतील ९ मार्गांवर पुण्यदशमची सेवा सुरू केली. मात्र पुण्यदशमच्या बसमधून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीएमपीने केवळ दहा रुपयांत शहरांतील ९ मार्गांवर पुण्यदशमची सेवा सुरू केली. मात्र पुण्यदशमच्या बसमधून प्रवास करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य केले. ज्याच्याकडे ओळखपत्र नाही ती व्यक्ती प्रवास करू शकत नाही. या नियमामुळे अनेक प्रवासी या सेवेपासून वंचित राहत आहेत. तर काहीचे वाहकांसोबत वाद देखील होत आहेत. तेव्हा पुण्यदशमच्या बससेवेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्रची सक्ती नको, तसेच पासला पर्याय म्हणून साधे तिकीट देखील मिळावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

''पुण्यदशम ''च्या प्रवाशांना १० रुपयांत दिवस भर प्रवास करण्याचा पास दिला जातो. ते देत असताना ओळख पत्रावरील शेवटच्या ४ आकडी क्रमांक पासवर टाकण्यात येतो. जेणेकरून ह्या तिकिटाचा गैरवापर होऊ नये. मात्र अनेक प्रवाशांकडे ओळखपत्रे नाहीत. वाहक बसमध्ये प्रवेश करतानाच विचारतो पॅनकार्ड, आधारकार्ड असेल तरच प्रवेश देणार आहेत. प्रवाशांनी ओळखपत्राची सक्ती नको, अशी भावना मांडली आहे.

९ जुलै रोजी सुरू झालेल्या ह्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. आता ५० बसमधून रोज जवळपास २० हजार प्रवासी प्रवास करीत आहे.

------------------------

गाडी वातानुकूलित अन् खिडक्या उघड्या :

पुण्यदशम ही बस वातानुकूलित आहे. त्यामुळे त्याच्या काचेच्या खिडक्या इ बसप्रमाणे बंदिस्त असणे गरजेचे होते. मात्र या बसमध्ये सरकविण्याचे आहे. अनेक प्रवासी खिडक्या उघडेच ठेवतात, तर दुसरीकडे वातानुकूलित यंत्रणा सुरूच असते. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा लवकर बिघडण्याची शक्यता आहे.

-------------------------------

काय म्हणताहेत प्रवासी :

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना दोन पर्याय उपलब्ध करून घ्यावेत. ज्यांना दिवसभर प्रवास करायचे आहे. त्यांनी पास काढून दिवसभर प्रवास करावा. ज्यांना केवळ एकदा प्रवास करायचा आहे. त्यांना साधे तिकीट दिले जावे. प्रवाशांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडतील.

अजित चौपडे, प्रवासी

-----------------------

दहा रुपयांत वातानुकूलित बसमधून प्रवास ही योजना छान आहे. मात्र अनेकांकडे ओळखपत्र नसतात. त्याची अडचण येऊ शकते. तेव्हा या बाबीचादेखील विचार झाला पाहिजे.

अनुराधा कदम, प्रवासी

-----------------------

पीएमपीकडून देण्यात येणारे तिकीट हे हस्तांतर करता येत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीने तिकीट काढले. त्यांनीच प्रवास करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे. तिकिटाचा दुरुपयोग होऊ नये, हा हेतू आहे.

डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे