शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
5
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
6
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
7
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
8
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
9
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
10
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
11
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
12
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
13
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
14
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
15
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
16
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
17
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
18
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
19
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
20
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

‘पुण्यदशम’ने प्रवास करताना ओळखपत्र जवळ ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीने केवळ दहा रुपयांत शहरांतील ९ मार्गांवर पुण्यदशमची सेवा सुरू केली. मात्र पुण्यदशमच्या बसमधून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पीएमपीने केवळ दहा रुपयांत शहरांतील ९ मार्गांवर पुण्यदशमची सेवा सुरू केली. मात्र पुण्यदशमच्या बसमधून प्रवास करण्यासाठी ओळखपत्र अनिवार्य केले. ज्याच्याकडे ओळखपत्र नाही ती व्यक्ती प्रवास करू शकत नाही. या नियमामुळे अनेक प्रवासी या सेवेपासून वंचित राहत आहेत. तर काहीचे वाहकांसोबत वाद देखील होत आहेत. तेव्हा पुण्यदशमच्या बससेवेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्रची सक्ती नको, तसेच पासला पर्याय म्हणून साधे तिकीट देखील मिळावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

''पुण्यदशम ''च्या प्रवाशांना १० रुपयांत दिवस भर प्रवास करण्याचा पास दिला जातो. ते देत असताना ओळख पत्रावरील शेवटच्या ४ आकडी क्रमांक पासवर टाकण्यात येतो. जेणेकरून ह्या तिकिटाचा गैरवापर होऊ नये. मात्र अनेक प्रवाशांकडे ओळखपत्रे नाहीत. वाहक बसमध्ये प्रवेश करतानाच विचारतो पॅनकार्ड, आधारकार्ड असेल तरच प्रवेश देणार आहेत. प्रवाशांनी ओळखपत्राची सक्ती नको, अशी भावना मांडली आहे.

९ जुलै रोजी सुरू झालेल्या ह्या सेवेला प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे. आता ५० बसमधून रोज जवळपास २० हजार प्रवासी प्रवास करीत आहे.

------------------------

गाडी वातानुकूलित अन् खिडक्या उघड्या :

पुण्यदशम ही बस वातानुकूलित आहे. त्यामुळे त्याच्या काचेच्या खिडक्या इ बसप्रमाणे बंदिस्त असणे गरजेचे होते. मात्र या बसमध्ये सरकविण्याचे आहे. अनेक प्रवासी खिडक्या उघडेच ठेवतात, तर दुसरीकडे वातानुकूलित यंत्रणा सुरूच असते. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा लवकर बिघडण्याची शक्यता आहे.

-------------------------------

काय म्हणताहेत प्रवासी :

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांना दोन पर्याय उपलब्ध करून घ्यावेत. ज्यांना दिवसभर प्रवास करायचे आहे. त्यांनी पास काढून दिवसभर प्रवास करावा. ज्यांना केवळ एकदा प्रवास करायचा आहे. त्यांना साधे तिकीट दिले जावे. प्रवाशांना जो पर्याय योग्य वाटेल तो निवडतील.

अजित चौपडे, प्रवासी

-----------------------

दहा रुपयांत वातानुकूलित बसमधून प्रवास ही योजना छान आहे. मात्र अनेकांकडे ओळखपत्र नसतात. त्याची अडचण येऊ शकते. तेव्हा या बाबीचादेखील विचार झाला पाहिजे.

अनुराधा कदम, प्रवासी

-----------------------

पीएमपीकडून देण्यात येणारे तिकीट हे हस्तांतर करता येत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीने तिकीट काढले. त्यांनीच प्रवास करणे अपेक्षित आहे. त्यासाठीच ओळखपत्र असणे अनिवार्य केले आहे. तिकिटाचा दुरुपयोग होऊ नये, हा हेतू आहे.

डॉ. चेतना केरुरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी, पुणे