शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

‘कात्रज-कोंढवा’ रस्त्याच्या कामात अडथळ्यांची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:09 IST

पुणे : नियोजन न करता घाईगडबडीत सुरू करण्यात आलेल्या ‘कात्रज-कोंढवा’ रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. या रस्त्यासाठी ...

पुणे : नियोजन न करता घाईगडबडीत सुरू करण्यात आलेल्या ‘कात्रज-कोंढवा’ रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प झाले आहे. या रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या जागाच अद्याप ताब्यात आलेल्या नाहीत. प्रशासनाने नेमलेल्या सल्लागारानेही प्रकल्पाचे काम सोडून दिले आहे. त्यामुळे या कामातील अडथळ्यांची मालिका संपण्यास तयार नाही. सहा महिन्यांनंतर या प्रकल्पाची मुदत संपणार असून आतापर्यंत अवघे २० टक्केच काम झाले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निवडणुकांपूर्वी या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. या कामासाठी आवश्यक असलेल्या जागांपैकी ७४ टक्के जागेचे संपादन विशेष मोहिमेद्वारे केले. परंतु, उर्वरीत जागेच्या मोबदल्यात रोख मोबदला देण्याची मागणी जागा मालकांनी केली आहे. या जागा ताब्यात न आल्याने थोड्या थोड्या अंतरावर कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून गंभीर आणि किरकोळ स्वरूपाचे अपघातही घडत आहेत.

===

पीपीपीसह अन्य मॉडेलद्वारे रस्ता विकसित करण्यात येणार होता. ठेकेदार नेमणुकीवरून झालेले आरोप आणि मोठा खर्च यामुळे प्रतिसाद कमी मिळाला. त्यामुळे पालिकेनेच हा रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २५० कोटींची प्रकल्प रक्कम १५० कोटी रुपयांपर्यंत कमी झाली.

===

प्रकल्पासाठी ८० टक्क्यांपेक्षा अधिक भूसंपादन होणे आवश्यक असते. त्याशिवाय वर्कआॅर्डर देता येत नाही. मात्र, या नियमाला हरताळ फासत ठेकेदार कंपनीला वर्क आॅर्डर देण्यात आली. जुन्या रस्त्याच्या डागडुजीचे काम अडीच वर्षांपासून बंद असल्याने परिणामी रस्त्यांवर खड्डे, साइडपट्ट्यांवर राडारोडा मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. असे असतानाही ठेकेदाराला आतापर्यंत ३० ते ३५ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत.