शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

कातकरी बांधवांचा ठिय्या!, अमानुष मारहाणीचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:28 IST

खेड तालुक्यातील शिरगाव (विठ्ठलवाडी) येथे कातकरीवस्तीवर नागरिक व महिलांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण व अत्याचाराची चौकशी व्हावी, तसेच २८ कातकरी बांधवांना विनाकारण अटक

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील शिरगाव (विठ्ठलवाडी) येथे कातकरीवस्तीवर नागरिक व महिलांना पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाण व अत्याचाराची चौकशी व्हावी, तसेच २८ कातकरी बांधवांना विनाकारण अटक केल्याबद्दल तहसील कचेरीवर कातकरी बांधवांनी मोर्चा काढला होता. तहसील कचेरीसमोर बुधवारी दिवसभर धरणे आंदोलन धरले.चार दिवसांपूर्वी विठ्ठलवाडी येथील ५० घरांच्या कातकरीवस्तीवर तयार होत असलेल्या गावठी हातभट्टी दारूवर पोलिसांनी छापा टाकून गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यावेळी येथील ग्रामस्थांनी जमाव जमवून पोलीस व होमगार्ड यांच्यावर हल्लाकेला होता. याबाबत विठ्ठलवाडी येथे पोलिसांनी मोठा फौजफाटा नेऊन २३ महिला व ५ पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ४ दिवसांची पोलीस कस्टडी दिली होती. तसेच गरोदर, बाळंत झालेल्या महिलांना बेदम मारहाण केली.या घटनेचा निषेध करण्यासाठी बुधवारी (दि. ४) आदिवासी बांधवांनी पोलिसांच्याविरोधात मोर्चा काढला होता. महिलांनी पोलिसांच्या निषेधाचे फलक घेऊन हुतात्मा राजगुरू यांच्या पुतळ्यापासून ते तहसील कचेरीपर्यंत असा निषेध मोर्चा पोलिसांविरुद्ध घोषणा देत काढला होता. यामध्ये माहिला व लहान मुलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. विठ्ठलवाडी येथील कातकरीवस्तीवर दोन-तीन गावठी दारू गाळण्याचे अड्डे आहेत. त्यावर हे कातकरी बांधव उपजीविका करतात. आम्ही सर्व हे अवैध गावठी दारूधंदे बंद करतो. आम्हाला जगण्यासाठी काहीतरी नोकरी द्या, अशी भूमिका या वेळी कातकरी बांधवांनी नायब तहसीलदार राजेश कानसकर, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांच्यासमोर मांडून तहसील कचेरीसमोर दिवसभर धरणे आंदोलन धरले.या वेळी वैष्णवी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष शांताराम हंडोरे, सामाजिक कार्यकर्त्या ठमा पवार, संदीप साबळे, शरद चव्हाण, मदनलाल मुथ्था, युवराज लांडे, शिवाजी चौरे, जनाबाई चौरे, संतोष पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कातकरी बांधव उपस्थित होते.