शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

पर्यटनवाढीनेच काश्मिरात शांतता

By admin | Updated: February 25, 2017 02:34 IST

जम्मू आणि काश्मीर हे पर्यटकांसाठी स्वर्ग आहे. काश्मीरची संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळतो

पुणे : जम्मू आणि काश्मीर हे पर्यटकांसाठी स्वर्ग आहे. काश्मीरची संपूर्ण अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळतो, सन्मान मिळतो. काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय वाढला तर इथली अस्थिरता कमी होऊन शांतता नांदेल, असे सांगत काश्मीरला भेट देण्याचे आवाहन जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागाचे मुख्य सचिव फारूक अहमद शाह यांनी केले.सरहद संस्थेच्या पुढाकाराने जम्मू-काश्मीर पर्यटन विभाग व पुण्यातील पर्यटन व्यावसायिक यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आज (शनिवारी) ‘काश्मीर महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे, त्यानिमित्त घेण्यात आलेल्या या बैठकीत जम्मू-काश्मीर पर्यटन विभागाचे संचालक महंमद शाह, जम्मू-काश्मीर केबल कार कॉर्पोरेशनचे संचालक शमीम वाणी, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर तसेच पुण्यातील पन्नासहून अधिक पर्यटन व्यावसायिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शाह म्हणाले, जम्मू आणि काश्मीरला पर्यटक इथे येण्यासाठी कायमच उत्सुक असतात. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी स्पेशल फोर्स तैनात करण्यात आली आहे. वैष्णोदेवीचे दर्शन घेण़्यासाठी यंदा १ कोटी तर अमरनाथ यात्रेसाठी १० लाख भाविक आले होते. मात्र कोणत्याही पर्यटकाला त्रास झालेला नाही. अशीच काळजी सगळ्याच पर्यटनस्थळांवर घेतली जात आहे.