शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

काश्मीरला हवे आहे देशाचे प्रेम

By admin | Updated: December 21, 2015 00:31 IST

काश्मीरसाठी कोणीच काही सकारात्मक कार्य केलेले नाही. काश्मीर हा भारताचा अतूट अंग आहे. काश्मीरच्या लोकांना देशाच्या प्रेमाची गरज आहे.

पुणे : काश्मीरसाठी कोणीच काही सकारात्मक कार्य केलेले नाही. काश्मीर हा भारताचा अतूट अंग आहे. काश्मीरच्या लोकांना देशाच्या प्रेमाची गरज आहे. सर्वांनी मिळून त्यांना प्रेम दिले, तरच देशाचा सर्वांगीण विकास होईल, असे मत जम्मू-काश्मीर भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा डॉ. हिना भट यांनी व्यक्त केले. सरहद या संस्थेच्या वतीने संजय नहार लिखित ‘बॉन्डिंग विथ काश्मीर’ या पुस्तकाचे प्रकाशन भट यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, लेफ्टनंट जनरल (निवृत्त) व्ही. जी. पाटणकर, सरहदचे विश्वस्त शैलेश वाडेकर, सरहदचे संचालक प्रशांत तळणीकर, संस्थापक संजीव शहा उपस्थित होते. भट म्हणाल्या, की अजूनही काश्मीरमधील नागरिक सतत होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांमुळे घाबरत जगत आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या मनासारख राहता व वागताही येत नाही. तिकडच्या लोकांना थोड्या प्रेमाची गरज आहे. आत्तापर्यंत कोणीच त्यांच्यासाठी सकारात्मक गोष्टी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मनात थोडी कटुता निर्र्माण झाली आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून त्यांना प्रेम दिले पाहिजे, तेव्हाच काश्मीरचा, आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होईल. काश्मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरांवर चर्चा केली जाते; परंत तेथील नागरिकांना नेमके काय हवे आहे, याबद्दल त्यांची विचारणाही केली जात नाही. काश्मीरमधल्या लोकांवर विश्वास नसल्यामुळे त्यांना वेगळे ठेवण्यात येते. त्यामुळे तेथील लोक बाहेर गेले, तर त्यांच्याकडे आंतकवादी म्हणून पाहिले जाते. एकमेकांशी वाटणारी भीती आता कमी होऊन सध्या कश्मीर मधील परिस्थिती बदलत चालली आहे, असेही भट या वेळी म्हणाल्या. दिलीप पाडगावकर म्हणाले, की कश्मीरमध्ये जम्मू-कश्मीर आणि लडाख या तीन प्रदेशांची सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थिती वेगळ्या स्वरूपाच्या असून, तेथील लोकांना त्याप्रमाणे समजून घेतले पाहिजे. तसेच काश्मीरच्या खोऱ्यात कट्टरतावाद व फुटीरतावाद ही आता कमी होताना दिसत आहे. काश्मीरला इतर राज्यांप्रमाणेच विकास हवा आहे. त्यामुळे काश्मीर व काश्मिरीयन लोकांचा विकास होण्याची गरज आहे. तसेच कश्मीरचा प्रश्न सोडवताना आपल्याला काश्मीरसाठी प्रेम आहे की, कश्मिरीयनसाठी याचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. (प्रतिनिधी)