शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कर्तेच झाले नाकर्ते: प्रभाव असणाऱ्यांचा अभाव, पुणेकर वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: सगळ्या शहरात अस्वस्थता, अशांतता भरून राहिली आहे. भीतीने प्रत्येकाला घेरले आहे. काय करायचे हे कोणालाच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे: सगळ्या शहरात अस्वस्थता, अशांतता भरून राहिली आहे. भीतीने प्रत्येकाला घेरले आहे. काय करायचे हे कोणालाच कळेनासे झाले आहे. कर्तेच नाकर्ते झाले असून जनमानसावर प्रभाव टाकेल अशांचा अभाव प्रकर्षाने जाणवू लागला आहे. याआधी कधीही पुण्याची अशी अवस्था झालेली नसावी. याला जबाबदार कोण, असा प्रश्न यातून वर येत आहे.

सगळे शहर असे मरणासन्न होऊनही कर्ते म्हणवणाऱ्यांचे डोळे उघडायला तयार नाहीत. वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात ''गर्दी करू नका'' तर ''आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू'' च्या घोषणा होतात. यात लोकप्रतिनिधीची कोणती जबाबदारी आपण पार पाडतो आहोत याचेही भान घोषणा करणाऱ्यांना नाही. दर शुक्रवारी एक बैठक घेऊन त्यात थोडीफार दादागिरी केली की, संपले सर्व, अशीच बहुधा त्यांची भावना झाली असावी.

कार्यकर्त्यांना तर आभाळच ठेंगणे झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना म्हणणार महापालिका निष्क्रिय, तर भारतीय जनता पार्टीचे म्हणणे राज्य सरकार निष्क्रिय. राहता राहिलेले मनसे, आरपीआय सोयीनुसार टीकेच्या पिचकाऱ्या मारत आहेत. कोणी म्हणते राज्य सरकार बेकार, तर कोणी म्हणते केंद्र सरकारला आकस आहे. कोणी इथे दुगाण्या झाडतेय, तर कोणी आणखी कुठे! या सगळ्यात आपण पुणेकरांना वाऱ्यावर सोडले याचे भान मात्र कोणालाच राहिलेले नाही.

सांगणारेही सैरभैर झाल्यासारखे करताहेत आणि ऐकणारेही कानात वारे भरल्यासारखे उधळत आहेत.

एक महात्मा काहीतरी सांगायचा आणि सगळा देश हलायचा. एका लाल बहादूर शास्त्रींनी आवाहन केले व सगळ्या देशाने एकवेळचा उपवास केला. त्यांच्या बोलण्याला कृतीचा आधार होता, म्हणून त्यांच्या शब्दाला मान होता. आता मात्र असा जनमानसावर प्रभाव असणारा कोणी नेताच राहिलेला नाही. ना देशात, ना पुण्यात!

पुण्यात ऑक्सिजन बेड मिळत नाही, व्हेंटिलेटर नाही, इंजेक्शन नाहीत, दवाखान्यांमध्ये खाटा मिळत नाहीत. रोजचे सात हजार रूग्ण सापडत आहेत, दररोज ४५ ते ५० जणांचे जीव जात आहेत, त्यात वयोव्रुद्ध आहेत तसे नुकतेच कुठे संसाराला लागलेलेही आहेत.

इतकी भीषण स्थिती येऊनही राजकारणी मात्र राजकारण करण्यातच मग्न आहेत. यांना सटकावून सांगणारा कोणीच शिल्लक राहिलेला नाही? यांचे डोके जाग्यावर आणेल असा कोणीच नाही?

असे कसे होईल? जनतेनेच आता ही जबाबदारी घ्यायला हवी. त्यांनी या सगळ्या लोकांना ठणकावून सांगायला हवे की, बास करा आता तूमचे हे बेजबाबदार वागणे! नाही पडणार आम्हीच कामाशिवाय घराबाहेर. गर्दी तर करणारच नाही. घेऊ काळजी आम्ही वैद्यकीय सल्ल्यानुसार. मास्क लावू आणि सुरक्षित अंतरही पाळू, राहायचे तर आमच्याबरोबर राहा, नाहीतर तुमच्याशिवायही आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. कोरोनाच काय प्लेग, देवी असल्या आजारांवरही आम्ही मात केली आहे. यावेळीही ती करूच!