शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कऱ्हा, नीरापात्राची वाळूउपशाने चाळण

By admin | Updated: October 1, 2015 01:06 IST

झटपट पैसा मिळण्याचा एकमेव व्यवसाय म्हणून वाळूउपसा करणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत

बारामती : झटपट पैसा मिळण्याचा एकमेव व्यवसाय म्हणून वाळूउपसा करणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील कऱ्हा, नीरा नदीपात्राची वाळूमाफियांनी चाळण केली आहे. वाळूउपशावर प्रतिबंध आणण्यासाठी बारामतीच्या तहसीलदारांनी आजअखेर ९९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाळूमाफियांकडून ३५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, महसूल व पोलीस प्रशासनाला न जुमानता या दोन्ही नद्यांच्या पात्रातून अहोरात्र वाळूउपसा होत असतो. दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे नीरा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. त्यामुळे काही भागांतील वाळूउपसा थांबला आहे. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून अचानक कारवाई केली जाते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. बेसुमार वाळूउपशामुळे नदीचे पात्र रुंदावत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक हानी होत आहे. अहोरात्र वाळूची वाहतूक होत असल्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांमधून जाणाऱ्या रस्त्यांची चाळण होते. शेतकऱ्यांनादेखील वाळूमाफिया जुमानत नाहीत. रात्रीच्या वेळी उभ्या पिकातून वाळूने भरलेल्या गाड्या काढल्या जातात. बारामती तालुक्यात कांबळेश्वर, शिरष्णे, लाटे, शिरवली, सांगवी, खांडज, घाडगेवाडी, नीरा वागज, सोनगाव आदी परिसरातून नीरा नदीपात्रातील वाळूउपसा केला जातो. एप्रिलपासून आजअखेर ९९ गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी खास पथकांची नेमणूक केली आहे. प्रतिब्रास २६ हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जातो. ------कऱ्हा नदीचे पात्रदेखील ठिकठिकाणी वाळूमाफियांनी पोखरले आहे. मोरगाव, काऱ्हाटी, बाबुर्डी, अंजनगाव, कऱ्हा वागज, नेपतवळण आदी भागांत वाळू उपशाला बंदी असतानादेखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जाते. त्यामुळे दोन्ही नद्यांचे पात्र रुंदावले आहे.वाळूमाफियांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे पाण्यात बुडून लहान मुलांचे प्राण गेल्याचे प्रकार झाले होते. वाळूउपशावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बारामती तालुक्यातील शेतकरीवर्गातून होते. रात्री वाळूउपसा होत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते.