शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हा, नीरापात्राची वाळूउपशाने चाळण

By admin | Updated: October 1, 2015 01:06 IST

झटपट पैसा मिळण्याचा एकमेव व्यवसाय म्हणून वाळूउपसा करणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत

बारामती : झटपट पैसा मिळण्याचा एकमेव व्यवसाय म्हणून वाळूउपसा करणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील कऱ्हा, नीरा नदीपात्राची वाळूमाफियांनी चाळण केली आहे. वाळूउपशावर प्रतिबंध आणण्यासाठी बारामतीच्या तहसीलदारांनी आजअखेर ९९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाळूमाफियांकडून ३५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, महसूल व पोलीस प्रशासनाला न जुमानता या दोन्ही नद्यांच्या पात्रातून अहोरात्र वाळूउपसा होत असतो. दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे नीरा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. त्यामुळे काही भागांतील वाळूउपसा थांबला आहे. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून अचानक कारवाई केली जाते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. बेसुमार वाळूउपशामुळे नदीचे पात्र रुंदावत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक हानी होत आहे. अहोरात्र वाळूची वाहतूक होत असल्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांमधून जाणाऱ्या रस्त्यांची चाळण होते. शेतकऱ्यांनादेखील वाळूमाफिया जुमानत नाहीत. रात्रीच्या वेळी उभ्या पिकातून वाळूने भरलेल्या गाड्या काढल्या जातात. बारामती तालुक्यात कांबळेश्वर, शिरष्णे, लाटे, शिरवली, सांगवी, खांडज, घाडगेवाडी, नीरा वागज, सोनगाव आदी परिसरातून नीरा नदीपात्रातील वाळूउपसा केला जातो. एप्रिलपासून आजअखेर ९९ गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी खास पथकांची नेमणूक केली आहे. प्रतिब्रास २६ हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जातो. ------कऱ्हा नदीचे पात्रदेखील ठिकठिकाणी वाळूमाफियांनी पोखरले आहे. मोरगाव, काऱ्हाटी, बाबुर्डी, अंजनगाव, कऱ्हा वागज, नेपतवळण आदी भागांत वाळू उपशाला बंदी असतानादेखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जाते. त्यामुळे दोन्ही नद्यांचे पात्र रुंदावले आहे.वाळूमाफियांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे पाण्यात बुडून लहान मुलांचे प्राण गेल्याचे प्रकार झाले होते. वाळूउपशावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बारामती तालुक्यातील शेतकरीवर्गातून होते. रात्री वाळूउपसा होत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते.