शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

कऱ्हा, नीरापात्राची वाळूउपशाने चाळण

By admin | Updated: October 1, 2015 01:06 IST

झटपट पैसा मिळण्याचा एकमेव व्यवसाय म्हणून वाळूउपसा करणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत

बारामती : झटपट पैसा मिळण्याचा एकमेव व्यवसाय म्हणून वाळूउपसा करणाऱ्यांची टोळीच तयार झाली आहे. वाळूउपसा करणाऱ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. मात्र, बारामती तालुक्यातील कऱ्हा, नीरा नदीपात्राची वाळूमाफियांनी चाळण केली आहे. वाळूउपशावर प्रतिबंध आणण्यासाठी बारामतीच्या तहसीलदारांनी आजअखेर ९९ वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. वाळूमाफियांकडून ३५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, महसूल व पोलीस प्रशासनाला न जुमानता या दोन्ही नद्यांच्या पात्रातून अहोरात्र वाळूउपसा होत असतो. दोन आठवड्यांपूर्वी पडलेल्या पावसामुळे नीरा नदीचे पात्र पाण्याने भरले आहे. त्यामुळे काही भागांतील वाळूउपसा थांबला आहे. महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून अचानक कारवाई केली जाते. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. बेसुमार वाळूउपशामुळे नदीचे पात्र रुंदावत आहे. त्याचबरोबर नैसर्गिक हानी होत आहे. अहोरात्र वाळूची वाहतूक होत असल्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांमधून जाणाऱ्या रस्त्यांची चाळण होते. शेतकऱ्यांनादेखील वाळूमाफिया जुमानत नाहीत. रात्रीच्या वेळी उभ्या पिकातून वाळूने भरलेल्या गाड्या काढल्या जातात. बारामती तालुक्यात कांबळेश्वर, शिरष्णे, लाटे, शिरवली, सांगवी, खांडज, घाडगेवाडी, नीरा वागज, सोनगाव आदी परिसरातून नीरा नदीपात्रातील वाळूउपसा केला जातो. एप्रिलपासून आजअखेर ९९ गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३५ लाख ६७ हजार रुपयांचा दंड वसूल केला, अशी माहिती तहसीलदार नीलप्रसाद चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. बेकायदा वाळूउपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी खास पथकांची नेमणूक केली आहे. प्रतिब्रास २६ हजार रुपयांप्रमाणे दंड वसूल केला जातो. ------कऱ्हा नदीचे पात्रदेखील ठिकठिकाणी वाळूमाफियांनी पोखरले आहे. मोरगाव, काऱ्हाटी, बाबुर्डी, अंजनगाव, कऱ्हा वागज, नेपतवळण आदी भागांत वाळू उपशाला बंदी असतानादेखील मोठ्या प्रमाणात वाळू उपसली जाते. त्यामुळे दोन्ही नद्यांचे पात्र रुंदावले आहे.वाळूमाफियांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळे पाण्यात बुडून लहान मुलांचे प्राण गेल्याचे प्रकार झाले होते. वाळूउपशावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया बारामती तालुक्यातील शेतकरीवर्गातून होते. रात्री वाळूउपसा होत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत असते.