शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

लाटेमुळे कार्यकर्त्यांना न्याय

By admin | Updated: February 25, 2017 02:44 IST

लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले़ २५ वर्षे शिवसेनेबरोबर युती असल्याने

विवेक भुसे,  पुणे पुणे : लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले़ २५ वर्षे शिवसेनेबरोबर युती असल्याने कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती़ भाजपाने यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना तळागाळात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरात आरक्षित जागेवर उमेदवारी दिली़ भाजपाच्या लाटेमुळे या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला़ त्यातून त्यांना आपले कार्य विस्तारण्यास संधी मिळाली आहे़ प्रभाग ७, १४ आणि १६ मधून ९ भाजपा, १ शिवसेना आणि २ काँग्रेस उमेदवार विजयी झाले़ सर्वांत धक्कादायक निकाल ठरला तो, काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे गटनेते गणेश बीडकर यांच्यावर मिळविलेला विजय होय़ प्रभाग क्रमांक १६ कसबा पेठ, सोमवार पेठ या प्रभागात रवींद्र धंगेकर यांच्या जुन्या प्रभागाचा काहीच भाग आलेला होता़ शहरात सर्वत्र भाजपाची लाट असताना तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांचा मतदारसंघ असलेल्या कसबा पेठेत धंगेकर यांनी कामाच्या जोरावर हा विजयश्री खेचून आणला़ सामान्यांना हक्काचा माणूस म्हणून आपण वाटत असल्याचे या विजयाने दाखवून दिले़ या प्रभागात रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीमुळेच मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येत आहे़ काँग्रेसच्या सुजाता शेट्टी यांनी भाजपाच्या वैशाली सोनवणे यांचा केवळ १२९ मतांनी पराभव केला़ तर, शिवसेनेच्या पल्लवी जावळे यांनी भाजपा पुरस्कृत छाया वारभूवन यांच्यावर २ हजार ७६९ मतांनी विजय मिळविला़ अशी भाजपाच्या मतांमध्ये फाटाफूट होत असतानाच याच प्रभागात भाजपाचे योगेश समेळ यांनी काँग्रेसचे नितीन परतानी यांच्यावर तब्बल ५ हजार ५६३ मतांनी विजय मिळविला़ या प्रभागात क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येते़ प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपा पुरस्कृत रेश्मा भोसले यांचा विजय महत्त्वाचा मानला जातो़ राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर त्यांनी भाजपाचे तिकीट मिळविले़ पण, आॅनलाईनवरील फॉर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव असल्याने त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला गेला़ त्याविरुद्ध उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली गेली़ त्यामुळे रेश्मा भोसले यांच्याविषयी नकारात्मक बातम्या मोठ्या प्रमाणावर आल्या़ तरीही त्या भाजपाच्या पुरस्कृत उमेदवार आहेत याची माहिती मतदारांपर्यंत विनासायास पोहोचली़ त्याचवेळी प्रचारात त्या अपक्ष असल्या तरी त्यांनी भाजपाच्या अन्य तीनही उमेदवारांना बरोबर घेऊन शेवटपर्यंत प्रचार केला़ त्याचा त्यांना फायदा होऊन भाजपाची पारंपरिक मते त्यांच्या पारड्यात पडली़