शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

लाटेमुळे कार्यकर्त्यांना न्याय

By admin | Updated: February 25, 2017 02:44 IST

लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले़ २५ वर्षे शिवसेनेबरोबर युती असल्याने

विवेक भुसे,  पुणे पुणे : लोकसभा, विधानसभा आणि आता महापालिका निवडणुकीत जनतेने भाजपाला भरभरून मतदान केले़ २५ वर्षे शिवसेनेबरोबर युती असल्याने कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती़ भाजपाने यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना तळागाळात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांच्या घरात आरक्षित जागेवर उमेदवारी दिली़ भाजपाच्या लाटेमुळे या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला़ त्यातून त्यांना आपले कार्य विस्तारण्यास संधी मिळाली आहे़ प्रभाग ७, १४ आणि १६ मधून ९ भाजपा, १ शिवसेना आणि २ काँग्रेस उमेदवार विजयी झाले़ सर्वांत धक्कादायक निकाल ठरला तो, काँग्रेस पुरस्कृत रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे गटनेते गणेश बीडकर यांच्यावर मिळविलेला विजय होय़ प्रभाग क्रमांक १६ कसबा पेठ, सोमवार पेठ या प्रभागात रवींद्र धंगेकर यांच्या जुन्या प्रभागाचा काहीच भाग आलेला होता़ शहरात सर्वत्र भाजपाची लाट असताना तसेच पालकमंत्री गिरीश बापट यांचा मतदारसंघ असलेल्या कसबा पेठेत धंगेकर यांनी कामाच्या जोरावर हा विजयश्री खेचून आणला़ सामान्यांना हक्काचा माणूस म्हणून आपण वाटत असल्याचे या विजयाने दाखवून दिले़ या प्रभागात रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीमुळेच मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येत आहे़ काँग्रेसच्या सुजाता शेट्टी यांनी भाजपाच्या वैशाली सोनवणे यांचा केवळ १२९ मतांनी पराभव केला़ तर, शिवसेनेच्या पल्लवी जावळे यांनी भाजपा पुरस्कृत छाया वारभूवन यांच्यावर २ हजार ७६९ मतांनी विजय मिळविला़ अशी भाजपाच्या मतांमध्ये फाटाफूट होत असतानाच याच प्रभागात भाजपाचे योगेश समेळ यांनी काँग्रेसचे नितीन परतानी यांच्यावर तब्बल ५ हजार ५६३ मतांनी विजय मिळविला़ या प्रभागात क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून येते़ प्रभाग क्रमांक ७ मध्ये भाजपा पुरस्कृत रेश्मा भोसले यांचा विजय महत्त्वाचा मानला जातो़ राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्यावर त्यांनी भाजपाचे तिकीट मिळविले़ पण, आॅनलाईनवरील फॉर्ममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव असल्याने त्यांच्या उमेदवारीला आक्षेप घेतला गेला़ त्याविरुद्ध उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली गेली़ त्यामुळे रेश्मा भोसले यांच्याविषयी नकारात्मक बातम्या मोठ्या प्रमाणावर आल्या़ तरीही त्या भाजपाच्या पुरस्कृत उमेदवार आहेत याची माहिती मतदारांपर्यंत विनासायास पोहोचली़ त्याचवेळी प्रचारात त्या अपक्ष असल्या तरी त्यांनी भाजपाच्या अन्य तीनही उमेदवारांना बरोबर घेऊन शेवटपर्यंत प्रचार केला़ त्याचा त्यांना फायदा होऊन भाजपाची पारंपरिक मते त्यांच्या पारड्यात पडली़