शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

राजुरीला बस थांबेना

By admin | Updated: October 12, 2016 02:22 IST

राजुरी येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडत

राजुरी : राजुरी येथील बसस्थानकावर लांब पल्ल्याच्या एसटी बस थांबत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड पडत असून त्यांना बस मिळत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या ठिकाणी सर्व बस थांबवण्यात याव्यात, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहल शेळके यांंनी केली असून, गाड्या न थांबल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. राजुरी (ता. जुन्नर) हे गाव नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर आळेफाटा ते बेल्हा या दोन गावांच्या मधोमध वसलेले आहे. या गावची लोकसंख्या सुमारे सतरा हजारांहून अधिक आहे. तसेच या गावात मोठी विद्यालये आहे. या ठिकाणी विद्यार्थी तसेच पर्यटक दररोज येत असतात. त्यामुळे येथील बसस्थानकावर नेहमीच गर्दी असते. तसेच येथील नोकरदारवर्ग दररोज पुणे, नगर तसेच मुंबई या ठिकाणी जाऊन येऊन करत आहेत. या ठिकाणी बस थांबत नसल्याने त्यांना सहा किलोमीटर खासगी वाहनाने जाऊन बस पकडावी लागते. यात त्यांचा मोठा वेळ जात असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परंतु येथील बसस्थानकावर लांब पल्ल्यांच्या गाड्या यामध्ये अहमदनगर, पारनेर, शिरूर, औरंगाबाद, कल्याण, पाथर्डी, भिवंडी या आगाराच्या एसटी बस येथून दररोज ये-जा करत असतात. या सर्व बस राजुरीला थांबा असूनही थांबत नाही. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याबाबत तक्रारी देऊनही कुठलीच कारवाई होत नाही. येथे बस थांबाव्यात यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच ज्ञानेश्वर शेळके यांनी संबंधित परिवहन खाते तसेच आगारप्रमुखांना वारंवार दिले आहेत.