शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जून-जुलैत पाणीकपातीची धास्ती

By admin | Updated: February 4, 2016 01:43 IST

तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा समाना करणाऱ्या पुणेकरांचे पाणी संकट आणखी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या

पुणे : तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा समाना करणाऱ्या पुणेकरांचे पाणी संकट आणखी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या तालुक्यांतील गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात आल्यानंतर मे महिन्यात या गावांसाठी आणखी तेवढेच आवर्तन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मे महिन्यात देण्यात येणारे हे जादा पाणी वाचविण्यासाठी यापुढे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून पालिकेला देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात हे पाणी सोडले गेल्यास पुणेकरांना दिवसाआड पाणी न देता तीन दिवसांनी पाणी देण्याची वेळ येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.काय आहे अडचण ?महापालिकेकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शहराला दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. त्यातच महापालिकेची वितरणव्यवस्था कमी आणि काही तांत्रिक अडचणी असल्याने आठवड्यात कोणत्याही एका दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला, तर त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तीन दिवस लागतील. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावानुसार, एक दिवस पाणी बंद ठेवून शहराला दर तीन दिवसांनंतर पाणी द्यावे लागेल; अन्यथा एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.कालव्याला असलेली गळती १ टीएमसी धरल्यास प्रत्यक्षात फेब्रुवारी ते जुलैअखेरपर्यंत ६ महिने पालिकेला प्रत्यक्षात ५ ते ५.५० टीएमसी पाणीच मिळणार आहे. महापालिकेला धरणातील साठा कमी पडण्याची शक्यता असल्याने सध्या दिवसाआड सुरू असलेली कपात वाढविण्याशिवाय पर्याय राहणार नाही. काय आहे पाटबंधारे विभागाचे गणित ?पाटबंधारे विभागाकडून मे महिन्यातही या दोन तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडल्यानंतर धरणात शिल्लक राहणारे पाणी पुणे शहराला जुलैअखेरपर्यंत दिवसाआड दिले, तरच पुरेल. मे महिन्यासाठी पाणी दिल्यास पाणीकपात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे ही कपात टाळायची असेल, तर या महिन्यापासूनच आठवड्यातून एकदा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पालिकेने बंद ठेवावा, असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून महापालिकेसमोर ठेवण्यात आला आहे. हे पाणी बंद ठेवल्यास जुलैअखेरपर्यंत महापालिकेला दीड टीएमसी पाणीबचत करता येईल आणि बचत झालेले पाणी जिल्ह्यासाठी सोडत येईल.