शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

जून-जुलैत पाणीकपातीची धास्ती

By admin | Updated: February 4, 2016 01:43 IST

तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा समाना करणाऱ्या पुणेकरांचे पाणी संकट आणखी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या

पुणे : तीन महिन्यांपासून दिवसाआड पाणीकपातीचा समाना करणाऱ्या पुणेकरांचे पाणी संकट आणखी वाढणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दौंड आणि इंदापूर या तालुक्यांतील गावांना पिण्यासाठी पाणी देण्यात आल्यानंतर मे महिन्यात या गावांसाठी आणखी तेवढेच आवर्तन देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मे महिन्यात देण्यात येणारे हे जादा पाणी वाचविण्यासाठी यापुढे दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून पालिकेला देण्यात आलेल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मे महिन्यात हे पाणी सोडले गेल्यास पुणेकरांना दिवसाआड पाणी न देता तीन दिवसांनी पाणी देण्याची वेळ येणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.काय आहे अडचण ?महापालिकेकडून गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शहराला दिवसाआड पाणी देण्यात येत आहे. त्यातच महापालिकेची वितरणव्यवस्था कमी आणि काही तांत्रिक अडचणी असल्याने आठवड्यात कोणत्याही एका दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला, तर त्यानंतर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास तीन दिवस लागतील. त्यामुळे पाटबंधारे विभागाच्या प्रस्तावानुसार, एक दिवस पाणी बंद ठेवून शहराला दर तीन दिवसांनंतर पाणी द्यावे लागेल; अन्यथा एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.कालव्याला असलेली गळती १ टीएमसी धरल्यास प्रत्यक्षात फेब्रुवारी ते जुलैअखेरपर्यंत ६ महिने पालिकेला प्रत्यक्षात ५ ते ५.५० टीएमसी पाणीच मिळणार आहे. महापालिकेला धरणातील साठा कमी पडण्याची शक्यता असल्याने सध्या दिवसाआड सुरू असलेली कपात वाढविण्याशिवाय पर्याय राहणार नाही. काय आहे पाटबंधारे विभागाचे गणित ?पाटबंधारे विभागाकडून मे महिन्यातही या दोन तालुक्यांतील पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडल्यानंतर धरणात शिल्लक राहणारे पाणी पुणे शहराला जुलैअखेरपर्यंत दिवसाआड दिले, तरच पुरेल. मे महिन्यासाठी पाणी दिल्यास पाणीकपात वाढवावी लागणार आहे. त्यामुळे ही कपात टाळायची असेल, तर या महिन्यापासूनच आठवड्यातून एकदा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा पालिकेने बंद ठेवावा, असा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडून महापालिकेसमोर ठेवण्यात आला आहे. हे पाणी बंद ठेवल्यास जुलैअखेरपर्यंत महापालिकेला दीड टीएमसी पाणीबचत करता येईल आणि बचत झालेले पाणी जिल्ह्यासाठी सोडत येईल.