शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मानवसेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:30 IST

रांजणगाव गणपती : गाव, समाज आणि देश यासाठी जगणारी आणि मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. त्याचप्रमाणे मानवसेवेतून मिळणारा ...

रांजणगाव गणपती : गाव, समाज आणि देश यासाठी जगणारी आणि मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. त्याचप्रमाणे मानवसेवेतून मिळणारा आनंद चिरकाल टिकणारा असतो, असे विचार ज्येष्ठ समाजसेवक, पद्मभूषण अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड विभाग) आयोजित श्यामची आई कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील कवी भरत दौंडकर यांना 'श्याम' आणि त्यांची आई कलाबाई यांना 'श्यामची आई' हा सन्मान अण्णा हजारे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी सुरेश पठारे, लाभेश औटी, कनिफ गव्हाणे, विजय करपे, संतोष विधाटे, कांतीलाल टाकळकर, राजेंद्र चव्हाण, तेजस यादव तसेच निमगाव म्हाळुंगीतील शेतकरी उपस्थित होते.

पतीच्या अकाली निधनानंतर दगडाच्या खाणीत कष्ट करून आपल्या चार अपत्यांचे संगोपन करणाऱ्या 'श्यामची आई' सन्मानप्राप्त कलाबाई दौंडकर यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषद - भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे यांनी संवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या; तर भरत दौंडकर यांनी सत्काराला उत्तर देताना, याची देही, याची डोळा आईचा सन्मान पाहण्याचे भाग्य लाभले. खरं म्हणजे आईची कविता लिहिता येत नाही; परंतु आईमुळे जीवनात बारा हत्तींचे बळ मिळाले, अशा भावना व्यक्त केल्या.

अण्णा हजारे पुढे म्हणाले की, संस्कार केंद्रांपेक्षाही मुलांवर खरे संस्कार आईकडून होतात; कारण आई आपल्या प्रत्येक कृतीतून मुलांना शिकवत असते. आचारशुद्धता, विचारशुद्धता, त्याग, सहनशीलता आणि सामाजिक बांधिलकी ही मानवी जीवनाची पंचसूत्री असावी. प्रपंच सर्वच करतात; पण देशाचा प्रपंच करायला शिका; कारण प्रपंच जेवढा मोठा तेवढा जीवनातील आनंद मोठा असतो.

या प्रसंगी जी. के. औटी यांना सानेगुरुजी विचारसाधना पुरस्काराने तसेच महाराष्ट्रातील गुणवंत कामगारांना सन्मानित करण्यात आले. पुरुषोत्तम सदाफुले यांनी स्वागत केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. आभार अरुण गराडे यांनी मानले.

१९ रांजणगाव गणपती

कलाबाई दौंडकर व कवी भरत दौंडकर यांना अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.