शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

यात्रा, उत्सव, आखाडे जिथे, उमेदवार धावे तिथे तिथे

By admin | Updated: February 10, 2017 02:59 IST

निवडणूक प्रचारासाठी हाती राहिलेले मोजके दिवस लक्षात घेऊन जिथे गर्दी तिथे प्रचार हे धोरण सध्या राजकीय नेत्यांनी जिल्ह्यात ठेवले

घोडेगाव (वार्ताहर) : निवडणूक प्रचारासाठी हाती राहिलेले मोजके दिवस लक्षात घेऊन जिथे गर्दी तिथे प्रचार हे धोरण सध्या राजकीय नेत्यांनी जिल्ह्यात ठेवले असल्याचे दिसून येते. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत गावोगावी यात्रांचा हंगाम सुरू झाल्याने ती लोकांच्या प्रत्यक्ष भेटीची पर्वणी ठरत आहेत. त्यामुळे गावोगावी होणाऱ्या अशा उत्सवाचा राजकीय नेते पुरेपूर फायदा घेत आहेत. यात्रेनिमित्त सुरू असलेले अखंड हरिनाम सप्ताह, काल्याचे कीर्तन, तमाशा, भारूडांचे कार्यक्रम व कुस्त्यांचा आखाडा यामध्ये जाऊन प्रचार करण्यावर मोठा भर दिला जात असल्याचे चित्र ठिकठिकाणी आहे. उमेदवारी अर्जांसोबतच एबी फॉर्म दिले असल्याने प्रमुख पक्षाचे जवळजवळ उमेदवार निश्चित झाले आहेत. दि.१३ रोजी माघार व दि.२१ रोजी मतदान असून, अवघा ६ दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळणार आहे म्हणून उमेदवार व नेते मंडळी आत्तापासूनच प्रचाराच्या धामधुमीत लागले आहेत. उमेदवार व नेतेमंडळी लोकांपर्यंत पोहोचण्याची कोणतीच संधी सोडत नाही. घरोघरी जाऊन प्रचार करण्याबरोबरच वैयक्तिक, सार्वजनिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रचार करण्याचे माध्यम कोणीही सोडत नाही. लग्नकार्य, दशक्रिया, गंधाचे कार्यक्रम, साखरपुडे, वास्तुशांती अशा कार्यक्रमांपासून यात्रेतील कुस्त्यांचे आखाडे व रात्रीच्या तमाशाचा नारळ फोडण्याचा कार्यक्रमासदेखील सर्व नेतेमंडळी हजेरी लावतात. एकाच कार्यक्रमात सर्व पक्षांचे उमेदवार येत असल्याने कधी नाही ते मोठ्या संख्येने पुढारी गावोगावच्या कार्यक्रमांना दिसू लागले आहेत. दशक्रियांमध्ये भाषण करण्यासाठी चढाओढ लागत आहे, या भाषणांमुळे दशक्रिया विधी संपण्यास उशीर होतो व लोकांना नदीवर उन्हात तापत बसावे लागते, मात्र भावपूर्ण श्रद्धांजलीचे भाषण करणारे थांबत नाहीत. लग्नांमध्येदेखील अशीच परिस्थिती होते. भाषण करणाऱ्यांमुळे मुहूर्त टळून जातो.नुकतेच आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावची यात्रा झाली. येथे यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी आखाड्यास खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थिती लावली. या वेळी त्यांच्या हस्ते नामवंत मल्लांची कुस्ती जुंपण्यात आली. या वेळी त्यांनी गावकऱ्यांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. तर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सुपेधर येथे मायंबानाथ यात्रा उत्सवानिमित्त आयोजित झालेल्या काल्याच्या कीर्तनाला हजेरी लावली व ग्रामस्थांना शुभेच्छा. तसेच बोरघर, फुलवडे, गंगापुर, गोहे खुर्द, गोहे बुद्रूक येथे भेटि दिल्या. या वेळी आदिवासी भागात केलेल्या विकासकामांचा आढावा त्यांनी मांडला. पडकई योजना, आश्रमशाळेच्या इमारती, आदिवासी मुलींची इंग्रजी माध्यमाची शाळा, रस्त्यांचे जाळे अशा केलेल्या उल्लेखनीय कामांचा लेखाजोखा ग्रामस्थांसमोर मांडून प्रचार केला.रानावनात, शेतात जाऊनही भेटीगाठीकारेगाव : जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निवडणूक प्रचार आता जोर धरू लागला आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमदार आल्याने शेतकरी दिवसभर रानातच काम करीत आहेत. त्यामुळे उमेदवार आता चक्क रानावनात फिरताना दिसत आहेत. अशा उमेदवाराची मतदारही फिरकी घेत आहेत. वाढत्या उन्हामुळे वातावरण तापत आहे. त्याचबरोबर प्रचारही जोर धरू लागला आहे. ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांचा शेती व्यवसाय आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची खुरपणी चालू आहे, तर काही ठिकाणी कांदाकाढणी सुरू आहे. तर, पिकांना पाणी देताना शेतकरी शेतात दिसत आहेत. शेतात कामे असल्याने एकाच ठिकाणी १० ते २० लोक सापडत आहेत. त्यामुळे उमेदवारही अशा ठिकाणी आवर्जून जात आहेत. आपुलकीने चौकशी करीत आहेत. नेक नागरिक उमेदवाराना जाब विचारत आहेत, तर उमेदवारही ‘अच्छे दिन येतील,’ असे सांगत आहेत.