शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

भारतीय रेल्वेचा प्रवास पर्यावरणाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. रेल्वेत मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण, सौरऊर्जेचा होणारा वापर, पाण्याची बचत व्हावी म्हणून कोच वॉशिंग प्लांट, तसेच जवळपास ५ हजारांहून अधिक डब्यांत वापर होत असलेले बायो टॉयलेट अशा वेगवेगळ्या पातळ्यावर रेल्वे पर्यावरणपूरक बनत चालली आहे.

भारतीय रेल्वे २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

२०१४ पासून प्रदूषण कमी करणाऱ्या रेल्वेने विद्युतीकरणाचा वेग जवळपास दहा पटीने वाढविला आहे. ब्रॉडगेज मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत उद्दिष्ट ठरविण्यात आले. यामुळे डिझेल वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी प्रदूषणात लक्षणीय घट होईल.

मध्य रेल्वेत २०१४-२१मध्ये एकूण महाराष्ट्रात १,८९५ ट्रॅक कि.मी., मध्य प्रदेशात १४५ ट्रॅक कि.मी. आणि कर्नाटकात १९३ ट्रॅक कि.मी. अंतराचे विद्युतीकरण झाले. एकूण ५५५ किमी ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम तीन विभागांत सुरू आहे.

बॉक्स १

वॉशिंग प्लांट :

रेल्वे डबे धुण्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. पाण्याची बचत व्हावी याकरिता स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९ ठिकाणी हे प्लांट सुरू केले. मध्य रेल्वेत तीन प्लांट आहे. पूर्वी एक डबा धुण्यासाठी १५०० लिटर पाणी वापरले जात हाेते. आता केवळ ३०० लिटर पाणी वापरले जाते. त्यामुळे वर्षाला जवळपास १.२८ कोटी लिटर पाण्याची बचत होत आहे.

बॉक्स २ सौरऊर्जा :

रेल्वेने १०००हून अधिक स्थानकांवर सौर ऊर्जा पॅनल बसविले आहेत. यातून सुमारे ११४ मेगावॅट सौर रुफटॉप (छतावरील) प्लांट्स स्थापित केले असून २०३० पर्यंत ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ होण्याची योजना आहे. २०२०- २१ पर्यत देशातील ८००० हून अधिक रेल्वे स्थानकांवर, रेल्वे इमारती एलइडी लाईटचा वापर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे.

कोट :

प्रदूषणाला आळा बसावा व पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता भारतीय रेल्वे महत्त्वाची पावले उचलत आहे. प्रवासी सेवा देण्याबरोबरच आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.