शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

भारतीय रेल्वेचा प्रवास पर्यावरणाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. रेल्वेत मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण, सौरऊर्जेचा होणारा वापर, पाण्याची बचत व्हावी म्हणून कोच वॉशिंग प्लांट, तसेच जवळपास ५ हजारांहून अधिक डब्यांत वापर होत असलेले बायो टॉयलेट अशा वेगवेगळ्या पातळ्यावर रेल्वे पर्यावरणपूरक बनत चालली आहे.

भारतीय रेल्वे २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

२०१४ पासून प्रदूषण कमी करणाऱ्या रेल्वेने विद्युतीकरणाचा वेग जवळपास दहा पटीने वाढविला आहे. ब्रॉडगेज मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत उद्दिष्ट ठरविण्यात आले. यामुळे डिझेल वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी प्रदूषणात लक्षणीय घट होईल.

मध्य रेल्वेत २०१४-२१मध्ये एकूण महाराष्ट्रात १,८९५ ट्रॅक कि.मी., मध्य प्रदेशात १४५ ट्रॅक कि.मी. आणि कर्नाटकात १९३ ट्रॅक कि.मी. अंतराचे विद्युतीकरण झाले. एकूण ५५५ किमी ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम तीन विभागांत सुरू आहे.

बॉक्स १

वॉशिंग प्लांट :

रेल्वे डबे धुण्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. पाण्याची बचत व्हावी याकरिता स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९ ठिकाणी हे प्लांट सुरू केले. मध्य रेल्वेत तीन प्लांट आहे. पूर्वी एक डबा धुण्यासाठी १५०० लिटर पाणी वापरले जात हाेते. आता केवळ ३०० लिटर पाणी वापरले जाते. त्यामुळे वर्षाला जवळपास १.२८ कोटी लिटर पाण्याची बचत होत आहे.

बॉक्स २ सौरऊर्जा :

रेल्वेने १०००हून अधिक स्थानकांवर सौर ऊर्जा पॅनल बसविले आहेत. यातून सुमारे ११४ मेगावॅट सौर रुफटॉप (छतावरील) प्लांट्स स्थापित केले असून २०३० पर्यंत ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ होण्याची योजना आहे. २०२०- २१ पर्यत देशातील ८००० हून अधिक रेल्वे स्थानकांवर, रेल्वे इमारती एलइडी लाईटचा वापर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे.

कोट :

प्रदूषणाला आळा बसावा व पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता भारतीय रेल्वे महत्त्वाची पावले उचलत आहे. प्रवासी सेवा देण्याबरोबरच आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.