शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय रेल्वेचा प्रवास पर्यावरणाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. रेल्वेत मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण, सौरऊर्जेचा होणारा वापर, पाण्याची बचत व्हावी म्हणून कोच वॉशिंग प्लांट, तसेच जवळपास ५ हजारांहून अधिक डब्यांत वापर होत असलेले बायो टॉयलेट अशा वेगवेगळ्या पातळ्यावर रेल्वे पर्यावरणपूरक बनत चालली आहे.

भारतीय रेल्वे २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

२०१४ पासून प्रदूषण कमी करणाऱ्या रेल्वेने विद्युतीकरणाचा वेग जवळपास दहा पटीने वाढविला आहे. ब्रॉडगेज मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत उद्दिष्ट ठरविण्यात आले. यामुळे डिझेल वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी प्रदूषणात लक्षणीय घट होईल.

मध्य रेल्वेत २०१४-२१मध्ये एकूण महाराष्ट्रात १,८९५ ट्रॅक कि.मी., मध्य प्रदेशात १४५ ट्रॅक कि.मी. आणि कर्नाटकात १९३ ट्रॅक कि.मी. अंतराचे विद्युतीकरण झाले. एकूण ५५५ किमी ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम तीन विभागांत सुरू आहे.

बॉक्स १

वॉशिंग प्लांट :

रेल्वे डबे धुण्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. पाण्याची बचत व्हावी याकरिता स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९ ठिकाणी हे प्लांट सुरू केले. मध्य रेल्वेत तीन प्लांट आहे. पूर्वी एक डबा धुण्यासाठी १५०० लिटर पाणी वापरले जात हाेते. आता केवळ ३०० लिटर पाणी वापरले जाते. त्यामुळे वर्षाला जवळपास १.२८ कोटी लिटर पाण्याची बचत होत आहे.

बॉक्स २ सौरऊर्जा :

रेल्वेने १०००हून अधिक स्थानकांवर सौर ऊर्जा पॅनल बसविले आहेत. यातून सुमारे ११४ मेगावॅट सौर रुफटॉप (छतावरील) प्लांट्स स्थापित केले असून २०३० पर्यंत ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ होण्याची योजना आहे. २०२०- २१ पर्यत देशातील ८००० हून अधिक रेल्वे स्थानकांवर, रेल्वे इमारती एलइडी लाईटचा वापर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे.

कोट :

प्रदूषणाला आळा बसावा व पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता भारतीय रेल्वे महत्त्वाची पावले उचलत आहे. प्रवासी सेवा देण्याबरोबरच आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.