शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

भारतीय रेल्वेचा प्रवास पर्यावरणाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय रेल्वेचा प्रवास जितका गतिमान होत आहे, तितकाच तो पर्यावरणपूरक देखील होत चालला आहे. रेल्वेत मोठ्या प्रमाणात विद्युतीकरण, सौरऊर्जेचा होणारा वापर, पाण्याची बचत व्हावी म्हणून कोच वॉशिंग प्लांट, तसेच जवळपास ५ हजारांहून अधिक डब्यांत वापर होत असलेले बायो टॉयलेट अशा वेगवेगळ्या पातळ्यावर रेल्वे पर्यावरणपूरक बनत चालली आहे.

भारतीय रेल्वे २०३० पूर्वी ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

२०१४ पासून प्रदूषण कमी करणाऱ्या रेल्वेने विद्युतीकरणाचा वेग जवळपास दहा पटीने वाढविला आहे. ब्रॉडगेज मार्गांचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत उद्दिष्ट ठरविण्यात आले. यामुळे डिझेल वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. परिणामी प्रदूषणात लक्षणीय घट होईल.

मध्य रेल्वेत २०१४-२१मध्ये एकूण महाराष्ट्रात १,८९५ ट्रॅक कि.मी., मध्य प्रदेशात १४५ ट्रॅक कि.मी. आणि कर्नाटकात १९३ ट्रॅक कि.मी. अंतराचे विद्युतीकरण झाले. एकूण ५५५ किमी ट्रॅकच्या विद्युतीकरणाचे काम तीन विभागांत सुरू आहे.

बॉक्स १

वॉशिंग प्लांट :

रेल्वे डबे धुण्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. पाण्याची बचत व्हावी याकरिता स्वयंचलित कोच वॉशिंग प्लांट सुरू करण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होत आहे. भारतीय रेल्वेने आतापर्यंत २९ ठिकाणी हे प्लांट सुरू केले. मध्य रेल्वेत तीन प्लांट आहे. पूर्वी एक डबा धुण्यासाठी १५०० लिटर पाणी वापरले जात हाेते. आता केवळ ३०० लिटर पाणी वापरले जाते. त्यामुळे वर्षाला जवळपास १.२८ कोटी लिटर पाण्याची बचत होत आहे.

बॉक्स २ सौरऊर्जा :

रेल्वेने १०००हून अधिक स्थानकांवर सौर ऊर्जा पॅनल बसविले आहेत. यातून सुमारे ११४ मेगावॅट सौर रुफटॉप (छतावरील) प्लांट्स स्थापित केले असून २०३० पर्यंत ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक’ होण्याची योजना आहे. २०२०- २१ पर्यत देशातील ८००० हून अधिक रेल्वे स्थानकांवर, रेल्वे इमारती एलइडी लाईटचा वापर केला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची बचत होत आहे.

कोट :

प्रदूषणाला आळा बसावा व पर्यावरणाचे संवर्धन व्हावे याकरिता भारतीय रेल्वे महत्त्वाची पावले उचलत आहे. प्रवासी सेवा देण्याबरोबरच आम्ही पर्यावरणाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहोत.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई.