शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

सांधेदुखीचा त्रास वाढलाय...ही काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:10 IST

कोरोना नंतरची गुडघेदुखी/ सांधेदुखी व चिकनगुणियाची साथआज जगभरात कोरोना संसंर्ग रूग्णांची संख्या कमी होत असली तरी तो संसंर्ग पूर्णपणे ...

कोरोना नंतरची गुडघेदुखी/ सांधेदुखी व चिकनगुणियाची साथआज जगभरात कोरोना संसंर्ग रूग्णांची संख्या कमी होत असली तरी तो संसंर्ग पूर्णपणे गेलेला नाही. आज दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांमध्ये ज्या रूग्णांना मागील काही महिन्यांपूर्वी कोरोना संसंर्ग होऊन गेला आहे व ते कोरोना च्या लक्षणांमधून जरी बरे झाले असतील तरी, अथवा ज्या लोकांना कदाचित कोरोना व्हायरस चे निदान झाले नसेलही पण कोरोना ची लक्षणे येऊन गेली आहेत, अश्या रुग्णांना एक लक्षण बघायला मिळते आहे ते म्हणजे गुडघेदुखीचा त्रास. कंबरदुखी टाच दुखणे हाताची बोटं व मनगट दुखणे/ आखडणे थकवा येणे...थोडे जरी चालणे झाले तरी मांड्या व पायाची पोटरी दुखणे...अशी लक्षणे दिसू लागली आहेत.

कोरोन विषाणू संसंर्ग नंतर...विषाणूजन्य सांधेदुखी Post Viral arthralgia or Arthritis होण्याचे प्रमाण वाढतेच. काही रुग्णांना सध्या थंडी ताप आल्यानंतर काही दिवसात सांधेदुखी ची लक्षणे दिसत आहेत. हे चिकनगुणिया आजाराची लक्षणे असू शकतात. डास चालल्यानंतर हा चिकनगुणिया व्हायरस आजार होतो. साधारणपणे 3 ते 5 दिवस ताप येणे... रक्त तपासणी मध्ये मलेरिया अथवा डेंग्यूची लागण नाही असे दिसून येते, त्यावेळी चिकनगुणिया साठीची विशेष तपासणी Ig G ,IgM, ELISA करणे आवश्यक होते.

ज्या रूग्णांना कोरोना संसंर्ग अथवा कोरोनाची लक्षणे येऊन गेलेली आहेत व ज्यांना पुर्वी सुद्धा सांधेदुखीचा त्रास होत होता व आता सांधेदुखी वाढलेली आहे अशा रूग्णांनी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरजेप्रमाणे हलके व्यायाम करणे आवश्यक आहे. कारण लाॅकडाऊन च्या काळात घरातच बसून असल्यामुळे सांध्याचे व्यायाम होत नव्हते. आता लाॅकडाऊन उठवला गेला आहे. काही स्वतःची काळजी घेऊन व्यायाम करणे. चालणे सुरू केले पाहिजे. ज्या रूग्णांना कोरोना संसंर्ग होण्याआधी कोणताही सांधेदुखीचा/ टाच दुखी/मनगटाच्या हालचाली मधील बदल...हातांची बोटे कडक होणे... असा जर त्रास होत असेल तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. चिकनगुणिया आजार तर नाही ना हे पण तपासले पाहिजे. विनाकारण वैद्यकीय सल्ला न घेता वेदनाशामक औषधे घेणे टाळावे. बऱ्याच वेळा हा Post Viral Arthralgia चा त्रास काही ठराविक औषधे व व्यायाम व आराम घेऊनच बरा होतो. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या...फळांचा वापर, लिंबू सरबत... असा योग्य तो आहार करणे आवश्यक आहे. रोज ठराविक कालावधीमध्ये चालणे असेल...सांध्याची हालचाल वाढवणारे स्ट्रेचिंग पद्धतीचे व्यायाम असतील...ते करणे आवश्यक आहे. घरात बसून काम असल्यामुळे बऱ्याच जणांची शारीरिक हालचाल मंदावली आहे. परिणामी वजन वाढणे... हालचाल नसल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आहे. एकाच जागी जास्त कालावधीसाठी बसून ऑफिस काम केल्यामुळे कंबर/ मान दुखण्याचे प्रमाण वाढते आहे. कदाचित अजून पुढील चार-पाच महिने तरी आपल्याला लाॅकडाऊनचे नियम पाळणे गरजेचे आहे. घरामध्ये बसूनच कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे त्यातली त्या स्वतःच्या शरीराची हालचाल व्यवस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला व नियमित व्यायाम व सकस आहार गरजेचा आहे.

- डाॅ. सचिन नागापूरकर, अस्थिरोग तज्ज्ञ