शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सांधेदुखीचा त्रास वाढलाय...ही काळजी घ्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:10 IST

कोरोना नंतरची गुडघेदुखी/ सांधेदुखी व चिकनगुणियाची साथआज जगभरात कोरोना संसंर्ग रूग्णांची संख्या कमी होत असली तरी तो संसंर्ग पूर्णपणे ...

कोरोना नंतरची गुडघेदुखी/ सांधेदुखी व चिकनगुणियाची साथआज जगभरात कोरोना संसंर्ग रूग्णांची संख्या कमी होत असली तरी तो संसंर्ग पूर्णपणे गेलेला नाही. आज दवाखान्यात येणाऱ्या रूग्णांमध्ये ज्या रूग्णांना मागील काही महिन्यांपूर्वी कोरोना संसंर्ग होऊन गेला आहे व ते कोरोना च्या लक्षणांमधून जरी बरे झाले असतील तरी, अथवा ज्या लोकांना कदाचित कोरोना व्हायरस चे निदान झाले नसेलही पण कोरोना ची लक्षणे येऊन गेली आहेत, अश्या रुग्णांना एक लक्षण बघायला मिळते आहे ते म्हणजे गुडघेदुखीचा त्रास. कंबरदुखी टाच दुखणे हाताची बोटं व मनगट दुखणे/ आखडणे थकवा येणे...थोडे जरी चालणे झाले तरी मांड्या व पायाची पोटरी दुखणे...अशी लक्षणे दिसू लागली आहेत.

कोरोन विषाणू संसंर्ग नंतर...विषाणूजन्य सांधेदुखी Post Viral arthralgia or Arthritis होण्याचे प्रमाण वाढतेच. काही रुग्णांना सध्या थंडी ताप आल्यानंतर काही दिवसात सांधेदुखी ची लक्षणे दिसत आहेत. हे चिकनगुणिया आजाराची लक्षणे असू शकतात. डास चालल्यानंतर हा चिकनगुणिया व्हायरस आजार होतो. साधारणपणे 3 ते 5 दिवस ताप येणे... रक्त तपासणी मध्ये मलेरिया अथवा डेंग्यूची लागण नाही असे दिसून येते, त्यावेळी चिकनगुणिया साठीची विशेष तपासणी Ig G ,IgM, ELISA करणे आवश्यक होते.

ज्या रूग्णांना कोरोना संसंर्ग अथवा कोरोनाची लक्षणे येऊन गेलेली आहेत व ज्यांना पुर्वी सुद्धा सांधेदुखीचा त्रास होत होता व आता सांधेदुखी वाढलेली आहे अशा रूग्णांनी आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरजेप्रमाणे हलके व्यायाम करणे आवश्यक आहे. कारण लाॅकडाऊन च्या काळात घरातच बसून असल्यामुळे सांध्याचे व्यायाम होत नव्हते. आता लाॅकडाऊन उठवला गेला आहे. काही स्वतःची काळजी घेऊन व्यायाम करणे. चालणे सुरू केले पाहिजे. ज्या रूग्णांना कोरोना संसंर्ग होण्याआधी कोणताही सांधेदुखीचा/ टाच दुखी/मनगटाच्या हालचाली मधील बदल...हातांची बोटे कडक होणे... असा जर त्रास होत असेल तर नक्कीच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. चिकनगुणिया आजार तर नाही ना हे पण तपासले पाहिजे. विनाकारण वैद्यकीय सल्ला न घेता वेदनाशामक औषधे घेणे टाळावे. बऱ्याच वेळा हा Post Viral Arthralgia चा त्रास काही ठराविक औषधे व व्यायाम व आराम घेऊनच बरा होतो. पाणी पिण्याचे प्रमाण वाढवले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या...फळांचा वापर, लिंबू सरबत... असा योग्य तो आहार करणे आवश्यक आहे. रोज ठराविक कालावधीमध्ये चालणे असेल...सांध्याची हालचाल वाढवणारे स्ट्रेचिंग पद्धतीचे व्यायाम असतील...ते करणे आवश्यक आहे. घरात बसून काम असल्यामुळे बऱ्याच जणांची शारीरिक हालचाल मंदावली आहे. परिणामी वजन वाढणे... हालचाल नसल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते आहे. एकाच जागी जास्त कालावधीसाठी बसून ऑफिस काम केल्यामुळे कंबर/ मान दुखण्याचे प्रमाण वाढते आहे. कदाचित अजून पुढील चार-पाच महिने तरी आपल्याला लाॅकडाऊनचे नियम पाळणे गरजेचे आहे. घरामध्ये बसूनच कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे त्यातली त्या स्वतःच्या शरीराची हालचाल व्यवस्थित राहण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. डाॅक्टरांचा योग्य तो सल्ला व नियमित व्यायाम व सकस आहार गरजेचा आहे.

- डाॅ. सचिन नागापूरकर, अस्थिरोग तज्ज्ञ