शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

प्रभागातच प्रकल्प उभारून जिरवा कचरा

By admin | Updated: December 23, 2014 05:39 IST

उरुळी देवाची येथे कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी दिलेली ३१ डिसेंबरची डेडलाइन, शहराबाहेर कचरा टाकू देण्यास सर्वच ग्रामपंचायतींकडून होत

पुणे : उरुळी देवाची येथे कचरा टाकू देण्यास ग्रामस्थांनी दिलेली ३१ डिसेंबरची डेडलाइन, शहराबाहेर कचरा टाकू देण्यास सर्वच ग्रामपंचायतींकडून होत असलेला जोरदार विरोध, या पार्श्वभूमीवर प्रभागातला कचरा प्रभागातच जिरविण्यावर भर देण्याच्या पर्यायाकडे सभासदांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत लक्ष वेधले. सध्या सुरू असलेले २२ बायोगॅस प्रकल्प अधिक गतीने चालवून आणखीन नवे प्रकल्प उभारण्यात यावेत, अशी मागणी या वेळी करण्यात आली.कोंढवा-हडपसर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कचरा संकलनाचे आऊटसोर्सिंग करण्यासाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात आला होता. या वेळी गंभीर होत चाललेल्या कचरा प्रश्नावर सभासदांनी लक्ष वेधले. कचरा संकलनासाठी कामगार पुरविणाऱ्या ठेकेदारांकडून कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरही सभासदांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.वसंत मोरे म्हणाले, ‘‘२०११ साली माझ्या प्रभागामध्ये बायोगॅस प्रकल्प उभारण्यात आला. दिवसाला ६ ते ८ टन कचरा येथे जिरविला जातो. त्याचबरोबर काही लाइटही तेथील ऊर्जेवर चालविले जात आहेत. इतर प्रभांगामध्येही बायोगॅसचे असे प्रयोग राबविले जाणे आवश्यक आहे.’’ शहरामध्ये २२ बायोगॅस प्रकल्प चालविले जात आहेत. आवश्यक ओल कचरा कमी येणे, स्थानिक लोकांकडून प्रकल्पासाठी विरोध होणे अशा गोष्टी घडत असल्याचे राजेंद्र जगताप यांनी स्पष्ट केले. कचरा संकलनासाठी ठेकेदारांकडून कामगार पुरविले जातात. मात्र ठेकेदारांकडून त्यांना नियमाप्रमाणे वेतन न देता निम्माच पगार दिला जातोय याकडे सिद्धार्थ धेंडे यांनी लक्ष वेधले. ठेकेदार त्याच्याकडे कमी सेवक असल्याचे दाखवून त्यांचा पीएफ भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचे सुभाष जगताप यांनी सांगितले. सफाईच्या कामाचे आऊटसोर्सिंग नियमानुसार करता येत नसल्याचे सुधीर जानजोत यांनी सांगितले. काही ठेकेदारांची मोनोपॉली होत असल्याकडे आप्पा रेणुसे यांनी लक्ष वेधले. या आऊटसोर्सिंगवर महापालिकेचे नियंत्रण राहते का, याबाबत मंजुषा नागपुरे यांनी शंका उपस्थित केली. ठेकेदारांकडील कामगार कधी कामाला येतात, त्याने रजिस्टर दाखविले का, कामगार प्रत्यक्ष कामावर हजर असतात का, यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे त्यांनी सांगितले. कंत्राटी कामगारांना साडेअकरा हजार रुपये वेतन देण्याची मागणी वनिता वागस्कर यांनी केली. महापालिकेकडून ठेकेदारांना ५० कोटी रुपये दिले जातात, त्याऐवजी महापालिकेने पूर्वीप्रमाणे रोजंदारीवर कामगार कचरा संकलनासाठी घ्यावेत, अशी सूचना उपमहापौर आबा बागुल यांनी केली. (प्रतिनिधी)