शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जेजुरीचा प्रस्तावित विकास आराखडा चुकीचा

By admin | Updated: July 15, 2016 00:33 IST

तीर्थक्षेत्र जेजुरीचा नुकताच प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या समोर मांडून त्यावर हरकती व सूचना घेण्यात आल्या होत्या.

जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरीचा नुकताच प्रस्तावित प्रारूप विकास आराखडा नागरिकांच्या समोर मांडून त्यावर हरकती व सूचना घेण्यात आल्या होत्या. आराखड्याबाबत एकूण २८० हरकती व सूचना आल्या होत्या. त्यांची सुनावणी गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस जेजुरी नगरपालिका सभागृहात झाली. नागरिकांचे समाधान करण्यात पालिकेला यश आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असले, तरीही शहरातील विरोधी नगरसेवक गणेश निकुडे, हेमंत सोनवणे, माजी नगरसेवक महेश दरेकर, तसेच हृषीकेश दरेकर, गणेश टाक, प्रशांत नाझिरकर, हरिभाऊ रत्नपारखी, सचिन पेशवे, राजू चौधरी, चंद्रकांत दरेकर, महेश सोनवणे आदी ग्रामस्थांनी हा विकास आराखडा पूर्णत: संदर्भहीन, चुकीचा व विसंगत असल्याचा लेखी आरोप करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी सुनावणी अधिकाऱ्यांकडे केली आहे. या प्रारूप आराखड्यात मुळातच हे तीर्थक्षेत्र असल्याचा पालिका प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे. तीर्थक्षेत्राचे ठिकाण, येथील ऐतिहासिक मंदिरे व वास्तूंचा उल्लेखही आराखड्यात नाही. येथील ग्रामदेवता जानूबाई मंदिर, बल्लाळेश्वर, लवथळेश्वर, मल्हारतीर्थ, जननीतीर्थ, लवतीर्थ, ऐतिहासिक गौतमेश्वर छत्रीमंदिर, होळकर वाडा, होळकर तलाव, पेशवे तलाव आणि ऐतिहासिक चिंचबाग आदींच्या जतन व संरक्षणाबाबत कोणतीच ठोस उपाययोजना आराखड्यात नाही. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६च्या कलम २२ (ह)नुसार या बाबींच्या संरक्षण-जतनाबाबत स्पष्ट निर्देश असूनही तशी तरतूद नाही. शहराची सध्याची लोकसंख्या आणि भविष्यातील वाढणारी लोकसंख्या यांचा मेळ घालणे प्रशासनाला जमलेले नाही. त्याचबरोबर, तीर्थक्षेत्र असल्याने येथे वर्षाकाठी येणाऱ्या भाविकांचा विचार करण्यात आलेला नाही. यामुळे शहराच्या पाणीपुरवठा नियोजनातील प्रस्ताव विसंगत आहे. यात जेजुरी शहरातील बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रांचा आढावा चुकीचा दर्शविला आहे. शहरातील आरोग्याच्या नियोजनाचा आराखडा बनवताना येथे ग्रामीण रुग्णालय असूनही ते न दर्शविता प्राथमिक आरोग्य केंद्राचा उल्लेख केला आहे. परिशिष्टात तर फक्त ६ दवाखाने दर्शवले आहेत. शहरात ड्रेनेज सिस्टीम असल्याचा उल्लेख असूनही तसे दर्शविण्यात आलेले नाही. १४ गंभीर चुका असूनही शासनाकडे पाठविण्याचा प्रशासनाचा घाट आहे. तो जेजुरी शहराच्या भविष्यातील नियोजनाला कोणत्याही पातळीवर योग्य ठरत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत सुनावणी अधिकाऱ्यांनी योग्य ते निर्देश पालिका प्रशासनाला द्यावेत आणि नव्याने आराखडा तयार करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)