शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

जेबी फार्माकडून हृदयविकारावरील औषध "अझमार्डा"च्या किंमतीत ५० टक्क्यांनी कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2023 16:04 IST

पुणे - भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औषधीनिर्माण कंपन्यांपैकी एक जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (जेबी फार्मा), गंभीर हृद्पातावरील औषध ...

पुणे - भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औषधीनिर्माण कंपन्यांपैकी एक जेबी केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लिमिटेडने (जेबी फार्मा), गंभीर हृद्पातावरील औषध "अझमार्डा"च्या किमतीत जवळपास ५० टक्क्यांची लक्षणीय घट जाहीर केली आहे. अझमार्डा, ज्यामध्ये सॅक्युबिट्रिल- व्हल्सार्टन® हे पेटंटप्राप्त रेणू आहे आणि भारतातील हृदयविकाराने ग्रस्त सुमारे ८० लाख ते १.२० कोटी लोकांना ते उपचारासाठी सूचित केले गेले आहे. किमतीत कपात केल्यानंतर, अझमार्डा (सॅक्युबिट्रिल-व्हल्सार्टन®) ५० एमजी आता प्रति टॅबलेट ७८ रुपयांच्या तुलनेत प्रति टॅबलेट ३९.६० रुपयांमध्ये उपलब्ध असेल. महाराष्ट्रातील उच्च रक्तदाबाचे एकूण प्रमाण 25 टक्के आहे, जे हृदयाच्या विफलतेच्या जोखीम घटकांपैकी एक प्रमुख घटक आहे. किमतीतील कपातीमुळे लोकांची उपचार क्षमता वाढेल, ज्यामुळे हृदयविकाराचे व्यवस्थापन महाराष्ट्र राज्यातील लोकांसाठी सुलभ होईल.

या पावलाविषयी भाष्य करताना, जेबी फार्माच्या देशांतर्गत व्यवसायाचे अध्यक्ष दिलीप सिंग राठोड म्हणाले, “हृदयविकार विभागातील एक आघाडीचा औषधनिर्माता असल्याने, जेबीने भारतात हृदयविकाराच्या रुग्णांसाठी आपले अझमार्डा हे औषध अधिक सुलभ आणि परवडणारे बनवण्यात पुढाकार घेण्याचे ठरविले. रुग्णांना नाविन्यपूर्ण आणि दर्जेदार उपचार सर्वात वाजवी दरात प्रदान करण्याच्या आमच्या धोरणाशी सुसंगतच हे पाऊल आहे. यामुळे रुग्णांचा एकूण मासिक उपचार खर्च ४,५०० रुपयांवरून २,२०० रुपयांपर्यंत लक्षणीयरीत्या कमी होईल. हृद्पातासाठी रुग्णालयात दाखल झालेल्यांचा एकूण उपचारावरील खर्च किमान १,००,००० रुपयांना कमी करण्यास देखील यातून मदत होईल. विक्री किमतीत कपात केलेले औषध डिसेंबर २०२२ पासून ग्राहकांसाठी सर्वत्र उपलब्ध झाले आहे.

हृदयक्रिया बंद पडणे अर्थात हार्ट फेल्युअर ही एक गंभीर स्थिती आहे ज्यात हृदय पाहिजे तसा रक्त पुरवठा करण्याच्या स्थितीत राहत नाही. हे एक क्रमवर्धी चिरकालिक लक्षण आहे ज्यायोगे रग्णाची सामान्य कार्यशील स्थिती आणि जीवनाची गुणवत्ता कमी होत जाते. फुफ्फुसात द्रव जमा होण्यामुळे श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो आणि गुडघ्यापासून खाली पायापर्यंत सूज येऊ शकते. असा अंदाज आहे की देशातील ८० लाख ते सव्वा कोटी लोकांना हृदयविकाराचा त्रास आहे. अनेकदा यापैकी अनेक लोकांकडून त्यांच्या आजाराचे निदानच होत नाही आणि रुग्णांना त्याची जाणीव मुख्यतः शेवटच्या टप्प्यावर होते.

देशातील हृद्पाताच्या गंभीरतेवर बोलताना, एमएमएफ जोशी हॉस्पिटल, पुणे येथील इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट, डॉ. नितीन पत्की म्हणाले, “जगातील २.६० कोटी हृदयविकाराच्या रुग्णांपैकी ४० टक्के रुग्ण भारतात आहेत; तथापि, या स्थितीबद्दल जागरूकता कमी आहे. जीवनशैलीतील आजार जसे की उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे हृदयाच्या विफलतेसाठी महत्वाचे जोखीम घटक आहेत. गुंतागुंत निर्माण झाल्याशिवाय रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत म्हणून, त्यांचे निदान होत नाही आणि मग उपचारही केले जात नाहीत आणि शेवटी खूप उशीरा हृदयाच्या विफलतेसह रुग्ण उपचारासाठी पुढे येतात. भारतीयांमध्ये विशेषतः जीवनशैलीतील आजारांना बळी पडणे, तसेच औषधांविषयक पथ्यांचे पालन न करणे ही हृदयविकाराची काही प्रमुख कारणे आहेत. परिस्थितीचे गांभीर्य यावरून समजू शकते की भारतातील सुमारे ५० टक्के हृदयविकाराचे रुग्ण विविध कारणांमुळे निर्धारित औषधे घेत नाहीत. जागरुकता पसरवण्यासोबतच, लवकर निदान, लवकर उपचार सुरू करणे आणि औषधांच्या वेळांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी आपल्याला खूप काही काम करणे आवश्यक आहे.”

"हृद्पात ही एक विनाशकारी स्थिती आहे आणि या स्थितीबद्दल जागरूकता वाढवणे महत्वाचे आहे. त्या संदर्भात, आम्ही महाराष्ट्रात ३०+ आणि देशभरात ३००+ 'हृदय निकामी' क्लिनिक देखील स्थापित करीत आहोत, जेणेकरून रुग्णांना ही वैद्यकीय स्थिती लवकर ओळखता येईल आणि माहितीपूर्ण आरोग्यविषयक निर्णय घेता येतील,” असे श्री. राठोड पुढे बोलताना स्पष्ट केले.

हृदयविकार रूग्णांना पारंपारिकपणे मुख्य औषध म्हणून फक्त एआरबी (Angiotensin receptor blockers) / एआय (Ace Inhibitors) लिहून दिले जात होते. २०१७ मध्ये दाखल झालेले सॅक्युबिट्रिल+ व्हल्सार्टन, ईएफ (इजेक्शन फ्रॅक्शन) हे एआरबी/ एआय पेक्षा श्रेष्ठ मानले जाते. रुग्णांसाठी अत्यंत प्रभावीही ठरले आहे. सॅक्युबिट्रिल+ व्हल्सार्टन सध्या ३० ते ३५ टक्के HFrEF रूग्णांना लिहून दिले जाते, तर डॉक्टरांचा असा विश्वास आहे की योग्य किंमतीसह या औषधाचा वाटा येत्या काळात ५० ते ६५ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.