शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

दूषित पाण्यामुळे वाढताहेत कावीळचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 06:21 IST

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यातून लहान मुलांना संसर्ग होऊन कावीळ उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की काविळीचे रुग्ण वाढू लागतात

पुणे : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये दूषित पाण्यातून लहान मुलांना संसर्ग होऊन कावीळ उद्भवण्याची शक्यता असते. पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की काविळीचे रुग्ण वाढू लागतात. काही कारणाने पिण्याच्या अथवा वापरातील पाण्यामध्ये सांडपाणी मिसळल्यास लहान मुलांमध्ये काविळीचे प्रमाण वाढते. पाणी उकळून देणे, वेळच्या वेळी लसीकरण आणि स्वच्छता अशा उपायांमधून या दिवसांमध्ये मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.दूषित पाण्यामुळे कावीळ अर्थात हिपॅटायटिस ‘अ’चा संसर्ग होतो. लहान मुलांमध्ये हा प्रकार अधिक आढळतो. ‘ब’ व ‘क’च्या तुलनेने कमी धोकादायक असला, तरी पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये गुंतागुंत निर्माण होऊ शकते. दूषित पाणी आणि अन्नातील विषाणूंमुळे हा विकार होतो. यकृतातील पेशींना इजा झाल्याने त्यांना सूज येते आणि यकृताच्या कार्यात अडचणी निर्माण होतात. परिणामी रक्तातील पित्तयुक्त द्रव्याचे प्रमाण वाढते. हे वाढलेले द्रव्य त्वचा तसेच हातापायांची नखे अशात साचून राहते. त्यामुळे शरीराला एक प्रकारचा पिवळेपणा येतो. मूत्राद्वारेही याचा निचरा होत असल्याने लघवीही पिवळी होते. काविळीचे लवकर निदान व उपचार होणेआवश्यक असते.लसीकरणाबाबत जागृती आवश्यकअर्भकांना वेळेवर लसीकरण केल्यास कावीळ होण्याचा धोका टळतो. हिपॅटायटिस अ या प्रकाराची कावीळ दूषित पाण्यातून होते. सरकारी वेळापत्रकाप्रमाणे नवजात अर्भकांना दुसरा, तिसरा आणि सहाव्या महिन्यात हिपॅटायटिस बी ची लस दिली जाते. हिपॅटायटिस अ ची लस महाग असल्याने ती अद्याप सरकारी लसीकरण वेळापत्रकामध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाही. मात्र, खासगी रुग्णालयांमध्ये ही लस उपलब्ध असते. एक वर्षे वयाच्या पुढील बालकांना ही लस दिली जाते. पालकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मतही डॉक्टरांनी व्यक्त केले.शाळांनी जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे आवश्यक आहे. पालकांनी कावीळ झाल्यास मुलांना किमान तीन आठवडे शाळेत पाठवू नये. योग्य औषधोपचार, पूर्ण विश्रांती आणि साखरेचे सेवन यामुळे कावीळ आटोक्यात येऊ शकते.दूषित पाणी, अस्वच्छता, संसर्ग ही काविळीची प्रमुख कारणे असल्याने या काळात पाणी उकळून पिणे, कचºयाची योग्य विल्हेवाट लावणे, जेवणापूर्वी आणि जेवणानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, काविळीचे लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.पावसाळ्यात दूषित आणि गढूळ पाण्याचे प्रमाण वाढते. पाण्यामार्फत संसर्ग होत असल्याने विशेषत: लहान मुलांमध्ये कावीळ उद्भवण्याची जास्त शक्यता असते. लहान मुलांमध्ये सुरुवातीला ताप येणे, थकवा, चिडचिड, भूक न लागणे, मूत्रातील पिवळेपणा, पोटात दुखणे, यकृताला सूज अशी लक्षणे दिसून येतात. रक्त तपासणी आणि लघवी तपासणी करून काविळीचे निदान करता येते.- डॉ. तुषार पारीख, बालरोग तज्ज्ञलहान मुले बºयाचदा बाहेरचे पाणी पितात, उघड्यावरचे अन्नपदार्थ खातात. दूषित पाणी आणि अन्नातून त्यांना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. मुलांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना लवकर संसर्ग होतो. उलटी होणे, भूक न लागणे, चिडचिडेपणा अशी लक्षणे मुलांमध्ये दिसू लागतात. मुलांमध्ये ही लक्षणे दिसू लागल्यास पालकांनी सुरुवातीला मुलांना पिवळी लघवी होते का, हे तपासणे गरजेचे असते.- डॉ. संध्या भिडे,बालरोग तज्ज्ञ