शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

इंदापूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

By admin | Updated: May 3, 2017 02:02 IST

राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या

इंदापूर : राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या पंधरा दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. २) येथे बोलताना दिला.या मोर्चाच्या निमित्ताने भाजपा सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. गळ्यात डाळिंब, तूर, कांद्याचे हार घालून मोर्चात शेतकरी सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण कर्ज माफी मिळावी, विद्युत पंपाचे वीज बील माफ व्हावे, तालुक्यातील पाण्याची टंचाई, खडकवासला व भाटघर धरणातील पाणी मिळावे, डाळिंब, कांदा, तूर व शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे, मागेल त्याला काम व पाणी मिळाले पाहिजे, भीमा व नीरा नदीवरील बंधारे पाण्याने भरण्यात यावेत या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.हर्षवर्धन पाटील म्हणाले, की राज्यात १ कोटी ६५ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. शेतमालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना पतपुरवठा नाही. शेतीला पाणी नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. वीज बिल माफ झाले पाहिजे. शेतीचे उत्पन्न घटले आहे. नाकर्त्या नेतृत्वामुळे ५५ लाख शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारामती व दौंड तालुक्यांना पाणी मिळाले.इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला. अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी सभापती विलासराव वाघमोडे, मुरलीधर निंबाळकर प्रतीक्षा जामदार आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. (वार्ताहर)