शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

इंदापूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

By admin | Updated: May 3, 2017 02:02 IST

राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या

इंदापूर : राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या पंधरा दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. २) येथे बोलताना दिला.या मोर्चाच्या निमित्ताने भाजपा सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. गळ्यात डाळिंब, तूर, कांद्याचे हार घालून मोर्चात शेतकरी सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण कर्ज माफी मिळावी, विद्युत पंपाचे वीज बील माफ व्हावे, तालुक्यातील पाण्याची टंचाई, खडकवासला व भाटघर धरणातील पाणी मिळावे, डाळिंब, कांदा, तूर व शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे, मागेल त्याला काम व पाणी मिळाले पाहिजे, भीमा व नीरा नदीवरील बंधारे पाण्याने भरण्यात यावेत या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.हर्षवर्धन पाटील म्हणाले, की राज्यात १ कोटी ६५ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. शेतमालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना पतपुरवठा नाही. शेतीला पाणी नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. वीज बिल माफ झाले पाहिजे. शेतीचे उत्पन्न घटले आहे. नाकर्त्या नेतृत्वामुळे ५५ लाख शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारामती व दौंड तालुक्यांना पाणी मिळाले.इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला. अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी सभापती विलासराव वाघमोडे, मुरलीधर निंबाळकर प्रतीक्षा जामदार आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. (वार्ताहर)