शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

इंदापूरमध्ये जनआक्रोश मोर्चा

By admin | Updated: May 3, 2017 02:02 IST

राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या

इंदापूर : राज्यातील ५५ लाख ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज विनाअट माफ करण्यात यावे. अन्यथा या विषयावर इतर मागण्यांसाठी येत्या पंधरा दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि. २) येथे बोलताना दिला.या मोर्चाच्या निमित्ताने भाजपा सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. गळ्यात डाळिंब, तूर, कांद्याचे हार घालून मोर्चात शेतकरी सहभागी झाले होते.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी संभाजी चौकात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जाची संपूर्ण कर्ज माफी मिळावी, विद्युत पंपाचे वीज बील माफ व्हावे, तालुक्यातील पाण्याची टंचाई, खडकवासला व भाटघर धरणातील पाणी मिळावे, डाळिंब, कांदा, तूर व शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन करण्यात यावे, मागेल त्याला काम व पाणी मिळाले पाहिजे, भीमा व नीरा नदीवरील बंधारे पाण्याने भरण्यात यावेत या मोर्चेकऱ्यांच्या प्रमुख मागण्या होत्या.हर्षवर्धन पाटील म्हणाले, की राज्यात १ कोटी ६५ लाख शेतकरी आहेत. त्यापैकी १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. शेतमालाला हमी भाव नाही. शेतकऱ्यांना पतपुरवठा नाही. शेतीला पाणी नाही. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. वीज बिल माफ झाले पाहिजे. शेतीचे उत्पन्न घटले आहे. नाकर्त्या नेतृत्वामुळे ५५ लाख शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. बारामती व दौंड तालुक्यांना पाणी मिळाले.इंदापूर तालुक्याचे हक्काचे पाणी गेले कुठे, असा सवाल त्यांनी केला. अ‍ॅड. कृष्णाजी यादव यांनी प्रास्ताविक केले. सभापती करणसिंह घोलप, नगराध्यक्षा अंकिता शहा, माजी सभापती विलासराव वाघमोडे, मुरलीधर निंबाळकर प्रतीक्षा जामदार आदिंनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. (वार्ताहर)