शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
4
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
5
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
6
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
7
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
8
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
9
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
10
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
11
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
12
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
13
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
14
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
15
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
16
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
17
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
18
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
19
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
20
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

टंचाईग्रस्त गावांना अखेर ‘जनाई’चे पाणी

By admin | Updated: September 7, 2016 01:35 IST

सलग ४ वर्ष टंचाईचा सामना करणाऱ्या सुपे परगण्यातील टंचाईग्रस्त गावांना अखेर जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली.

बारामती : सलग ४ वर्ष टंचाईचा सामना करणाऱ्या सुपे परगण्यातील टंचाईग्रस्त गावांना अखेर जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. या योजनेतून पाणी देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. कालवा समितीच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, पाणी उपलब्ध केले नव्हते. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनीच आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तातडीने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानंतर प्रशासन हालले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बारामती, दौंड, इंदापूरच्या जिरायती भागास पाणी देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, अंमलबजावणी करण्यात आली नाही, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या निदर्शनास आणले होते.या संदर्भात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना देखील कालवा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाणी सोडण्याचे नियोजन होत नसल्याचे निदर्शनास आणले होते. शिवतारे यांनी आपल्या विभागाच्या सचिवांना तातडीने विषय मार्गी लावावा, अन्यथा दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश दिले. त्यानंतर आज सायंकाळपासूनच जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)