शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
2
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
3
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
4
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
5
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
6
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
7
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
8
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
9
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
10
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
11
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
12
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
13
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
14
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
15
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
16
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
17
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
18
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
19
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
20
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...

टंचाईग्रस्त गावांना अखेर ‘जनाई’चे पाणी

By admin | Updated: September 7, 2016 01:35 IST

सलग ४ वर्ष टंचाईचा सामना करणाऱ्या सुपे परगण्यातील टंचाईग्रस्त गावांना अखेर जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली.

बारामती : सलग ४ वर्ष टंचाईचा सामना करणाऱ्या सुपे परगण्यातील टंचाईग्रस्त गावांना अखेर जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. या योजनेतून पाणी देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. कालवा समितीच्या बैठकीत देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मात्र, पाणी उपलब्ध केले नव्हते. सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनीच आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तातडीने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या आदेशानंतर प्रशासन हालले. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बारामती, दौंड, इंदापूरच्या जिरायती भागास पाणी देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, अंमलबजावणी करण्यात आली नाही, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक दिलीप खैरे यांनी अधीक्षक अभियंत्यांच्या निदर्शनास आणले होते.या संदर्भात जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना देखील कालवा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे पाणी सोडण्याचे नियोजन होत नसल्याचे निदर्शनास आणले होते. शिवतारे यांनी आपल्या विभागाच्या सचिवांना तातडीने विषय मार्गी लावावा, अन्यथा दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश दिले. त्यानंतर आज सायंकाळपासूनच जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून पाणी देण्यास सुरुवात झाली आहे. (प्रतिनिधी)