शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘जनाई-शिरसाई’चे पाणी पुन्हा रोखले

By admin | Updated: September 13, 2016 01:26 IST

येथील ग्रामस्थांनी जनाई-शिरसाई योजनेचे बंद केलेले पाणी सोमवारी (दि. १२) पाणी, महसूल, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत सुरू केले.

शिर्सुफळ : येथील ग्रामस्थांनी जनाई-शिरसाई योजनेचे बंद केलेले पाणी सोमवारी (दि. १२) पाणी, महसूल, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत सुरू केले. मात्र, ग्रामस्थांचा रोष कायम असल्याने अवघ्या दहा मिनिटांतच ग्रामस्थांनी हे पाणी पुन्हा बंद केले. आधी शिर्सुफळ तलावात पाणी सोडा, त्यानंतरच पाणी उचला, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने प्रशासनाला हात हालवत माघारी फिरावे लागले. ‘लोकमत’ने सोमवारी ग्रामस्थांनी जिरायती भागाला पाणी रोखले, असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. जनाई-शिरसाई या उपसा सिंचन योजनेतून जिरायती भागाला पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मात्र, तलाव पूर्ण भरल्याशिवाय अन्य गावांना पाणी सोडू नये, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तर, पाणी नाही म्हणून जिरायती भागातील १७ गावांमधील शेतकऱ्यांनी चाऱ्यांची कामे स्व:खर्चातून सुरू केली आहेत. आता पाण्यासाठी बारामती तालुक्यातच संघर्ष सुरू झाला आहे.शिरसाई उपसा सिंचन योजनेतून शिर्सुफळ येथून जिरायती भागातील १७ गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपूर्वी खडकवासला कालव्याच्या माध्यमातून हा तलाव भरला होता. मात्र, जिरायती भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे या तलावातील पाणी १७ गावांना सोडले होते. योजनेतून पंपगृहाला पाणी मिळत नसल्याने तलाव कोरडा पडला. त्यामुळे ग्रामस्थ व सरपंच जवाहरलाल सोनवणे यांनी पंपगृह व जिरायती भागात सुरू असणारा पाणीपुरवठा बंद केला. प्रशासनाने सोमवारी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ मागणीवर ठाम असल्याने अवघ्या दहा मिनिटांतच जिरायती १७ गावांना सुरू केलेला पाणीपुरवठा बंद केला. जोपर्यंत शिर्सुफळ तलाव भरला जात नाही तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू करू दिला जाणार नाही, असाही ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. (वार्ताहर)