शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

‘जनाई-शिरसाई’चे पाणी पुन्हा रोखले

By admin | Updated: September 13, 2016 01:26 IST

येथील ग्रामस्थांनी जनाई-शिरसाई योजनेचे बंद केलेले पाणी सोमवारी (दि. १२) पाणी, महसूल, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत सुरू केले.

शिर्सुफळ : येथील ग्रामस्थांनी जनाई-शिरसाई योजनेचे बंद केलेले पाणी सोमवारी (दि. १२) पाणी, महसूल, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या उपस्थितीत सुरू केले. मात्र, ग्रामस्थांचा रोष कायम असल्याने अवघ्या दहा मिनिटांतच ग्रामस्थांनी हे पाणी पुन्हा बंद केले. आधी शिर्सुफळ तलावात पाणी सोडा, त्यानंतरच पाणी उचला, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतल्याने प्रशासनाला हात हालवत माघारी फिरावे लागले. ‘लोकमत’ने सोमवारी ग्रामस्थांनी जिरायती भागाला पाणी रोखले, असे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. जनाई-शिरसाई या उपसा सिंचन योजनेतून जिरायती भागाला पाणी सोडण्यास सुरुवात झाली. मात्र, तलाव पूर्ण भरल्याशिवाय अन्य गावांना पाणी सोडू नये, अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली. तर, पाणी नाही म्हणून जिरायती भागातील १७ गावांमधील शेतकऱ्यांनी चाऱ्यांची कामे स्व:खर्चातून सुरू केली आहेत. आता पाण्यासाठी बारामती तालुक्यातच संघर्ष सुरू झाला आहे.शिरसाई उपसा सिंचन योजनेतून शिर्सुफळ येथून जिरायती भागातील १७ गावांसाठी पाणीपुरवठा केला जातो. मागील दोन महिन्यांपूर्वी खडकवासला कालव्याच्या माध्यमातून हा तलाव भरला होता. मात्र, जिरायती भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे या तलावातील पाणी १७ गावांना सोडले होते. योजनेतून पंपगृहाला पाणी मिळत नसल्याने तलाव कोरडा पडला. त्यामुळे ग्रामस्थ व सरपंच जवाहरलाल सोनवणे यांनी पंपगृह व जिरायती भागात सुरू असणारा पाणीपुरवठा बंद केला. प्रशासनाने सोमवारी पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थ मागणीवर ठाम असल्याने अवघ्या दहा मिनिटांतच जिरायती १७ गावांना सुरू केलेला पाणीपुरवठा बंद केला. जोपर्यंत शिर्सुफळ तलाव भरला जात नाही तोपर्यंत पाणीपुरवठा सुरू करू दिला जाणार नाही, असाही ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नाही. (वार्ताहर)