शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

जांभुळवाडी : वेध विलिनीकरणाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:12 IST

जांभूळवाडी, कोळेवाडीतील गावकऱ्यांची व्यथा दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जांभूळवाडी आणि काळेवाडीच्या पिण्याच्या पाण्याची मदार गावातील नैसर्गिक ...

जांभूळवाडी, कोळेवाडीतील गावकऱ्यांची व्यथा

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जांभूळवाडी आणि काळेवाडीच्या पिण्याच्या पाण्याची मदार गावातील नैसर्गिक तलावावर होती. परंतु गृहनिर्माण सोसाट्यांमधील सांडपाणी थेट या तलावात सोडले जात असल्याने त्याला गटाराचे स्वरूप आले आहे. महापालिकेने याची गंभीर दखल घेऊन तलाव स्वच्छ करावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

एरवी शुद्ध पाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या तलावात दलदल झाली आहे. तलावाच्या सुमारे साडेतीन एकर जागेवर अतिक्रमण आहे. पाटबंधारे आणि भूमिअभिलेख खात्याने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने गावाचे मोठे नुकसान झाले. दक्षिण पुण्याचे वैभव असलेल्या या तलावाचे सुशोभीकरण कधी होणार, असा गावकऱ्यांचा सवाल आहे.

सुमारे दहा हजार लोकसंख्येच्या या गावात अजूनही पायाभूत सुविधांची वानवा आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून टाकीसाठी पावणेतीन कोटी रुपये मंजूर झाले मात्र कोविडमुळे काम सुरू न झाल्याने नागरिक हैराण आहेत. दरीपुलाच्या अलीकडचा भाग पालिका हद्दीत असूनही विकासकामांच्या दृष्टीने तो ग्रामपंचायतीकडेच आहे. गावात वेगवेगळे प्रकल्प सुरू करण्यासाठी जागा नसल्याने मोठी गैरसोय होत आहे. शेजारच्या आंबेगावला गावठाण मिळाले मग आम्हाला का नाही, शाळेला जागा नसल्याने प्राथमिक शाळेचा निधी जिल्हा परिषदेकडे पडून आहे. पायाभूत सुविधांसाठी जागा आणायची कुठून, असा प्रश्न नागरिकांनी ʻलोकमतʼकडे उपस्थित केला.

विलिनीकरणाबाबत नागरिक म्हणाले की, भूमिगत गटार आणि कचरा उचलण्यासाठी घंटागाडी यासाठी पालिकेने प्रयत्न करावे. गावाशेजारून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे गावातून बाहेर पडण्यासाठी दरीपूलाची व्यवस्था करण्यात आली, मात्र राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने सेवारस्ता दिला नसल्याने डोंगरापलीकडून वळसा मारत यावे लागते.

जांभूळवाडी आणि कोळेवाडी परिसरातील वाढत्या लोकसंख्येनुसार पायाभूत सुविधांचा विकास व्हावा. खडकवासल्यातून पाणी देण्यासाठी नियोजन करावे.

कोळेवाडी हा आदिवासीबहुल व निसर्गरम्य परिसराचे सौंदर्य शहरीकरणाने नष्ट होण्याची भीती आहे. खंडोबा मंदिर, वीरालयम आणि हत्तीचा डोंगर या पर्यटनस्थळांचा विकास गरजेचा असल्याचे नागरिक म्हणतात.

चौकट

कोट

गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम असून गाव पातळीवर आम्ही विकास करण्यास सक्षम असल्याने आमचा समावेश महापालिकेत होऊ नये. सरकारच्या निर्णयाला विरोध आहे.

- वनिता जांभळे, सरपंच

चौकट

गावातील नैसर्गिक साधनसंपत्ती आणि पर्यटनस्थळांचे जतन व संवर्धन व्हावे. हत्तीचा डोंगर ते खंडोबा डोंगर या दरम्यान रोप-वे बांधल्यास पर्यटनाला चालना मिळेल.

-शंकरराव बेलदरे, माजी नगरसेवक

फोटो ओळ : पुणे-बंगळुरू महामार्गाच्या बाजूला गावासाठी सेवा रस्ता नसल्याने वाहनचालकांना गावात येण्यासाठी मोठा वळसा मारावा लागतो.