शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
3
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
4
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
5
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
6
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
7
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
8
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
9
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
10
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
11
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
12
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
13
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
14
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
15
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
16
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
17
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
18
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
19
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
20
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
Daily Top 2Weekly Top 5

जांभूळवाडी, धानवलीचे पुनर्वसन कागदावर

By admin | Updated: July 5, 2017 02:32 IST

पुणे जिल्ह्यातील दहा गावे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाय रिस्क (धोकादायक गावे) मध्ये आहेत. त्यात भोर तालुक्यातील वेळवंड

सूर्यकांत किंद्रे/लोकमत न्यूज नेटवर्कभोर : पुणे जिल्ह्यातील दहा गावे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाय रिस्क (धोकादायक गावे) मध्ये आहेत. त्यात भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील डेहेण, नीरादेवघर धरण भागातील धानवली व आंबवडे खोऱ्यातील जांभूळवाडी गावांचा समावेश आहे. तीनही गावे डोंगराखाली असल्याने पावसाळ्यात येथील घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे. भोरपासून ३५ किलोमीटरवर भोर-पांगारी-धारमंडपरोड पासून ४ किलोमीटर उंच डोंगरावर डेहेण हे सुमारे ४५० लोक वस्तीच ४७ कुटुंब असलेल गाव असून गावाशेजारीच एक धनगरवस्ती आहे. तीनही बाजूंनी गावाला डोंगराचा वेडा असून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तर डोंगरातील दगडमाती वाहून घरांना धोका होऊ शकतो. गावाला फार वर्षापूर्वी रस्ता झाला आहे. मात्र आत्ता रस्त्याचे अस्तित्वच जाणवत नाही. त्यामुळे वाहने उन्हाळ्यातच दिसतात. पावसाळ्यात रस्त्याने धड चालताही येत नाही.आरोग्य विभागाचा कर्मचारी गावात कधीच येत नाहीत. रस्ता नसल्याने कोणी आजारी पडल्यास झोळीत घालून चालत ४ किलोमीटर पांगारीला आणून तिथून एसटीकिंवा खासगी गाडीने भोरला आणावे लागते. येथील धनगरवस्तीला विद्युत पुरवठा करण्याचे काम मंजूर आहे. मात्र, वनविभागामुळे स्वातंत्र्याला ६५ वर्षे होऊनही अद्याप वीज पोहचलीच नाही. त्यामुळे अंधारातच राहावे लागत असल्याचे किसन दगडु दुरकर व बाळासो कंक यांनी सांगितले. गावात १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून शिक्षकही अधून मधूनच येत असतात, त्यामुळे मुलांचे शिक्षण रामभरोसेच आहे. गावात डोंगर उतारावरून उताराची पाणीपुरवठा योजना केली आहे. मात्र, ती खराब झाल्याने पावसाळ्यात डोंगरावरील झऱ्यांचे पाणी तर दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असते. दर वर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनेची दुरुस्ती करुन पाणीटंचाई दूर करावी, असे सरपंच संदीप लक्ष्मण दुरकर यांनी सांगितले. नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडपासून चार किलोमीटर आत रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराला लागून धानवली हे ४०० लोकवस्तीचे महादेवकोळी समाजाचे गाव आहे. काही कुटुंबांचे डोंगरातून खाली दोन किलोमीटर सपाटावर पुनर्वसन केले आहे, मात्र अजूनही काही कुटुंबे डोंगरातील कड्याखालीच राहत आहेत. वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सुविधांपासून कायमच वंचित आहेत. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरातील दगडमाती पडून घरांची पडझड होऊ शकते किंवा जीवितहानी होण्याची भीती आहे. येथील लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. अशीच अवस्था कोर्ले गावांतर्गत असलेल्या जांभूळवाडीची येथील आहे.