शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

जांभूळवाडी, धानवलीचे पुनर्वसन कागदावर

By admin | Updated: July 5, 2017 02:32 IST

पुणे जिल्ह्यातील दहा गावे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाय रिस्क (धोकादायक गावे) मध्ये आहेत. त्यात भोर तालुक्यातील वेळवंड

सूर्यकांत किंद्रे/लोकमत न्यूज नेटवर्कभोर : पुणे जिल्ह्यातील दहा गावे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हाय रिस्क (धोकादायक गावे) मध्ये आहेत. त्यात भोर तालुक्यातील वेळवंड खोऱ्यातील डेहेण, नीरादेवघर धरण भागातील धानवली व आंबवडे खोऱ्यातील जांभूळवाडी गावांचा समावेश आहे. तीनही गावे डोंगराखाली असल्याने पावसाळ्यात येथील घरांना धोका निर्माण होऊन जीवितहानी होण्याची भीती आहे. भोरपासून ३५ किलोमीटरवर भोर-पांगारी-धारमंडपरोड पासून ४ किलोमीटर उंच डोंगरावर डेहेण हे सुमारे ४५० लोक वस्तीच ४७ कुटुंब असलेल गाव असून गावाशेजारीच एक धनगरवस्ती आहे. तीनही बाजूंनी गावाला डोंगराचा वेडा असून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली तर डोंगरातील दगडमाती वाहून घरांना धोका होऊ शकतो. गावाला फार वर्षापूर्वी रस्ता झाला आहे. मात्र आत्ता रस्त्याचे अस्तित्वच जाणवत नाही. त्यामुळे वाहने उन्हाळ्यातच दिसतात. पावसाळ्यात रस्त्याने धड चालताही येत नाही.आरोग्य विभागाचा कर्मचारी गावात कधीच येत नाहीत. रस्ता नसल्याने कोणी आजारी पडल्यास झोळीत घालून चालत ४ किलोमीटर पांगारीला आणून तिथून एसटीकिंवा खासगी गाडीने भोरला आणावे लागते. येथील धनगरवस्तीला विद्युत पुरवठा करण्याचे काम मंजूर आहे. मात्र, वनविभागामुळे स्वातंत्र्याला ६५ वर्षे होऊनही अद्याप वीज पोहचलीच नाही. त्यामुळे अंधारातच राहावे लागत असल्याचे किसन दगडु दुरकर व बाळासो कंक यांनी सांगितले. गावात १ ते ४ थी पर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असून शिक्षकही अधून मधूनच येत असतात, त्यामुळे मुलांचे शिक्षण रामभरोसेच आहे. गावात डोंगर उतारावरून उताराची पाणीपुरवठा योजना केली आहे. मात्र, ती खराब झाल्याने पावसाळ्यात डोंगरावरील झऱ्यांचे पाणी तर दर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असते. दर वर्षी उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या योजनेची दुरुस्ती करुन पाणीटंचाई दूर करावी, असे सरपंच संदीप लक्ष्मण दुरकर यांनी सांगितले. नीरादेवघर धरण भागातील रिंगरोडपासून चार किलोमीटर आत रायरेश्वर किल्ल्याच्या डोंगराला लागून धानवली हे ४०० लोकवस्तीचे महादेवकोळी समाजाचे गाव आहे. काही कुटुंबांचे डोंगरातून खाली दोन किलोमीटर सपाटावर पुनर्वसन केले आहे, मात्र अजूनही काही कुटुंबे डोंगरातील कड्याखालीच राहत आहेत. वीज, पाणी, रस्ता या मूलभूत सुविधांपासून कायमच वंचित आहेत. त्यामुळे पावसाळ्यात डोंगरातील दगडमाती पडून घरांची पडझड होऊ शकते किंवा जीवितहानी होण्याची भीती आहे. येथील लोकांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. अशीच अवस्था कोर्ले गावांतर्गत असलेल्या जांभूळवाडीची येथील आहे.