शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

उजनीत मच्छीमारांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 02:40 IST

उजनी धरण क्षेत्रात परप्रांतीय मच्छीमार हटविणे तसेच मांगूर माशाच्या संवर्धनावर बंदी आणून सौरऊर्जा प्रकल्प उजनी धरणातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी जयमल्हार क्रांती संघटना आणि महाराष्ट्र राज्य मासेमार संघटनेच्या वतीने डिकसळ येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले.

भिगवण : उजनी धरण क्षेत्रात परप्रांतीय मच्छीमार हटविणे तसेच मांगूर माशाच्या संवर्धनावर बंदी आणून सौरऊर्जा प्रकल्प उजनी धरणातून हद्दपार करण्याच्या मागणीसाठी जयमल्हार क्रांती संघटना आणि महाराष्ट्र राज्य मासेमार संघटनेच्या वतीने डिकसळ येथे जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकारी यांनी १० दिवसांत यातील काही मागण्या सोडविण्याच्या आश्वासनाने आंदोलन मागे घेतले.उजनी धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय मासेमार मासेमारी करताना आढळून येतात तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर लहान माशाची शिकार केली जाते. यामुळे दिवसेंदिवस उजनीतील माशांचे प्रमाण घटत आहे. स्थानिक मासेमारांना उपासमार सहन करावी लागत आहे. तर परप्रांतीय मासेमारांकडून होणारे गुन्हेगारीचे प्रमाणही जास्तीचे आहे. त्यामुळे या परप्रांतीय मासेमारांना उजनीतून हाकलून देण्यासाठी गेली १० वर्षे महाराष्ट्र राज्य मासेमार संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, गेली अनेक वर्षे मच्छीमार विभागाकडे असणारे उजनी धरण काही वर्षांपूर्वी सुरक्षेच्या कारणासाठी जलसंपदा विभागाकडे वर्ग करण्यात आले असतानाही सुरक्षेला बाधक असणाऱ्या परप्रांतीयांना हटविण्यात जलसंपदा विभाग यशस्वी झाला नाही. यामुळे अखेर जय मल्हार क्रांती संघटनेच्या दौलत शितोळे यांनी आंदोलनात उडी घेत अधिकाºयांना जागे करण्याचा प्रयत्न केला. या वेळी शितोळे यांच्या सोबत नंदू नगरे, सीताराम भोई, राजू नगरे यांनी वांरवार अधिकाºयांना याबाबत माहिती दिली होती. मात्र, सरकारी अनास्थेमुळे अखेर या दोन्ही संघटनांनी टोकाचे पाऊल उचलीत जलसमाधी आंदोलनाचा पर्याय निवडला. आज या आंदोलनाला हजारो मासेमारांनी पत्नी आणि आबालवृद्धांसह आंदोलकांत सहभाग नोंदविला. तसेच राज्यातील अनेक संघटनांनी तसेच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने सहभाग नोंदवीत पाठिंबा जाहीर केला. या वेळी बोलताना दौलत शितोळे यांनी जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे गरीब मासेमारांवर अन्याय होत आहे. अन्याय सहन करण्याला मर्यादा असतात. त्यापेक्षा ज्या पाण्यावर आपले जीवन आहे त्यातच जीव देण्याचा मासेमार विचार करीत असल्याचे सांगितले. या वेळी करमाळा तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे, उपविभागीय कार्यकारी अभियंता एन.आर. शिर्के तसेच जलसंपदा विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.