शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

माळेगाव शाखेच्या पाणीवाटप संस्था अव्वल

By admin | Updated: July 13, 2016 00:34 IST

राज्य सरकारने २००५ मध्ये सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा अमलात आणला. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत

माळेगाव : राज्य सरकारने २००५ मध्ये सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा अमलात आणला. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. माळेगाव (ता. बारामती) च्या पाटबंधारे खात्याच्या शाखेअंतर्गत पाणीवाटप सहकारी संस्थांमार्फत जवळपास ३,३७१.०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. या लाभक्षेत्रातील ३ हजार ७३६ सभासद शेतकऱ्यांना समान पाणीवाटप होते. पाणी वितरण व पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी याच संस्थांवर असल्याने दर वर्षी १०० टक्के पाणीपट्टीची वसुली माळेगाव पाटबंधारे शाखेतून होत आहे. त्यामुळे या कायद्याचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, असे चित्र आहे.पूर्वी पाटबंधारे विभागाकडून शेतीला पाणी दिले जात होते. गावागावातील स्थानिक पुढारी, मोठ्या शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी दिल्याशिवाय अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाणी मिळणे अडचणीचे होते. त्यामुळे अनेक अडचणी अल्पभूधारक शेतकऱ्यांना येत. त्यावर मात करण्यासाठी पाणीवाटप सहकारी संस्था अस्तित्वात आल्या. भैरवनाथ पाणीवाटप सहकारी संस्था पणदरे, बाणेश्वर पाणीवाटप सहकारी संस्था येळेवस्ती, शरद सहकारी पाणीवाटप संस्था माळेगाव, नाथ म्हस्कोबा पाणीवाटप सहकारी संस्था माळेगाव आणि खंडेश्वरी पाणीवाटप सहकारी संस्था खांडज या पाच पाणीवाटप सहकारी संस्थांमार्फत ३,३७१.०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्याचा ३ हजार ७३६ शेतकऱ्यांना लाभ मिळतो. बारामती उपविभागांतर्गत येणाऱ्या माळेगाव पाटबंधारे शाखेच्या या पाणीवाटप सहकारी संस्थांमार्फत पाण्याचे वितरण ‘टेल टू हेड’ असे होते. त्यामुळे मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांपासून ते एकर दीड एकर असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायदा होतो. या संदर्भात माळेगाव शाखेचे शाखाधिकारी दशरथ पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पाणीवाटप सहकारी संस्थांना पाटबंधारे विभागाकडून वितरिकेच्या मुख्य द्वारापासून पाणी मोजून दिले जाते. या संस्थांना कोणत्याही पिकाला पाणी देण्याचे स्वतंत्र आहे. भिजलेल्या क्षेत्राची शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी पाणीवाटप संस्थेवर आहे. त्यातून पाण्याचे देयक आदा करणे, कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयीन खर्च, देखभाल दुरुस्ती या पाणीवाटप संस्था करतात. मूळ वसूल पाणीपट्टीतून २० टक्के रक्कम स्थानिक करातून वजा केली जाते. पाटबंधारे खात्याकडे जमा केलेल्या पाणीपट्टीतून ५० टक्क्यांपर्यंतचा परतावा या संस्थांना देखभाल दुरुस्तीसाठी दिला जातो. या संस्थांकडून पाणी वितरणासाठी अत्यल्प कर आकारला जातो. २०१५-१६ या आर्थिक वर्षात साडेसात ते आठ लाख पाणीपट्टी वसुली १०० टक्के करण्यात आली आहे. (वार्ताहर)