शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव शाखेच्या पाणीवाटप संस्था अव्वल

By admin | Updated: July 13, 2016 00:34 IST

राज्य सरकारने २००५ मध्ये सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा अमलात आणला. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत

माळेगाव : राज्य सरकारने २००५ मध्ये सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा अमलात आणला. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. माळेगाव (ता. बारामती) च्या पाटबंधारे खात्याच्या शाखेअंतर्गत पाणीवाटप सहकारी संस्थांमार्फत जवळपास ३,३७१.०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे. या लाभक्षेत्रातील ३ हजार ७३६ सभासद शेतकऱ्यांना समान पाणीवाटप होते. पाणी वितरण व पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी याच संस्थांवर असल्याने दर वर्षी १०० टक्के पाणीपट्टीची वसुली माळेगाव पाटबंधारे शाखेतून होत आहे. त्यामुळे या कायद्याचा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना फायदा झाला आहे, असे चित्र आहे.पूर्वी पाटबंधारे विभागाकडून शेतीला पाणी दिले जात होते. गावागावातील स्थानिक पुढारी, मोठ्या शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी दिल्याशिवाय अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाणी मिळणे अडचणीचे होते. त्यामुळे अनेक अडचणी अल्पभूधारक शेतकऱ्यांना येत. त्यावर मात करण्यासाठी पाणीवाटप सहकारी संस्था अस्तित्वात आल्या. भैरवनाथ पाणीवाटप सहकारी संस्था पणदरे, बाणेश्वर पाणीवाटप सहकारी संस्था येळेवस्ती, शरद सहकारी पाणीवाटप संस्था माळेगाव, नाथ म्हस्कोबा पाणीवाटप सहकारी संस्था माळेगाव आणि खंडेश्वरी पाणीवाटप सहकारी संस्था खांडज या पाच पाणीवाटप सहकारी संस्थांमार्फत ३,३७१.०४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते. त्याचा ३ हजार ७३६ शेतकऱ्यांना लाभ मिळतो. बारामती उपविभागांतर्गत येणाऱ्या माळेगाव पाटबंधारे शाखेच्या या पाणीवाटप सहकारी संस्थांमार्फत पाण्याचे वितरण ‘टेल टू हेड’ असे होते. त्यामुळे मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांपासून ते एकर दीड एकर असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनादेखील त्याचा फायदा होतो. या संदर्भात माळेगाव शाखेचे शाखाधिकारी दशरथ पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की पाणीवाटप सहकारी संस्थांना पाटबंधारे विभागाकडून वितरिकेच्या मुख्य द्वारापासून पाणी मोजून दिले जाते. या संस्थांना कोणत्याही पिकाला पाणी देण्याचे स्वतंत्र आहे. भिजलेल्या क्षेत्राची शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसुलीची जबाबदारी पाणीवाटप संस्थेवर आहे. त्यातून पाण्याचे देयक आदा करणे, कर्मचाऱ्यांचा पगार, कार्यालयीन खर्च, देखभाल दुरुस्ती या पाणीवाटप संस्था करतात. मूळ वसूल पाणीपट्टीतून २० टक्के रक्कम स्थानिक करातून वजा केली जाते. पाटबंधारे खात्याकडे जमा केलेल्या पाणीपट्टीतून ५० टक्क्यांपर्यंतचा परतावा या संस्थांना देखभाल दुरुस्तीसाठी दिला जातो. या संस्थांकडून पाणी वितरणासाठी अत्यल्प कर आकारला जातो. २०१५-१६ या आर्थिक वर्षात साडेसात ते आठ लाख पाणीपट्टी वसुली १०० टक्के करण्यात आली आहे. (वार्ताहर)