शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
3
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
4
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
5
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
6
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
7
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
8
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
9
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
10
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
11
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
12
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
13
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
14
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
15
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
16
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
17
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
18
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
19
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
20
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण

‘जलयुक्त शिवार’ला सिध्दिविनायक पावला...

By admin | Updated: April 23, 2015 00:33 IST

रत्नागिरी जिल्हा : जिल्हाधिकाऱ्यांकडे एक कोटीचा धनादेश सुपूर्द

रत्नागिरी : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने जिल्ह्यासाठी एक कोटीचा निधी दिला आहे. आज या निधीचा धनादेश अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांच्याकडे या न्यासाचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी सुपूर्द केला. महाराष्ट्रातील पाणीटंचाई दूर करणे व टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानासारखी महत्त्वाकांक्षी लोकाभिमुख योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हे अभियान शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था लोकसहभाग, खासगी उद्योजक यांच्या सहभागाने राबवण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनानुसार आपण ३४ जिल्ह्यांना प्रत्येकी एक कोटीप्रमाणे अर्थसहाय करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी राणे यांनी दिली.यावेळी त्यांनी न्यासाच्या शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील विविध समाजोपयोगी कामाचीही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासमवेत विश्वस्त प्रवीण नाईक, हरीश चव्हाण उपस्थित होते.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४७ गावांची निवड करण्यात आली आहे. यासाठी ६३ कोटी ५८ लाखांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विविध खात्यातून १४ कोटी ५२ लाख निधी उपलब्ध झाले आहेत. उर्वरित निधी उभा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती कृषी अधीक्षक डी. जी. देसाई यांनी यावेळी दिली. अपर जिल्हाधिकारी गोपाळ निगुडकर यांनी न्यासाचे आभार मानले. ते म्हणाले, या अभियानासाठी या निधीतून काम करण्यासाठी न्यास गावांची निवड करणार आहे. त्यामुळे या निधीवर त्यांचे नियंत्रण रहाणारच आहे. पण त्याचबरोबर एकूण निधीतून होणारी कामे पारदर्शी पद्धतीने होतील आणि हे अभियान यशस्वी होईल, यासाठी जिल्हा प्रशासन नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर जिल्हा पाणीटंचाईच्या समस्येतून नक्कीच बाहेर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी रोजगार हमी योजना विभागाच्या उपजिल्हाधिकारी नीता शिंदे तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)