शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

गोळीबार प्रकरणी जयदीप तावरे यांना अटक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:16 IST

माळेगाव : गोळीबार प्रकरणात मोक्का न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आलेल्या माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांचा जामीन अर्ज ...

माळेगाव : गोळीबार प्रकरणात मोक्का न्यायालयात जामीन मंजूर करण्यात आलेल्या माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी (दि. १८) न्यायालयासमोर शरण येण्याचे आवाहन जयदीप तावरे यांना करण्यात आलेले आहे.

राष्ट्रवादीचे रविराज तावरे यांच्यावर ३१ मे रोजी संभाजीनगर, माळेगाव येथे गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबार प्रकरणात चिथावणी दिल्याबद्दल रविराज तावरे यांच्या जबाबावरून पोलिसांनी माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना अटक केली होती. या अटकेचे तीव्र पडसाद उमटत माळेगाव बंद व निषेध सभा झाली होती. तब्बल २३ दिवसांनंतर माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना पुणे येथील न्यायालयात न्या. अग्रवाल यांनी जामीन मंजूर केला. जामिनावर मुक्तता झाल्यानंतर जयदीप तावरे यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. समर्थकांकडून चक्क जयदीप तावरेंचा दुधाने आंघोळ घालत अभिषेक केला. अनेकांनी नवस पूर्ण केले, सत्याचा विजय झाला म्हणून सोशल मीडियावर संदेश फिरत होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी जयदीप तावरे यांच्या विषयी दिलेला अभिप्राय न्यायालयाने फेटाळून जामीन नामंजूर करत पुन्हा न्यायालयात शरण येण्याचे आवाहन जयदीप तावरे यांना दिले आहेत. जामीन नामंजूर होताच गावात उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. जयदीप तावरे हा स्वच्छ व चांगल्या प्रतिमेच्या व्यक्तीस गोळीबार झालेले रविराज तावरे यांनी राजकीय आकसातून गुंतवल्याने रविराज तावरेवर चौफेर टीका होत होती. रविराज तावरे यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या असतानाही जयदीप तावरे हे जनमाणसात लोकप्रिय आहेत.

चौकट

जयदीप तावरे यांचा जामीन नामंजूर केला असला तरी गावात याबाबत वेगळीच चर्चा चालू आहे. या निर्णया विरोधात जयदीप तावरे उच्च न्यायालयात धाव घेऊन पुन्हा आपले निर्दोषत्व सिध्द करू शकतात अशी चर्चा आहे. अर्थात, याबाबत त्यांचा निर्णय कळू शकला नाही. गेल्या तीन महिन्यांपूर्वी गोळीबार झाल्यानंतर गावातील वातावरण अतिशय खराब आहे. राजकीय इर्षेपोटी नेमका राजकीय बळी कोणाचा जाणार? येत्या नगरपंचायत निवडणुकीत कोण कोणाची राजकीय कारकीर्द संपवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.