शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

उजनीच्या पाण्यासाठी सोलापूर महामार्गावर जागरण गाेंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बाभूळगाव: इंदापूर तालुक्याच्या २२ गावांतील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यापासून वंचित आहेत. शेतीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बाभूळगाव: इंदापूर तालुक्याच्या २२ गावांतील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यापासून वंचित आहेत. शेतीसाठी पाणी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे म्हणत उजनीच्या पाण्यासाठी हिंगणगाव येथे पुणे-सोलापूर महामार्ग अडवत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. सोलापूरकरांच्या आडमुठ्या भूमीकेमुळे हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर होत आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाका, शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नांसाठी प्रसंगी जेलमध्येही बसण्याची तयारी असल्याचे मत पीपल्स

रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रध्यक्ष संजय सोनवणे यांनी व्यक्त केले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे २२ गावांच्या पाण्यासाठी व इतर मागण्यांसाठी ३ जून २०२१ रोजी पासून उजनी धरण तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनास तालुक्यातील आनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनाचा आठवा दिवस उजाडला, परंतु न्याय मिळत नसल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन हिंगणगाव येथे पुणे- सोलापूर महामार्ग एक तास रोखून धरत जागरण गोंधळ घातला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकरी धरणग्रस्तांनी शासनाबरोबर लग्न लावलेले आहे. परंतु या लग्नात जागरण गोंधळ घालण्याचे राहून गेले होते. तो गोंधळ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आज आली आहे. लग्नाचा गोंधळ घातल्याशिवाय मूलबाळ होत नाही आणि शेतीला पाणी मिळाले नाही तर शेतकरी जगणार नाही. म्हणून परमेश्वराने उजनी पाणीप्रश्नी शासनाला सदबुद्धी द्यावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करत असल्याचे अनिल खोत म्हणाले. यावेळी भाजपचे माऊली चौरे, संजय तांबीले, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, नानासाहेब खरात, आप्पा माने, सुधीर पाडुळे यांचेसह मोठ्याप्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळ : हिंगणगाव येथे हायवे रोड रोखून धरत जागरण गोंधळ आंदोलन करताना शेतकरी.