शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

उजनीच्या पाण्यासाठी सोलापूर महामार्गावर जागरण गाेंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बाभूळगाव: इंदापूर तालुक्याच्या २२ गावांतील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यापासून वंचित आहेत. शेतीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बाभूळगाव: इंदापूर तालुक्याच्या २२ गावांतील शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून उजनीच्या पाण्यापासून वंचित आहेत. शेतीसाठी पाणी मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, असे म्हणत उजनीच्या पाण्यासाठी हिंगणगाव येथे पुणे-सोलापूर महामार्ग अडवत जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले. सोलापूरकरांच्या आडमुठ्या भूमीकेमुळे हक्काच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर होत आहे. आमच्यावर गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाका, शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नांसाठी प्रसंगी जेलमध्येही बसण्याची तयारी असल्याचे मत पीपल्स

रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्रध्यक्ष संजय सोनवणे यांनी व्यक्त केले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नेतृृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे २२ गावांच्या पाण्यासाठी व इतर मागण्यांसाठी ३ जून २०२१ रोजी पासून उजनी धरण तरटगाव गेटवर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनास तालुक्यातील आनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलनाचा आठवा दिवस उजाडला, परंतु न्याय मिळत नसल्याने आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन हिंगणगाव येथे पुणे- सोलापूर महामार्ग एक तास रोखून धरत जागरण गोंधळ घातला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक अनिल खोत म्हणाले की, इंदापूर तालुक्यातील शेतकरी धरणग्रस्तांनी शासनाबरोबर लग्न लावलेले आहे. परंतु या लग्नात जागरण गोंधळ घालण्याचे राहून गेले होते. तो गोंधळ घालण्याची वेळ शेतकऱ्यांवर आज आली आहे. लग्नाचा गोंधळ घातल्याशिवाय मूलबाळ होत नाही आणि शेतीला पाणी मिळाले नाही तर शेतकरी जगणार नाही. म्हणून परमेश्वराने उजनी पाणीप्रश्नी शासनाला सदबुद्धी द्यावी व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी हे आंदोलन करत असल्याचे अनिल खोत म्हणाले. यावेळी भाजपचे माऊली चौरे, संजय तांबीले, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, नानासाहेब खरात, आप्पा माने, सुधीर पाडुळे यांचेसह मोठ्याप्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

फोटो ओळ : हिंगणगाव येथे हायवे रोड रोखून धरत जागरण गोंधळ आंदोलन करताना शेतकरी.