शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

चुकीच्या धोरणामुळेच शाळा बंद करण्याची वेळ

By admin | Updated: December 13, 2015 02:55 IST

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांना मान्यता देताना अंतराचे निकष न पाळल्यामुळेच राज्यात ३ हजारांहून अधिक शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे चित्र समोर

पुणे : शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांना मान्यता देताना अंतराचे निकष न पाळल्यामुळेच राज्यात ३ हजारांहून अधिक शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शासनाने या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे स्तलांतर करण्याचा विचार सुरू केला आहे. परिणामी पुढील काळात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांच्या पटपडताळणीची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती समोर आली. या शिक्षकांचे समायोजन इतर शाळांमध्ये करणे अवघड गेले. आता विद्यार्थी संख्या असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. या सर्व शिक्षकांचे समायोजन अनुदानित शाळांमध्ये करावे लागेल. परिणामी रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागा अपोआपच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले, राज्यातील केवळ डोंगरी किंवा आदिवासी भागातील शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी नाहीत. तर पश्चिम महाराष्ट्रातील व राज्यातील शहरी भागाजवळील शाळांमध्येसुद्धा हेच चित्र आहे. शासनाने पूर्वी सुमारे ८ हजार वस्ती शाळांना सरसकटपणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर मागेल त्या ठिकाणी शाळांना मान्यता देण्याची प्रक्रिया राबविली. सुमारे ऐंशीच्या दशकात सुरू करण्यात आलेल्या आश्रमशाळांच्या शेजारी जिल्हा परिषदांच्या शाळांना मान्यता मिळाली. त्यातच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी शहरी भागात स्थलांतर केले. परिणामी विद्यार्थी संख्या कमी होत गेली. शासनाने शाळांना मान्यता देताना केलेल्या चुकीमुळेच विद्यार्थ्यांचा तुटवडा निर्माण झाला.