शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

चुकीच्या धोरणामुळेच शाळा बंद करण्याची वेळ

By admin | Updated: December 13, 2015 02:55 IST

शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांना मान्यता देताना अंतराचे निकष न पाळल्यामुळेच राज्यात ३ हजारांहून अधिक शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे चित्र समोर

पुणे : शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांना मान्यता देताना अंतराचे निकष न पाळल्यामुळेच राज्यात ३ हजारांहून अधिक शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे शासनाने या शाळा बंद करून विद्यार्थ्यांचे स्तलांतर करण्याचा विचार सुरू केला आहे. परिणामी पुढील काळात अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांच्या समायोजनाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांच्या पटपडताळणीची मोहीम हाती घेतली होती. त्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त असल्याची माहिती समोर आली. या शिक्षकांचे समायोजन इतर शाळांमध्ये करणे अवघड गेले. आता विद्यार्थी संख्या असल्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. या सर्व शिक्षकांचे समायोजन अनुदानित शाळांमध्ये करावे लागेल. परिणामी रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागा अपोआपच भरल्या जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले, राज्यातील केवळ डोंगरी किंवा आदिवासी भागातील शाळांमध्ये २0 पेक्षा कमी विद्यार्थी नाहीत. तर पश्चिम महाराष्ट्रातील व राज्यातील शहरी भागाजवळील शाळांमध्येसुद्धा हेच चित्र आहे. शासनाने पूर्वी सुमारे ८ हजार वस्ती शाळांना सरसकटपणे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. त्याचप्रमाणे शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आल्यानंतर मागेल त्या ठिकाणी शाळांना मान्यता देण्याची प्रक्रिया राबविली. सुमारे ऐंशीच्या दशकात सुरू करण्यात आलेल्या आश्रमशाळांच्या शेजारी जिल्हा परिषदांच्या शाळांना मान्यता मिळाली. त्यातच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी शहरी भागात स्थलांतर केले. परिणामी विद्यार्थी संख्या कमी होत गेली. शासनाने शाळांना मान्यता देताना केलेल्या चुकीमुळेच विद्यार्थ्यांचा तुटवडा निर्माण झाला.