शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘आयटी’तील तरूणी असुरक्षित

By admin | Updated: January 31, 2017 04:14 IST

तळवडे येथे महिन्यापूर्वी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या मूळच्या पश्चिम बंगालच्या अंतरा दास या तरुणीचा निर्घृण खून झाला. ही घटना ताजी असताना, हिंजवडी

पिंपरी : तळवडे येथे महिन्यापूर्वी सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या मूळच्या पश्चिम बंगालच्या अंतरा दास या तरुणीचा निर्घृण खून झाला. ही घटना ताजी असताना, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी अभियंता म्हणून काम करणाऱ्या रसिला राजू ओ पी या तरुणीचा रखवालदाराने गळा आवळून खून केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. आयटी अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या कॅबचालकाकडून तरी कधी रखवालदाराकडूनच गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडू लागले आहेत. अशा घटना वारंवार घडू लागल्या असून, कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत.तळवडे सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क येथे २३ डिसेंबर २०१७ ला रात्री साडेआठच्या सुमारास कंपनीतून बाहेर पडल्यानंतर वाहनाच्या शोधात पायी जात असलेल्या अंतरा दास या तरुणीवर धारदार शस्त्राने आरोपीने हल्ला केला. त्यात ती ठार झाली. या घटनेनंतर आयटी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली वाहन सुविधा सक्षम असते का? त्यांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली जाते का, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या नयना पुजारी या तरुणीवर थेरगावातील कॅबचालकाने साथीदारांसह बलात्कार केल्याची घटना खळबळजनक घटना २००९ मध्ये घडली होती. त्या वेळीच आयटी क्षेत्रातील अभियंते, तसेच विशेषत: तरुणींच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर सुभाष सेठी, दर्शन डोंगरे या आयटी अभियंत्यांचेही खून झाले. या घटना विस्मृतीत गेल्या होत्या. अंतरा दास हिचा २३ डिसेंबरला खून झाला. पाठोपाठ २९ जानेवारी २०१७ ला हिंजवडीतील कंपनीत काम करणाऱ्या रसिलाचा गळा आवळून खून करण्यात आला. या घटनांमुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. (प्रतिनिधी)सुरक्षारक्षक नेमताना दक्षता घेतली जावी१हिंजवडी आयटी पार्कमधील एका कंपनीत संगणक अभियंता पदावर काम करणाऱ्या रसिला ओ पी या तरुणीचा रखवालदारानेच खून केला. ही घटना गंभीर असून, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. अभियंत्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांवरील चालकांची नेमणूक करताना, त्यांची चारित्र्य पडताळणी केली जाते. पोलिसांकडून व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच त्यांची नेमणूक केली जाते. २रखवालदारांची नेमणूक खासगी सुरक्षा एजन्सीकडून केली जाते. त्या एजन्सीकडून पडताळणी होते की नाही, हे माहिती नाही. याबाबत निष्काळजीपणा दाखवला जात असेल, तर त्यात सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातील. आयटी परिसरातील सुरक्षेसंबंधी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित आहे, असे हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन यांनी सांगितले.