शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

भाषणबाजी करणाऱ्यांना विचारवंत म्हणणे चुकीचे

By admin | Updated: February 20, 2015 00:25 IST

‘एखादा विषय समजून न घेता त्यावर केवळ आवेशाने भाषणबाजी करून लोकांची मने जिंकणाऱ्या वक्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.

पुणे : ‘‘एखादा विषय समजून न घेता त्यावर केवळ आवेशाने भाषणबाजी करून लोकांची मने जिंकणाऱ्या वक्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. विषयाचे पुरेसे ज्ञान, चिंतन, व्यासंग याचे भान नसणाऱ्या अशा वक्त्यांनाच सध्या विचारवंत समजले जात आहे. ही वृत्ती धोकादायक आहे,’’ असे मत ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी गुुरुवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे आणि महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय आयोजित गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी होते. याप्रसंगी गोखले यांचे नातू सुनील गोखले, महापौर दत्तात्रय धनकवडे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित निंबाळकर, कोषाध्यक्ष शांतीलाल सुरतवाला आदी उपस्थित होते. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज व गोपाळ कृष्ण गोखले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. गोखले यांच्या राजकीय व सामाजिक विचारांचा आढावा घेताना डॉ. मोरे म्हणाले की, गांधीजींनी गोखले यांना आपले राजकीय गुरू मानले. सनदशीर व सात्त्विक वृत्तीने काम करणाऱ्या गोखले यांच्या स्वभावामुळे गांधीजींनी गोखले यांना निवडले. विशेष म्हणजे जेवढी प्रसिद्धी गांधीजींच्या वाट्याला आली, तेवढीच ती गोखले यांच्या वाट्याला येणे शक्य असतानाही त्यांनी मात्र पडद्यामागून समाजाचे भले कसे होईल, याचा सातत्याने विचार केला. विशिष्ट परिस्थितीत निर्माण झालेल्या एका राजकीय वातावरणाचा परिणाम गोखले यांच्यावर टिळकांच्या माध्यमातून दिसून आला. मात्र, भारतीय राजकारणाला वेगळी दिशा देण्यात गोखले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. (प्रतिनिधी)४सुनील गोखले म्हणाले की, आजच्या पिढीपर्यंत गोखले यांचा विचार पोहोचविणे गरजेचे असून महात्मा घडविण्याच्या त्यांच्या विचाराने एक काळ गाजवला. या प्रसंगी महापौर धनकवडे यांनी येत्या ९ मेपर्यंत गोखले यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त स्मारक करण्याची आपली भूमिका राहील, असे स्पष्ट केले. अंकुश काकडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. जयराम देसाई यांनी सूत्रसंचालन केले.